सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

जागतिक स्तरावरील ज्ञान पावर आणि मॅन पावर भारताकडेडॉक्टर सुधीरजी तांबे

जागतिक स्तरावरील ज्ञान पावर आणि मॅन पावर भारताकडे
डॉक्टर सुधीरजी तांबे


रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेश नगर शाखेत थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती दिनांक 30 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली. या जयंती समारोह प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांनी रयत शिक्षण संस्था ही जागतिक स्तरावर ज्ञान पावर आणि मॅन पॉवर पुरवणारी संस्था आहे भविष्यात जगातीक  स्तरावर भारत एक बुद्धिमान देश म्हणून ओळखला जाईल.असे सांगितले हे सांगताना रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या त्यागामधून रयत शिक्षण संस्था दीनदलीतांच्या घरा घरा पर्यंत पोहचली आहे.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर भविष्यामध्ये सरकारने अभ्यासक्रम सुरू करून तो प्राथमिक वर्गापासून पासून महाविद्यालयीन वर्गासाठी राबवला पाहिजे. कारण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खरी श्रमप्रतिष्ठा काय असते हे कमवा व शिका या योजनेतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.असे प्रमुख पाहुणे डॉ सुधीरजी तांबे साहेब यांनी विचार व्यक्त केले.
 याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य रावसाहेब पांडुरंग गाढवे पाटील यांनी माजी विद्यार्थी मेळाव्यामधून मिळालेल्या देणगी मधून विद्यालयाच्या भौतिक सुविधा पूर्ण त्वाककडे घेऊन जाण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.आणि या ज्ञानमंदिरासाठी पालकांनी व माजी विद्यार्थ्यांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केले. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे पाटील यांनी गणेश नगरची ही इमारत माजी विद्यार्थी आणि दानशूर दात्यांच्या देणगी मधून प्रगतीकडे वाटचाल करत आहे असे सांगून सर्व सामान्य कुटुंबातील मुलांना मोफत आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे काम हे विद्यालय करत आहे असे सांगितले.भविष्यामध्ये विद्यालयासाठी ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण सर्वांनी सोडवण्याचा निश्चय करु असे सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून आर बी एन बी कॉलेज श्रीरामपूरचे प्राध्यापक लक्ष्मण कोल्हे सर यांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन नसून ते ब्रह्मास्त्र आहे असे सांगितले शिक्षणाची गंगोत्री कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दीन दलितांपर्यंत घेऊन जाऊन शिक्षणाची जी मक्तेदारी होती ती मक्तेदारी मोडीत काढली. म्हणूनच कर्मवीर भाऊराव पाटलांना क्रांतीसुर्य दिव्य पुरुष असे म्हटले जाते. रयतेमधील विद्यार्थी हिम्मत मेहनत चिद्द आणि चिकाटी या गुणावर पुढे जात आहे असे वर्णन केले. या प्रसंगी मार्च 2024 मधे संपन्न झालेल्या एस एस सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.यावर्षीचे आदर्श शिक्षक म्हणून संभाजी रामकिसन धनवडे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.श्री जयाभाऊ कालेशेठ यांनी विद्यालयाच्या परिसरात संपूर्ण वृक्षलागवड करुन देण्याचे जाहीर केले.याप्रसंगी दत्तात्रय बबन गाढवे पाटील यांच्या कडून सर्व विद्यार्थी व पालकांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.
या कार्यक्रमसाठी रावसाहेब गाढवे,अनिलकाका गाढवे, सोपानराव कासार, राजेंद्र गाढवे, 
  रांजणगावच्या सरपंच सुनीताताई सोपानराव कासार,उपसरपंच नीलिमाताई राजेंद्र गाढवे, अण्णासाहेब कोते पाटील,दादासाहेब गाढवे पाटील ,संदीपभाऊ गाढवे पाटील, किरण राऊत साहेब ,राजेंद्र जाधव साहेब, वाकडी ग्रामपंचायतचे सदस्य विजयभाऊ सदाफळ, कारभारी घोगळ, संचालक बाळासाहेब चोळके,वाल्मीकभाऊ गाढवे, श्रीमती विमलताई दिलीपराव गाढवे, संचालक आलेश कापसे, अंकुश आरोटे, तुरकणे सर, महेश आहेर, पुखराशेठ पिपाडा, कैलास चिंधे सर, विनायक देठे, अनिलराव बोठे,निलेशजी कार्ले, चंद्रकांत घोगळ, चोळके सर, चंद्रकांत पाटील गाढवे, विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय वसावे के के सर सर्व शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वराडे मॅडम यांनी केले आभार सौ पिलगर मॅडम यांनी मांनले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

सोने पॉलिश करून देण्याचा बाहणा करत राहात्यातील पंधरा चारी परिसरात राहणाऱ्या महिलांच्या गळ्यातील ४ तोळे सोने दोन भामट्या चोरट्यांनी लुटले

सोने पॉलिश करून देण्याचा बाहणा करत राहात्यातील पंधरा चारी परिसरात राहणाऱ्या महिलांच्या गळ्यातील ४ तोळे सोने दोन  भामट्या चोरट्यांनी लुटले

राहाता -
 सोने पॉलिश करून देण्याचा बाहणा करत राहात्यातील पंधरा चारी परिसरात राहणाऱ्या महिलांच्या गळ्यातील ४ तोळे सोने दोन  भामट्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी  घडली असून सोने चोरी करणाऱ्या  अज्ञात दोन व्यक्ती विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    याबाबत १५ चारी येथील राहणाऱ्या अनिता रमेश आनप यांनी पोलिसात दिलेल्या फिर्याद म्हटले आहे की शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी सकाळी मी घरातील काम करत असताना सकाळी ११ वाजे दरम्यान दोन व्यक्ती आमच्या घरी मोटारसायवर  आले व त्यांनी मला आम्ही उज्वला कंपनीमधून आलो आहे आम्ही तुमच्या घरातील पितळेची भांडी, फर्निचर, टीव्ही व इतर वस्तू पॉलिश करून देतो असे म्हणत त्यांनी मला व माझ्या सुनेला एक कार्ड हातात दिले कार्ड हातात दिल्यानंतर आम्हा दोघींना भुरळ  पडल्यासारखे झाले. आम्हाला भुरळ पडल्यानंतर त्यांनी आम्हाला घरातील पितळी भांडे तसेच फर्निचर व टीव्ही केमिकलने स्वच्छ करून दिली . आम्हा दोघींना भुरळ पडली  असल्यामुळे ते जे सांगत होते ते आम्ही करत होतो. त्यांनी मला तुमच्या गळ्यातील सोने काढून द्या आम्ही पॉलिश करून देतो असे सांगितल्यानंतर मी व माझ्या सुनेने आमच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने त्यांच्याकडे काढून दिले पॉलिश करण्यासाठी काढून दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये  सोन्याचे गंठण, कानातील साखळ्या व टॉप्स, रिंग, असे एकूण ४ तोळे सोने असे अंदाजे २ लाख ५० हजार किमतीचे सोन्याचे ऐवज आम्हाला भुरळ पाडून चोरून निले असल्याची फिर्याद १५ चारी येथील राहणाऱ्या अनिता रमेश आनप यांनी राहाता पोलिसात दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यान विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

लोहगाव सोसायटीची सभा खेळीमेळी संपन्न


लोहगाव 


राहाता तालुक्यातील लोहगाव येथील विविध कार्यकारी सहकारी( विकास )सेवा संस्थेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या गोडाऊन मध्ये संस्थेचे चेअरमन राजेंद्र चेचरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सभेत दिवंगत झालेल्या मान्यवरांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
सोसायटीचे सचिव आर व्ही चेचरे यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. त्याचप्रमाणे सन 2023 व 24 सालाचा वार्षिक अहवाल तेरीज ताळेबंद व नफा तोटा पत्रक वाचून मंजूर करण्यात आले.
सन 2024 व 25 साल ला कमाल मर्यादा पत्रके तयार करण्याचा प्रत्येक सभासदांची कमाल मर्यादा पत ठरवून बँकेकडे कर्ज मागणीचा अधिकार पंच कमिटीला देण्यात आला.
सन 2024 व 25 साला करिता उत्पादनावर खर्चाचे बजेट ठरवण्यात आले. सोसायटी थकबाकी संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. लेखा परीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षक याची नेमणूक करण्यात आली .यासह विविध विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. 
यावेळी ॲड.बाबासाहेब चेचरे म्हणाले की संस्थेला उत्पन्न कसे मिळेल यासाठी चेअरमन व्हा. चेअरमन संचालक मंडळाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. जागा नगर मनमाड हवे रोडवर कराराने घेऊन गावच्या कार्यक्षेत्रातच पेट्रोल पंप .मॉल. यासारखा व्यवसाय उभारावा तो संस्थेने चालवायला द्यावा त्यातून फक्त पैसाच घ्यावा. त्या उत्पन्नातून मिळालेल्या पैशाचा सभासदांना दरवर्षी डेव्हिंडन्ट रुपात फायदा मिळेल असेही ते यावेळी म्हणाले. प्रत्येक सभासदांनी सोसायटीचे कर्ज भरणे आवश्यक आहे . थकबाकी कर्ज वेळेवर भरावे व ते भरावेच लागते त्याचा फायदा आपल्या सर्व सभासद बंधुना होतो असेही संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे यांनी बोलताना व्यक्त केले. 

मा.संचालक भाऊसाहेब चेचरे
 म्हणाले की संस्थेला विजन ठरवून काहीतरी व्यवसायात उतरावे लागेल व्यवस्थेतून मिळणारा नफ्यातून संस्थेच्या सभासदांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तीच तीच परंपरा आपल्याला बदलावी लागेल यासाठी एखादी एजन्सी पेट्रोल पंप किंवा मॉल यासारखा व्यवसाय करावा लागेल ही आता काळाची गरज आहे.
 ह. भ. प .रवींद्र महाराज चेचरे. अशोक चेचरे .यांनी चर्चेत भाग घेतला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विजय चेचरे. ज्येष्ठ सभासद लहानु चेचरे. कामगार पोलीस पाटील वसंतराव चेचरे.माजी सरपंच गणेश चेचरे. सुरेश चेचरे. दत्तात्रय चेचरे शुभम चेचरे अक्षय चेचरे बबन दरंदले. किशोर दरंदले .तंटामुक्तीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब चेचरे‌ विठ्ठल दरंदले किरण इनामके .बाबासाहेब चेचरे धुळाजी चेचरे .  कृष्णा चेचरे. सोपान चेचरे.अनिल चेचरे.संजय चेचरे.
किरण चेचरे, विजय चेचरे,कुमार चेचरे,लक्ष्मण चेचरे,रावसाहेब चेचरे.भास्करराव चेचरे. आण्णासाहेब चेचरे. संपत चेचरे. बाळासाहेब चेचरे. भाऊसाहेब चेचरे .राजेंद्र चेचरे.कोडीराम नेहे आदि मान्यवर उपस्थित होते.

भटकंती कास पठारची

भटकंती कास पठारची


राहता
बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य असलेले व २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश असलेले कास पठार हे एक पर्यटन स्थळ पाहण्याचा योग दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी आला. ऑनलाईन प्रत्येकी 150 रुपयाचे तिकीट रविवारी  सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतचां कास पठार भ्रमंतीचा आमचा स्लॉट असल्याने भल्या पहाटे आमची फॅमिली पुणे येथील आमच्या लोहगांव  येथील घरून  मार्गस्थ झालो.  वाटेत खंबाटकी घाटातच धुके आणि ढगाच्या गराड्यातच आणि पावसाच्या बारीक सरी  अंधारातच आमच्या स्वागताला हजर होत्या. साताऱ्यात सूर्यदेवाने आम्हाला मुखदर्शन दिले. साताऱ्यातून घाट रस्त्यात नाश्ता करून आम्ही जमिनीपासून 1200 मिटर उंचीवरील कास पठार पार्किंगमध्ये गाडी लावून वनविभागाने पर्यटकांसाठीच्या  गाडीमध्ये पावसातच बसलो. गार वारा, थंडीची चाहूल, पावसाची रिमझिम आणि निसर्गातील रंगीबेरंगी फुले पाहण्याचा मोह आम्हाला पुढे जाण्यास खुणावत होता. पाच मिनिटातच आम्ही चार नंबर पॉइंटला आलो. आमचा नातू अदविक खाली उतरताच जाकीट घालूनही पावसात कुडकुडत होता. परंतु त्याचा उत्साह आमच्यासारखाच ही सृष्टी नजरेत सामावण्यासाठी  आतुर झाली होती. येथे आकाशातील ढग आम्हाला स्पर्शून आणि आम्ही ढगात लपेटून पुढे चालत होतो. लाल दगडाची चिऱ्याची पायवाट आम्हाला  रंगीबेरंगी फुलांच्या दुनियेत घेवून जात होती. प्रत्येक 15-20 फुटावर  ओळीत गार्ड पर्यटकांना लांबून फोटो काढा फुलझाडे तुडवू नका म्हणून सूचना करत होते. परंतु या मोहक विविध रंगी रानफुलातील  जवळीक पर्यटकांना आकर्षित करत सूचनेकडे दुर्लक्ष करीत फोटोसेशन करत होती.  काही ठिकाणी गर्द फुलांच्या ताटव्यात मुद्दामहुन मोकळी जागा ठेवून तिथे फोटो पॉइंट बनविले होते. चार तासात आम्हाला 10 चौरस मैलाचे कास पठार पादाक्रांत करायचे होते. परंतु वाटेतील गार्ड  यांनी सांगितलेली मोठी सोनकी,वायतुरा, पांढरा सापकांदा,सोमाडा,कंदील पुष्प/कंदील खर्चुडी, मुसळी ,आभाळी, भारंगी, डुक्कर कंद, दीपकडी, दवबिंदू, गवती दवबिंदू, कासा,टूथब्रश ऑर्किड,छावर,उंद्री, अंजनी,कुमुदिनी, काळी निसुर्डी,पिंड,पानेर,छोटीसोनकीसोनकी,कवळा,कोंडल,सीतेची आसवें,हालुंडा,काटे रिंगणी हे विविधरंगी फुले आम्हाला रस्ता काटूच देत नव्हती.  पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात.  त्याचबरोबर येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची प्रामुख्याने  २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती येथे  आढळतात.  तसेच येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात. असे गार्ड आम्हाला माहिती पुरवीत होते. हे चालू असतांना आमचे लेक जावई एकीकडे, तर इकडे आमची जोडी  मोठा मुलगा आमचे  दोन्ही जोड्यांचे फोटो काढण्यात व्यस्त होता. तर नातू कधी आमच्यात तर कधी त्याच्या पप्पा मम्मीसोबत फोटो काढण्यात दंग होता. वातावरण कधी धुक्याचे, कधी ढग स्पर्शून जाणारे, क्षणात पावसाची बुरबूर तर लगेच उन असे बहुरंगी होते. त्यामुळे फोटोसेशनही अगदी बहुरंगी झाले. दोन तासात फक्त चार नंबर पॉइंट पाहून झाला.  त्यानंतर एक नंबर पॉईंटच्या गेटवर वाफाळलेला चहा पिवून आम्ही दोन्ही बाजूने कुंपण घातलेल्या  रस्त्यातून  फुलांचे दृश्य पाहू लागलो. इथे अथांग रंगीबेरंगी फुलांनी कास पठार बहरून गेले होते. इथे एखादा अरसिक ही या फुलांच्या प्रेमात सहजच पडेल असे दृश्य होते. पुढे तलावाच्या काठावर सुरक्षेची तटबंदी हटल्याने येथे फोटोसेशन सुरू झाले. स्थानिक गावकरी महिला ठिकठिकाणी नाचणीची भाकरी, वेगवेगळ्या चटण्या, पिठले घेवून पर्यटकांना हा पठारी मेन्यू खाण्यासाठी आग्रह करत होती. प्रत्येकाला हा पठारी आहार खाण्याचे आकर्षण झाले. चार तास फिरल्यावर पोटात कावळे कोकावणारच ना. आम्ही सर्वांनी या मेव्यावर मस्त ताव मारला. खाता खाता आम्हाला दिसले की काही फुले मुरझायला लागली. गार्डला  विचारले तर त्याने सांगितले की काही फुले सकाळी 6 वाजता उमलतात आणि दुपारी 12 वाजता परत मिटतात. त्यामुळे आम्हाला सकाळी 7 ते 11 ची वेळ फायदेशीर वाटली.  या पठारावर सगळीकडे खडक असल्याने  पावसाने चिखल फारसा दिसला नाही. परंतु आता खडक ही काही ठिकाणी निसरडे झाले आहेत. अनेक जण घसरतांना आम्ही पाहिलेत. त्यामुळे निसर्ग सौंदर्य पाहताना प्रत्येक पाऊल जपून टाकण्याच्या सूचना आपोआप मिळत होत्या. एकंदर एका चार तासाच्या भटकंतीत पूर्ण कास पठार पाहून होत नाही तर सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंतचा वेळ तरी सर्व पॉइंट पहायला हवाच. 
                 कास पठार जरी हेरिटेज असेल तरी येथून  जवळच 3 किलोमिटर अंतरावर जगातले सर्वात मोठे भाबवली पुष्प पठार आहे. पहावे तिकडे फुलेच फुले. हा पठार पर्यटक यांचे वावरपासून दूर असल्याने निसर्गाची मुक्त रंग उधळण आहे. परंतु हा अतिशय निसरडा , अतिशय थंडगार,आणि जंगली श्वापदांचा वावर असलेला भाग असल्याने इकडे कुणी  जावयास धजत नाही.
                  सातारा परिसरात  अनेक तलाव, अनेक धबधब्यांच्या रांगा,  वासोटा किल्ल्याच्या परिसर, कोयना धरण, नद्यांचे त्रिवेणी संगम, सज्जनगड आणि जावळीचे खोरे,  मोठमोठाले कडे, सुळके, छोटा काश्मीर आणि सर्वात महत्त्वाचे पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित आणि निसर्गाचा परिपूर्ण आनंद देणारे कास पठार असा हा सातारा परिसरातील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना सतत येण्यास खुणवीत असतो. 
                              ला .राजेंद्र फंड, राहाता, 
                                   मो. 9881085671.

शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडीग सुरु करण्यात यावी -डॉ,राजेंद्र पिपाडा

शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडीग सुरु करण्यात यावी अशी मागणी डॉ,राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे शिर्डी विमानतळावर केली.   



शिर्डी -

       शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडीग सुरु करण्यात यावी अशी मागणी डॉ,राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे शिर्डी विमानतळावर केली.
              शिर्डी विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवुन त्यांना शिर्डी विमानतळावर नाईट लँडींग सुरु कऱणेसंदर्भात विनंती कऱणेत आली यावेळी त्यांनी CISF चे अधिकारी व टर्मिनल मॅनेजर यांना बोलावुन अडचणींबाबत विचारला केली असता त्यांनी 30 गार्डची आवश्यकता असल्याचे सांगितले याबाबत CISF च्या वरिष्ठ अधिका-यांशी बोलुन आपल्यास मॅन पॉवर पुरविण्यास सांगतो असे आश्वासन दिले.
            शिर्डी विमानतळावरील 600 कोटी रु.चे मंजुर असलेल्या कामाच्या निविदा झालेल्या असल्याने लवकर काम  सुरु करण्यासंदर्भात डॉ.पिपाडांनी मागणी केली असता त्यांनी MADC चे कार्यकारी अधिकारी यांना फोन लावुन त्यांना याबाबत विचारणा करुन
तात्काळ काम  सुरु करणेसंदर्भात सुचना केल्या.
       शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान असल्यामुळे परराष्ट्रातुन व परदेशातुन याठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे भक्तांची गैरसोय होवु नये यासाठी त्यांना नाईट लँडींगची सुविधा देणे गरजेचे आहे. शिर्डी विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत परंतु येथे नाईट लँडींगची सुविधा नसल्यामुळे फ्लाईटची संख्याही कमी आहे. या विषयावर चर्चा झाल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवत तात्काळ अधिका-यांशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधला.
       यावेळी बजरंगबलीची शाल देवुन त्यांचा सत्कारही  करण्यात आला.   


सन 2023-24 वर्षात राहाता नगरपरिषद माझी वसुंधरा अभियानात राज्यात पाचवी तर नाशिक विभागात प्रथम..


  सन 2023-24 वर्षात राहाता नगरपरिषद माझी वसुंधरा अभियानात राज्यात पाचवी तर नाशिक विभागात प्रथम..

राहता
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय माझी वसुंधरा अभियान ४.० सन 2023-24 अंतर्गत भुमी,वायु, जल,अग्नी व‌ आकाश या पंचत्वांतर्गत  पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी राहाता नगरपरिषदेने सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये राहाता राहाता नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांतधिकारी साहेब श्री माणिक आहेर साहेब व मुख्याधिकारी साहेब श्री. वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली  उच्चतम कामगिरी करत महाराष्ट्र राज्यात पाचव्या क्रमांकाचा व नाशिक विभागात 15 ते 25 हजार या गटात पहिला क्रमांकाचा मान मिळवला आहे. 
यावर राहाता नगरपरिषदेने १ कोटी ५० लाख रुपयाच्या बक्षिसावर आपली मोहोर उमटवली.
तसेच याकरीता नगरपरिषदेतील सर्व विभागातील अधिकारी,विभागप्रमुख,व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले 



शिर्डी : चातुर्मासानिमित्त जैन स्थानकात अवतरले भक्तीपर्व

शिर्डी : चातुर्मासानिमित्त जैन स्थानकात अवतरले भक्तीपर्व

शिर्डी येथे पारख परिवाराचे मासखमण उत्साहात




शिर्डी  


*साईंची नगरी असलेल्या शिर्डीतील जैन स्थानकात यंदा प्रथमच चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले होते. जैन स्थानकात चातुर्मास व्हावा, ही पारख परिवाराचा आधारवड असलेल्या स्व. सजनबाई पारख यांची मनस्वी इच्छा होती. त्यांच्या दूर्दम्य इच्छेनुसार धर्माराधनाने चातुर्मासाला सुरुवात झाली.*
*जैन धर्मात भगवान महावीरांनी कर्म निर्जरासाठी अनेक मार्ग सांगितले आहेत. त्यातील दान, धर्म, शीलपालन आणि तपस्या या चार मार्गांपैकी तपस्या हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. जैन बांधव आपल्या क्षमतेनुसार नवकारशी पासून ते मासखमन व त्यापेक्षाही अधिक दिवसांची तपस्या करतात. पर्यूषणपर्वात या सर्व तपस्या व उपासनांची पर्वणी जैन बांधवांमध्ये दिसून येते. त्याचाच भाग म्हणून येथील धर्मानुरागी सुश्राविका अशी विशेष ओळख असलेल्या स्व. सजनबाई यांच्या इच्छेनुसार प. पू. दर्शनप्रभाजी म.सा. व प. पू. अनुपमाजी म. सा. आदींच्या सानिध्यात जैन स्थानकात चातुर्मासाला सुरूवात झाली. पर्यूषण पर्वानिमित्त जेष्ठ सदस्य संघपती पुखराज लोढा, सचिव विजय लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच, नरेश पारख, अध्यक्ष चातुर्मास कमिटी यांच्या उत्कृष्ट नियोजनातून विविध धार्मिक प्रवचन, जप, तप, आराधना इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आबालवृद्ध या भक्तीपर्वाचा आनंद घेत आहेत.*

*शिर्डीत शनिवारी विशेष सोहळा*

*शिर्डी येथील धर्मपरायण पारख परिवार व जैन संघाचे जेष्ठ सदस्य तथा खजिनदार विजय पारख, उषा पारख तसेच पारख परिवारातील कन्या रक्षणा राजेश जैन (मुंबई) यांनी “उपासनेला दृढ चालवावे” या आपल्या मातोश्री स्व. सजनबाई पारख यांची शिकवण व वडील शिवचंद पारख यांच्या आशीर्वादाने “मासखमण”चे तप पूर्ण केले. जैन श्रावक संघाचे नरेश पारख यांची कन्या रिया पारख यांनीही १५ दिवसांचे उपवास पूर्ण केले आहेत. मासखमण व्रतपूर्तीनिमित्त पारख परिवाराच्या वतीने शिर्डी येथे २८ सप्टेंबरला प. पू. दर्शनप्रभा म.रा.सा. व प. पू. अनुपमाजी म.रा.सा. आदी ठाणा पाच यांच्या सान्निध्यात सकाळी ८ वाजता वरघोडा व ९ वाजता प्रवचन होणार आहे. त्यानंतर तपस्वींचा पच्चकावणी समारंभ होईल. या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जैन स्थानक संघ, शिर्डीचे संघपती पुखराज लोढा व  चातुर्मास कमिटी अध्यक्ष नरेश पारख यांनी केले आहे.*

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४

वृद्धांना व लाडक्या बहिणींना घरपोच मानधन

वृद्धांना व लाडक्या बहिणींना घरपोच मानधन 
पारनेर मधील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खडेकर हे देत आहे विनामूल्य सेवा

शिर्डी 

सरकार जनहितासाठी सामाजिक अनेक उपक्रम व योजना राबवीत असतात मात्र त्या योजनांची अंमलबजावणी करत असताना त्यात अनेक त्रुटी असतात अशीच एक त्रुटी एका सामाजिक कार्यकर्त्यांनी ओळखली.वयोवृद्ध माता-पित्यांना व लडकी बहीण यांना घरी जाऊन योजनेचे पैसे घरपोच मोफत देत आहेत.
पारनेर शहरासह तालुक्यात अनेक सहकारी तयार करू.भाऊसाहेब खेडेकर सरकार देत असलेल्या संजय गांधी निराधार व लाडकी बहीण योजनेचे मानधन ते स्वखर्चाने वृद्ध माता-पित्यांना व लाडक्या बहिणींना कोणताही मोबदला न घेता थेट घरपोच करीत आहे.
सरकारने वयोवृद्ध व लडकी बहीण यांना दरमहा 1500 रुपये पेन्शन सुरू केली आहे. 
 संजय गांधी निराधार योजनेत 60  पेक्षा अधिक वय असलेल्या वृद्धांचा समावेश केला जातो.हे पैसे संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यावरच जमा होतात.ही रक्कम अनेकदा कधीही जमा होते.
त्यात फारसे सातत्य राहत नाही त्यामुळे या वृद्धांना पैसे कधी जमा होतात हे समजत नाही शिवाय गावातून बँकेचे अंतर बऱ्याचदा खूप असते अशावेळी या वृद्धांना थेट 1500 रुपये काढण्यासाठी बँकेत जाणे कठीण होते,ही अडचण लक्षात आल्याने वृद्धांना पैसे घरपोच कसे घेता येतील यासाठी भाऊसाहेब खेडकर अनेक दिवसापासून विचार करत होते त्यावर त्यांनी तोडगाही काढला .अनेक दिवसापासून त्यांनी पैसे घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे त्यामुळे आता तालुक्यात वृद्धांना व लाडक्या बहिणींना घरपोच पैसे मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

सेवापूर्ती समारंभाचे आयोजन

सेवापूर्ती समारंभाचे आयोजन
शिर्डी प्रतिनिधी संजय महाजन
 

विद्या प्रसारणी सभेच्या व्ही. पी. एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकाश हॉल मध्ये श्रीमती सुरेखा अनिलसिंग परदेशी मॅडम यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन प्रशाले तर्फे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभेचे कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके, शाळा समिती सदस्य अॅड. संदीप अगरवाल आणि श्री. धीरूभाई कल्याणजी उपस्थित होते.

श्रीमती सुरेखा परदेशी मॅडम यांनी वि.प्र. सभेमध्ये एकूण 38 वर्षे सेवा केली. ज्ञानदानाबरोबरच विविध समित्यांमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केले. समित्यापैकी सांस्कृतिक समिती, परीक्षा समिती, सहल समिती आणि शालेय पोषण आहाराचे काम देखील त्यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले.

अध्यापनातील विषयांपैकी इंग्रजी त्यांचा मुख्य विषय त्याचबरोबर मराठीचे अध्यापन त्यांनी केले. तसेच इंग्रजी विषयाचे विषय प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. नेहमी हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या सौ. परदेशी मॅडम सेवानिवृत्त होत असल्यामुळे सर्वच अध्यापक वर्गाने हळहळ व्यक्त केली. ज्ञानदानाच्या कार्याबरोबरच घराची जबाबदारी देखील तितक्याच सक्षमपणे त्यांनी पेलवली.

कार्यक्रम प्रसंगी मंचावर प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक श्री. सुहास विसाळ, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, वरिष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंगल जाधव, प्राथमिक विभाग इंग्लिश माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती लोखंडे मॅडम आणि शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात चिरंजीव गौरव गोणते विद्यार्थ्याने प्रस्तुत

केलेल्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सोमनाथ

ढुमणे यांनी आपल्या विनोदी शैली मधून केले. प्रास्ताविक शिक्षक

प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे यांनी केले. उपस्थितांपैकी

श्री. हरिभाऊ कुलकर्णी, श्री. अनिल खामकर, श्रीमती स्नेहलता कांबळे,

श्रीमती अनुजा गोसावी, परदेशी मॅडमच्या कन्या अंजली, सूनबाई

श्रीमती स्वाती परदेशी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्री. परदेशी

सर यांनी आपल्या पत्नी विषयीच्या भावना कागदावर टिपल्या.

कार्यक्रमासाठी श्रीमती परदेशी मॅडम यांचे चिरंजीव ओंकार,

विहीणबाई आणि जवळचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे आणि शाळा समिती

अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर कार्यक्रमासाठी उपस्थित राहू न

शकल्यामुळे त्यांनी आपल्या शुभेच्छा मोबाईल द्वारे दिल्या. माजी

शिक्षकांपैकी मा. प्राचार्या श्रीमती शेख मॅडम, उपमुख्याध्यापिका

मधुमालती संधीर मॅडम, शिक्षक श्री. वाळेकर सर, श्री. प्रल्हाद देशपांडे

श्री. प्रमोद देशपांडे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या तयारीमध्ये फलकलेखन श्री. महेश चोणगे तर कार्यक्रम पत्रिका श्री. विक्रम शिंदे यांनी तयार केली. स्वागत समितीमधील श्रीमती वैशाली ढाकणे, श्रीमती मनीषा खेडकर, श्रीमती वैशाली तारू, श्रीमती प्रीती म्हात्रे आणि श्रीमती मीना पराते आणि सेवक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले. उपस्थितांचे आभार श्री. वैभव सूर्यवंशी यांनी मानले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

   

  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


शिर्डी येथे महिला सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत महिला मेळावा संपन्न





शिर्डी,                                                                                                                                                                      - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ९० लाख बहीणींच्या बॅंक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहेत. उर्वरित ६० लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. एकाही भगिनींला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

     शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला महामेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला महसूल, पशूसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,  आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे,  माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील,  विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री.साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते.        उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, महिला विकासाच्या योजना केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही. त्यादृष्टीने केंद्र शासनाने लाडली बहीण, लखपती दीदी योजना आणली. राज्यातील १ कोटी महिलांना लखपती दिदी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  नेतृत्वाखाली राज्यात लेक लाडकी योजना आणण्यात आली. यात मुलींना वयाची १८‌ वर्ष पूर्ण झाल्यावर एक लाख रूपये मिळणार आहेत.
          मुलींना शिकविले पाहिजे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. 
          श्री.फडणवीस पुढे म्हणाले, रात्रंदिवस  काबाडकष्ट करणाऱ्या लाडकी बहीणींना  दिलेल्या महिलांसाठी योजनेतून मिळालेली रक्कम मोलाची आहे. यापुढे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील‌. या योजनेच्या मासिक लाभात ही वेळोवेळी वाढ करण्यात येईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भगिनींना आश्वस्त केले. 
          राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असल्याचे नमूद करून ते म्हणाले, शेतकऱ्यांना वर्षभर वीज देण्यासाठी शासन काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या एक रूपयात पीक विमा योजनेच्या माध्यमातून ८ हजार कोटींचा विमा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. पन्नास वर्षापासून प्रलंबित निळवंडे प्रकल्पास शासनाने चालना दिली आहे. पश्चिम वाहिनींचे ५५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणून अहमदनगर, नाशिकसह संपूर्ण मराठवाडा पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याचे काम शासन करणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी सांगितले. 
             शिर्डी संस्थानामधीन ५८४ कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले. शिर्डी नवीन विमानतळांच्या टर्मिनल इमारतीचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. 




विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन आणि उद्घाटन
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आभासी पद्धतीने निमगाव कोऱ्हाळे येथील श्री साईबाबा संस्थानाचे शैक्षणिक संकूल, सावळीविहिर खुर्द येथे नवीन पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, मौजे लोणी बु. येथील भृण प्रत्यारोपण प्रयोगशाळा, शिर्डी येथील थीमपार्क, महसूल भवन इमारतीचे भूमीपूजन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. अकोले येथील तालुकास्तरीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण, जिल्ह्यातील २६ तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन व ३५ तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे भूमीपूजनही यावेळी करण्यात आले. 
गोदावरी उजवा तट कालवा प्रकल्पाच्या १९१ कोटी ५८ लक्ष रुपयांच्या प्रकल्प अहवालास मान्यता प्रदान, मदर डेअरी व राहाता तालुका दूध संघ यांच्यामध्ये प्रतिदिन एक लाख लीटर दूध संकलनाचा करार करण्यात आला
.





गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४

सिंहगड दंत महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक डॉ शिल्पा फरांदे यांना पीएचडी पदवी प्राप्त

सिंहगड दंत महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक डॉ शिल्पा फरांदे यांना दंतशाखेमधील ऑर्थोडॉन्टिक्स या विषयावर पीएचडी पदवी प्राप्त


शिर्डी प्रतिनिधी


       सिंहगड दंत महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक डॉ शिल्पा फरांदे यांना दंतशाखेमधील ऑर्थोडॉन्टिक्स या विषयावर पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज येथे पार पडलेल्या १८ व्या पदवी दीक्षांत समारंभामध्ये महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल सन्माननीय सी पी राधाकृष्णण यांच्या हस्ते त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे तसेच सन्माननीय राजेंद्र विखे हे उपस्थित होते.निंबा मालजी नंदन ताराबादकर यांची नात गोविंदराव शिरवाडकर व देवका शिरवाडकर यांची कन्या म्हणून नावलौकिक केले आहे खानदेश भागातून अभिनंदन नाचा वर्षाव  
होत आहे


बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न

राहाता  तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा  मोठ्या उत्साहात संपन्न
राहाता (

 तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा  माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या अध्यक्ष, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. राहता व कोपरगाव तालुक्यातील गणेशच्या स्वाभिमानी सभासद, कामगार व शेतकऱ्यांशी यावेळी त्यांनी संवाद साधला.


यावेळी आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, अनेक अडचणींवर मात करत आपण गणेश कारखाना ताब्यात घेतला. कारखाना ताब्यात आल्यानंतर शेतकरी, सभासद यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. सभासद व संचालकांच्या सहकार्यातून आता गणेश कारखाना सुरळीत सुरू आहे. याबाबत युवा नेते विवेक कोल्हे व संचालक मंडळाचे कौतुक केले पाहिजे.  आपला मात्र हेतू हा कारखान्याची प्रगती होऊन या भागाचा विकास व्हावा असा आहे. या गणेश परिसराची अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद गणेश कारखान्यात आहे.

याप्रसंगी युवा नेते विवेक कोल्हे, कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, कृषीभूषण प्रभावतीताई घोगरे, माजी चेअरमन नारायण कार्ले, ज्येष्ठ नेते शिवाजीराव लहारे, सर्व संचालक मंडळ, सभासद व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते

अकोले तालुक्यातील कळस येथील विक्रांत प्रकाश अल्हाट यांची पोलीस उपनिरीक्षक ( पी.एस.आय.) पदी निवड

अकोले तालुक्यातील कळस येथील विक्रांत प्रकाश अल्हाट यांची पोलीस उपनिरीक्षक ( पी.एस.आय.) पदी निवड


शिर्डी प्रतिनिधी 

        महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विक्रांत आल्हाट यांना एससी प्रवर्गातून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 325 रँक मिळाली आहे.
        कळस सोसायटी चे संचालक व आदर्श इंग्लीस स्कुल वडगाव लांडगा येथील प्रयोगशाळा परिचर प्रकाश आल्हाट व अकोले एस टी आगरा च्या बस वाहक सौ. मंदा आल्हाट यांचे चिरंजीव विक्रांत आहे. गरिबीच्या परिस्थितीतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून एम.पी.एस.सी. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. यासाठी श्रीमती पुष्पा ढगे, कैलासराव वाकचौरे यांनी मोठी मदत केली. 
         विक्रांत आल्हाट याचे निवडी बद्दल गावात ढोल ताशा च्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थ व सत्कार सोहळा समिती च्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी मंत्री मधुकराव पिचड व आमदार डॉ. किरण लहामटे, संगमनेर च्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.  सेवा निवृत्त प्रशासकीय अधिकारी निर्मलकुमार देशमुख, जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन माधवराव कानवडे, जिल्हा परिषद चे माजी अर्थ बांधकाम समिती चे सभापती कैलासराव वाकचौरे, गटनेते जालिंदर वाकचौरे आदी उपस्थित होते.

लोहगाव सोसायटीची सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबर रोजी.

लोहगाव (वार्ताहर )

राहाता तालुक्यातील आदर्श म्हणून ओळख निर्माण झालेल्या लोहगाव विविध कार्यकारी सहकारी (विकास )सेवा संस्थेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी अकरा वाजता संस्थेच्या  गोडाऊन मध्ये संपन्न होणार आहे.

संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र केरुनाथ पा.चेचरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या सभेसाठी संस्थेच्या सर्व सभासद बंधू भगिनींनी सभेत उपस्थित राहावे असे आव्हान संस्थेचे  व्हा चेअरमन विजय हरिभाऊ पा. चेचरे. व संस्थेचे मुख्य सचिव आर व्ही चेचरे यांनी दिली आहे .

सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

शिर्डीत संघटनात्मक बैठकचे आयोजन

शिर्डीत संघटनात्मक बैठकचे आयोजन

नगर 
      आज शिर्डी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहर व राहाता मंडळ जिल्हा पदाधिकारी यांची संघटनात्मक बैठक शिर्डी विधानसभाचे निरीक्षक व गुजरात विधानसभाचे मा.अध्यक्ष श्री.राजेंद्रजी त्रिवेदी व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर, शहराध्यक्ष विकास गोंदकर यांच्या प्रमुख  उपस्थितीत पार पडली.
      यावेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संदर्भात चर्चा करण्यात आली. विरोधकाकडून जो फेक नेरेटिव सेट केला जात आहे त्याला थेट नेरेटिव ने उत्तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देण्यात येणार आहे. बूथ सक्षमीकरणावर जोर देत, बूथ रचना मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बूथ प्रमुखांना कार्याचे योग्य वाटप करण्याबाबत सूचना देण्यात आल्या, तसेच मतदारांना केंद्र व राज्य सरकारच्या उपक्रमांची माहिती देण्याची जबाबदारी दिली. ४० दिवस पूर्णवेळ युवा मोर्चाचे कार्यकर्त्या काम करण्याचा संकल्प करण्यात आला. 
       गुजरात विधानसभाचे मा.अध्यक्ष राजेंद्रजी त्रिवेदी सर यांनी भारतीय जनता युवा मोर्चा प्रसिद्धीप्रमुख तुषार संजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार केला. 
     यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र माळवदे, नवनाथ मुजमुले, गणेश सोनवणे,  सतीश गायकवाड, किरण बर्डे, सतीश बावके, लखन बेलदार, तालुकाध्यक्ष राहुल गोरे, प्रसाद शेलार, राजु बलसाने, अक्षय मुळे, प्रसाद बावचे, प्रसाद सुरंजे, गिरधारी सोनेजी, शुभम भोर, संदीप थोरात, सागर जेजुरकर व युवा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या उपाध्यक्ष पदी तुषार महाजन यांची नियुक्ती

ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या उपाध्यक्ष पदी तुषार महाजन यांची नियुक्ती


      ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या उपाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे तुषार संजय महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साधना सहकारी बँक मा.व्हा.चेअरमन बाळासाहेब बापुराव कोळपे व ग्रीन फाउंडेशन संस्थापक/अध्यक्ष अमित जगताप यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. 
      याप्रसंगी तुषार महाजन म्हणाले, पर्यावरण संरक्षण करणे, जनजागृती करणे, वृक्ष लागवडकरणे, वृक्षाचे संवर्धन करणे, एक कुटुंब, एक झाड ही संकल्पना प्रत्यक्ष राबविणे, शाळांमध्ये, महाविद्यालयात वृक्ष कार्यक्रम आयोजन, निबंध / वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे, निसर्गाच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना करणे, झाडे लावा झाडे जगवा, वृक्ष चळवळ लोक चळवळ व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्गाची साखळी टिकवून ठेवण्यासाठी त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. व ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे कार्य संपुर्ण महाराष्ट्र पोहोचवणार असल्याची माहीती ग्रीन फाउंडेशन उपाध्यक्ष तुषार महाजन यांनी दिली.

श्री अरुणराव शिंदे - गायकवाड यांना नवराष्ट्र रत्न 2024 पुरस्कार प्रदान साई भक्त*श्री अरुणराव शिंदे - गायकवाड यांना नवराष्ट्र रत्न 2024 पुरस्कार प्रदान

श्री अरुणराव शिंदे - गायकवाड यांना नवराष्ट्र रत्न 2024 पुरस्कार प्रदान साई भक्त*श्री अरुणराव शिंदे - गायकवाड यांना नवराष्ट्र रत्न 2024 पुरस्कार प्रदान


श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक,सामाजिक,वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान

शिर्डी प्रतिनिधी 

दैनिक नवभारत नवराष्ट्र आयोजित नवराष्ट्र रत्न पुरस्कार 2024 सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक,धार्मिक,राजकीय,वैद्यकीय,कृषी,पर्यटन,उद्योजक,शैक्षणिक अश्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्हा व जिल्हयाबाहेरील 50 कर्तृत्ववान मान्यवरांना  नवराष्ट्र रत्न 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले 

शिर्डीतील श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे व्यवस्थापकिय विश्वस्त श्री अरुणराव शिंदे - गायकवाड यांना धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल नवराष्ट्र रत्न 2024 पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त अरुणराव शिंदे - गायकवाड हे श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून श्री साई बाबांचा प्रचार आणि प्रसार करत असतात या ट्रस्टच्या माध्यमातून मकर संक्रांतीच्या दिवशी लक्ष्मी यज्ञाचे आयोजन केले जाते तसेच या यज्ञात सहभागी होण्यासाठी राज्य परराज्यातील आणि विविध देशातील भाविक येत असतात त्याचप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,अन्नदान केले जाते तर वैद्यकीय क्षेत्रात देखील श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे मोठे योगदान लाभत असते ..आजवर 5 हजारांच्या वर रुग्णांची मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया ट्रस्टच्या माध्यमातून केली असून अविरतपणे ही सेवा साईबाबांची सेवा म्हणून सुरू असते.

 श्री. अरुणराव शिंदे- गायकवाड पा. यांच्या वतीने साई 9 ग्रुप चे संचालक श्री. साईराज अरुणराव गायकवाड पा.यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

या पुरस्कार सोहळ्याला माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे, आ संग्राम जगताप,पद्मश्री पोपटराव पवार, नवराष्ट्र वृत्तपत्र समूहाचे ग्रुप प्रेसिडेंट ए श्रीनिवास राव,कार्यकारी संपादक संजय मलमे,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ प्रकाश कांकरिया,,डॉ सुधा कांकरिया,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्प व चित्रकार प्रमोद कांबळे,साहित्य व कथाकार डॉ संजय कळमकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक,सामाजिक,वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान

शिर्डी प्रतिनिधी 

दैनिक नवभारत नवराष्ट्र आयोजित नवराष्ट्र रत्न पुरस्कार 2024 सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक,धार्मिक,राजकीय,वैद्यकीय,कृषी,पर्यटन,उद्योजक,शैक्षणिक अश्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्हा व जिल्हयाबाहेरील 50 कर्तृत्ववान मान्यवरांना  नवराष्ट्र रत्न 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले 

शिर्डीतील श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे व्यवस्थापकिय विश्वस्त श्री अरुणराव शिंदे - गायकवाड यांना धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल नवराष्ट्र रत्न 2024 पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त अरुणराव शिंदे - गायकवाड हे श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून श्री साई बाबांचा प्रचार आणि प्रसार करत असतात या ट्रस्टच्या माध्यमातून मकर संक्रांतीच्या दिवशी लक्ष्मी यज्ञाचे आयोजन केले जाते तसेच या यज्ञात सहभागी होण्यासाठी राज्य परराज्यातील आणि विविध देशातील भाविक येत असतात त्याचप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,अन्नदान केले जाते तर वैद्यकीय क्षेत्रात देखील श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे मोठे योगदान लाभत असते ..आजवर 5 हजारांच्या वर रुग्णांची मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया ट्रस्टच्या माध्यमातून केली असून अविरतपणे ही सेवा साईबाबांची सेवा म्हणून सुरू असते.

 श्री. अरुणराव शिंदे- गायकवाड पा. यांच्या वतीने साई 9 ग्रुप चे संचालक श्री. साईराज अरुणराव गायकवाड पा.यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

या पुरस्कार सोहळ्याला माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे, आ संग्राम जगताप,पद्मश्री पोपटराव पवार, नवराष्ट्र वृत्तपत्र समूहाचे ग्रुप प्रेसिडेंट ए श्रीनिवास राव,कार्यकारी संपादक संजय मलमे,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ प्रकाश कांकरिया,,डॉ सुधा कांकरिया,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्प व चित्रकार प्रमोद कांबळे,साहित्य व कथाकार डॉ संजय कळमकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती

रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

रयत शिक्षण संस्थेचे नाव राज्यात, देशातच नव्हे तर परदेशातही झाले आहे.- व्हा. चेअरमन दिलीपराव डहाळे

शिर्डी 

 विद्यार्थ्यांना व्यापक दृष्टीने शिक्षण देणारी रयत शिक्षण संस्था ही देशात  सर्वोच्च शिक्षण संस्था असून रयत शिक्षण संस्थेचे नाव राज्यात, देशातच नव्हे तर परदेशातही झाले आहे. असे प्रतिपादन रयत बँक साताराचे व्हा. चेअरमन  दिलीपराव डहाळे  यांनी केले.
राहाता तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर बु.येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंती कार्यक्रमात  ते बोलत होते. 
 अध्यक्षस्थानी  स्कूल कमिटीचे अध्यक्ष  बाळासाहेब जनार्दन जपे  होते.या कार्यक्रमाला सरपंच परिषदेचे राज्यअध्यक्ष दत्तात्रय पा. शेटे उद्योजक विजयराव कडू ,सरपंच ओमेश  जपे ,उपसरपंच विकास जपे, कृ. उ. बा. समितीचे संचालक शांताराम जपे , राजेंद्र आगलावे, गणेश कापसे, मुख्याध्यापक तुपे एस एम, संगीताताई वाघमारे , राजकुमार गडकरी,  कैलास सदाफळ, गणेश आगलावे, नवनाथ जपे, सतीश जपे, पद्माताई कापसे, रावसाहेब आगलावे आदी मान्यवर  उपस्थित होते.
प्रथम   डॉ. कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य भव्य मिरवणूक काढली. नंतर प्रतिमापूजन व मान्यवरांचा सत्कार झाला.या  कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थी व विविध मैदानी स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या विजयी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी  दत्तात्रय पा. शेटे  यांनी या विद्यालय परिसरात प्लेविन ब्लॉक  बसवण्यासाठी एक लाख रुपये देणगी  जाहीर केली. सतीश जपे यांनी विद्यार्थ्यांना बक्षीसे जाहीर केली.
यावेळी  डहाळे  पुढे म्हणाले की, डॉ.कर्मवीर अण्णांनी यांनी मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत  शाळा काढल्या.  त्यांच्या योगदानामुळेच आज 750 शाळा, १४००० शिक्षक,साडेचार लाख विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत.  या संस्थेत कोणतेही डोनेशन नाही. प्रतिकूल ठिकाणीही शाळा आहेत.  शाळा हाय फाय म्हणजे शिक्षण हाय फाय असे नाही.असे सांगत शिक्षणामध्ये परिस्थिती आड येता कामा नये. परिस्थितीमुळे शिक्षण होतेच असे नाही. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. अण्णांनी शिक्षणाबरोबरच संस्कृती जपण्याचे ही काम केले. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद तसेच कमवा  व शिका या योजना आपल्या शाळांमध्ये चालू केल्या. हे कर्मवीरांचं स्वप्न होतं. त्यामुळेच आज रयत शिक्षण संस्थेत मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेरिंग अशा आर्थिक कमाई करून देणारे 15 कोर्स येत आहेत. लिखाण ,वाचन याप्रमाणेच कृतीतून शिक्षण हे अण्णांचे स्वप्न होते. ते या शिक्षण संस्थेमार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे विद्यार्थी येथे कृतीतून शिक्षण घेत आर्थिक कमाई करू शकतील. व त्यावरच शिक्षण होऊ शकेल. असा या शिक्षण संस्थेचा प्रयत्न आहे. असे सांगत रयत शिक्षण संस्था एक विद्यापीठ झाली आहे. व यापुढे या रयतेच्या विद्यापीठातूनच विद्यार्थी पदवीधर होणार आहे. असे म्हटले. या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाला वॉल कंपाउंड साठी रयत बँकेकडून आपण प्रस्ताव द्या त्यासाठी पाच लाख रुपये देऊ, असे आश्वासनही यावेळी दिलीपराव डहाळे सर यांनी दिले.
 यावेळी श्रीराम इंडस्ट्रीजचे उद्योजक विजयराव कडू पा. यांनी  नवीन डायस देण्याचे यावेळी जाहीर केले. बाळासाहेब जपे,  कु. भक्ती तुरकणे, आदींची भाषणे झाली. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डुंबरे आभार भारत खेडकर  यांनी मानले.
या कार्यक्रमाला एकनाथ आरणे, रफिक शेख, कारभारी पाचोरे, दिग्विजय कापसे, आदींसह  मुख्याध्यापक तुपे एस एम  ,ज्येष्ठ शिक्षक डुंबरे, म्हस्के , काळेगोरे, खेडकर,सौ कानडे मॅडम, श्री खान ,वाकचौरे,  शिंदे मॅडम व सर्व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री गणेश विद्यालयात कर्मवीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक

श्री गणेश विद्यालयात कर्मवीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक


 रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाळेत रयत शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत , थोर शिक्षण महर्षी , रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

मिरवणुकीमध्ये कर्मवीर रथाच्या समोर विद्यालयातील शिक्षकांनी बसवलेले झांज पथक, लेझीम पथक, टिपरी नृत्य सादर करण्यात आले.यामध्ये लहान मुलांनी सादर केलेले झांज पथक, लेझीम पथक व टिपरी नृत्य मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मिरवणूक बस स्टॅंड वर आल्यावर ग्रामस्थांच्या वतीने कर्मवीर रथाचे पूजन करण्यात आले. या मिरवणुकीमध्ये श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे, स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य रावसाहेब गाढवे पाटील ,अण्णासाहेब कोते पाटील, दादासाहेब गाढवे पाटील, संदीपभाऊ गाढवे, जया भाऊ कालेशेठ ,वाल्मीकभाऊ गाढवे ,विजुभाऊ सदाफळ ,रांजणगावच्या सरपंच सुनीताताई सोपानराव कासार उपसरपंच निलिमाताई राजेंद्र गाढवे, सोपानकाका कासार, दत्तात्रय बबन गाढवे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसावे के. के. सर प्रभारी पर्यवेक्षक बाळासाहेब तनपुरे सर यांनी मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी कर्मवीर रथाची सुंदर सजावट केली.या मिरवणूकीसाठी श्री दिलीप बोर्डे यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला.कर्मवीर रथाचे सारथ्य सार्थक बोर्डे यांने केले.मिरवणूक यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

राहाता न्यायालयात लोकअदालतचे आयोजन

राहाता न्यायालयात लोकअदालतचे आयोजन

राहाता: 


       जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा प्राधिकरण तथा राहाता वकिल संघ, राहाता यांचे संयुक्त विद्यमाने लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रलंबित दिवाणी दावे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, नियमांतर्गत तडजोड होणारी फौजदारी प्रकरण, धनादेश न वाटल्याची प्रकरण, घरगुती हिंसाचार, विद्युत कायदयांतर्गत येणारी प्रकरणे, बैंक वसुली, भुसंपादन, लवाद अर्ज व दरखास्त त्याचप्रमाणे बँक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, बीएसएनएल यांचे रक्कम थकबाकी तथा ग्रामपंचायत व नगरपालिका यांचे घर, नळपट्टी दाखल पूर्व प्रकरणे या सर्व प्रकरणांच्या अनुषंगाने दि. २८ सप्टेबर २०२४ रोजी राहाता न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. सर्व संबंधितांनी या संधीचा लाभ घेउन जास्तीत जास्त प्रकरणे तडजोड करून, आपले प्रकरण मिटवून निकाली काढून घ्याव, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा राहाता वकील संघ, राहाता यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४

रयतचा गुणात्मक विकास वाखाणण्याजोगा : आमदार रोहित पवार

रयतचा गुणात्मक विकास वाखाणण्याजोगा : आमदार रोहित पवार


बाभळेश्वर: 

रयत शिक्षण संस्था येणाऱ्या आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जात असून शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था ठरत आहे. रयतच्या विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास  वाखाण्याजोगा आहे, असे प्रतिपादन रयतचे जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित पवार यांनी केले.
आमदार रोहित पवार यांनी नुकतीच अहमदनगर शिर्डी प्रवासादरम्यान बाभळेश्वर येथील सुधीर म्हस्के यांच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के पाटील यांनी आमदार रोहित पवार यांचे स्वागत करून सन्मान केला. आदरणीय शरद पवारसाहेब हे प्रवरानगर येथील महात्मा गांधी संकुलाचे माजी विद्यार्थी असून सध्याच्या काळातील महात्मा गांधी विद्यालयाच्या गुणवत्तेविषयी प्राचार्य अंगद काकडे यांनी आमदार रोहित पवार यांना माहिती दिली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता वाढत असून विद्यार्थी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या बाबतीत उत्तुंग झेप घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी संकुलाच्या वतीने प्राचार्य अंगद काकडे यांनी आमदार रोहित पवार यांचा सन्मान केला. याप्रसंगी जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, सुधीर म्हस्के, माजी प्राचार्य जी. टी. गमे, प्र. पर्यवेक्षक संजय ठाकरे, डॉ. शरद दुधाट, विश्वास मोहिते, विठ्ठल म्हसे, सागर निगुडे, बाबासाहेब अंत्रे, अमोल कडू, मोहीन शेख यांच्यासह शिक्षक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने 
उपस्थित होते.

बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४

जैन स्थानकात महिला तपस्वींच्याउपवासाचे सांगता.......


जैन स्थानकात महिला तपस्वींच्याउपवासाचे सांगता
        आपल्या पुर्व पुण्याने मिळालेली धन-संपत्ती केवळ साठवुन न ठेवता, तळागळातील लोकांच्या कल्याणाकरीता वापरली गेली पाहिजे .अपरिग्रह हा भगवान महावीरांचा एक सिद्धांत आहे. त्याचे अनुकरण कऱणे आपली नैतीक जबाबदारी आहे, असे मला वाटते अशी भावना गंगापुर-खुलताबादचे आमदार व पिपाडा यांचे व्याही प्रशांत बंब यांनी बोलताना व्यक्त केली. अनंत चतुर्दशीचे व्रत कऱणा-या महिला तपस्वींच्या उपवासाचे सांगता कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

        राहाता येथील जैन स्थानकात प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा व डॉ.राजेंद्र पिपाडा परिवाराकडुन या कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते. यावेळी गंगापुर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांचा सन्मानपत्र देवुन  सत्कार करण्यात आला. यावेळी संघपती अनिल पिपाडा,डॉ.राजेंद्र पिपाडा,विजय मुथा,बन्सीलाल सोळंकी,सुनिल धाडीवाल, सुमतीलाल ताथेड,कमलनयन टाकी, नेमीचंद लोढा, राजेश भन्साळी,पुखराज पिपाडा, विरेश रुणवाल आदी यावेळी उपस्थित होते.

        यावेळी पुढे बोलताना आमदार बंब म्हणाले की, आपल्या इंद्रीयांवर ताबा ठेवुन त्याच्यावर विजय मिळवता येतो म्हणुन जय जिनेंद्र म्हणतात. व्रत उपवास असे करा की त्यात तल्लीन होता आले पाहिजे. तरच खरा उपवास घडतो असे मला वाटते. जैन समाज हा जगाच्या पाठीवर सर्वांत जास्त प्रगती केलेला समाज आहे त्यामुळे आपली जबाबदारीही जास्त आहे .याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. फक्त चुल आणि मुल न पहाता गृहिणीनी घराच्या बाहेर पडुन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन काम केले पाहिजे.

        ज्या कुटुंबात चार पिढ्या एकाच वेळी नांदत असतात असेच कुटुंब या कार्यक्रमाचा लाभ घेवु शकतात आणि पिपाडा परिवार खरच सौभाग्यशाली आहे त्यांना या कार्यक्रमाचा लाभ मिळाला. अशी भावना सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बागरेचा यांनी व्यक्त केली.

        यावेळी श्रृती पिपाडा,प्रवीण बागरेचा, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४

आमदार बबनदादा पाचपुते विधानसभा सदस्य श्रीगोंदा मतदार संघ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा वाढदिवस निमित्त सत्कार

आमदार बबनदादा पाचपुते विधानसभा सदस्य श्रीगोंदा मतदार संघ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा वाढदिवस निमित्त सत्कार
शिर्डी प्रतिनिधी

शिर्डी आमदार बबनदादा पाचपुते विधानसभा सदस्य श्रीगोंदा मतदार संघ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला सत्कार करताना दिगंबर कोते पाच वर्ष सरपंच शिर्डी ग्रामपंचायत दहा वर्ष संचालक गणेश सहकारी कारखाना आप्पासाहेब कोते मा चेअरमन शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी शिवाजी पवार लहानु यादव मधुकर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते

मंदिर सुरक्षा चे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील हवालदार योगेश पाटोळे यांचा प्रामाणिकपणा

मंदिर सुरक्षा चे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील हवालदार योगेश पाटोळे यांचा प्रामाणिकपणा

शिर्डी प्रतिनिधी 

दिनांक 14/09/2024 रोजी व्ही आय पी गेट वर पोलीस बंदोबस्त करिता असणारे मंदिर सुरक्षा चे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील हवालदार श्री योगेश पाटोळे यांना एक लेडीज पर्स सापडली होती. पर्स मध्ये ३९५०/- रुपये सापडले ते पैसे त्यांनी संरक्षण ऑफिसमध्ये जमा केले.

VIP गेट नंबर दोन येथे सापडलेली पर्स महिला साई भक्त भूमिका प्रतीक राठोड रा. कांदिवली वेस्ट मुंबई यांची असल्याचे समजल्याने ओळख पटवून ३९५० रुपये परत केले.

आज रोजी प्रामाणिक पोलीस हवालदार श्री. योगेश पाटोळे यांचा यथोचित सत्कार केला. पोलीस म्हणजे अप्रामाणिक, नकारात्मक हीच बाजू कायम समाजाने पाहिलेली असते. परंतु आजही मोठ्या प्रमाणावर प्रामाणिक आणि आपल्या वर्दीशी इमान असणारे पोलीस आहेत. याची प्रचिती येत असते.हवलदार योगेश पाटोळे यांचा प्रामाणिक पणामुळे साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी अभिनंदन केले

साईयोग गणेशाला पर्यावरणपूरक निरोप.


साईयोग गणेशाला पर्यावरणपूरक निरोप.

राहाता-

राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.आज शेवटच्या दिवशी गणेशाचे पर्यावरण पूरक विसर्जन करण्यात आले.सकाळी टाळांच्या गजरात पालखीतून श्रींची लोकरूची नगर ते छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.भगवे फेटे परिधान करून टाळांच्या गजरात श्रीगणेशाचा जयघोष करणारे गणेशभक्त सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.तसेच रिंगण करून फुगडी खेळत सर्व सदस्य आनंद घेत होते.छत्रपती व्यापारी संकुल समोर माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रीगणेशाचे मोठ्या बादलीत विसर्जन करण्यात आले.तत्पूर्वी साईयोग फाऊंडेशनचे सदस्य रविंद्र धस यांनी गुजरातहून आणलेल्या नर्मदा नदीच्या पाण्याने अभिषेत करण्यात आला.यावेळी दहा दिवस मनोभावे पूजन केलेल्या गणरायांना निरोप देताना सर्वच भावुक झाले होते.गणरायाची मूर्ती शाडूची असल्याने ती विरघळल्यानंतर ते पाणी फाउंडेशनने पूर्वी लावलेल्या झाडांना देण्यात आले.
आदल्या दिवशी सत्नारायण पूजा करून महाप्रसाद ठेवला होता.यावेळी शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या हस्ते सपत्नीक गणरायांची आरती करण्यात आली.महाप्रसादाला अलोट गर्दी लोटली होती.
याप्रसंगी पत्रकार बाळासाहेब सोनवणे,संदीप वाव्हळ,राजूभाई पठाण,सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे,साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे,डॉ पांडुरंग गुंजाळ,डॉ संतोष मैड,डॉ किरण गोरे,सर्जेराव मते, भरत दवंगे,डॉ विनय पाटील,डॉ गोकुळ शिंदे,डॉ सुनील उगले,डॉ अमोल बेद्रे,डॉ आशितोष मैड,डॉ अजिंक्य पानगव्हाणे,ॲड.गोरख दंडवते, ॲड.दत्तात्रय धनवटे,ॲड स्वप्नील जोरे,अक्षय काळे,भाऊसाहेब बनकर,बाळासाहेब गाडेकर,विलास वाळेकर,संजय बाबर,व्यंकटेश अहिरे,बबलू फटांगरे,राजेंद्र बांगर,संजय वाघमारे,आकाश पुंड,,उमेश लुटे,राजेंद्र वायकर,प्रताप गमे,दीपक दंडवते,अनिल सातव,दीपक गाडेकर,रंगनाथ सदाफळ,अंकुश गांधी,अण्णासाहेब कांदळकर,सुभाष दंडवते,विष्णू गाडेकर,अशोक वाघ,नारायण गाडेकर बाळासाहेब तारगे संतोष बावके, ज्ञानू गाडेकर,विठ्ठल निर्मळ,पांडुरंग गायकवाड,आप्पासाहेब माळवदे,भानुदास गाडेकर,मयुर दवंगे,प्रणव लावर,नामदेव गवते,परमेश चव्हाण,अर्जुन चव्हाण,सुनील गायकवाड,देविदास नागरे,शिवाजी आनप,मिलिंद बनकर,सार्थक तुपे नंदकुमार डुंगरवाल,गोटुशेठ रायसोनी,अमोल पिपाडा,सतीश आत्रे,विरेश रुणवाल,सुनील पिपाडा,तुषार मुथा,पंकज पिपाडा,गोटू सदाफळ,प्रभाकर डांगे,रामहरी डांगे,सुभाष डांगे,सदाशिव डांगे,माऊली आरणे,बाळासाहेब गुंजाळ,भानुदास जायभाय, माजी नगरसेविका अनुराधा तुपे,डॉ,अंजली पानगव्हाणे,डॉ गोरे,रूपाली दवंगे,आशा पिपाडा,सुष्मिता चव्हाण,उज्वला गाडेकर,पूजा दवंगे,गौरी नागरे,रूपाली अहिरे,मंगल फटांगरे,ताईबाई निर्मळ,रूपाली पिपाडा,वैष्णवी पिपाडा,सुजाता पिपाडा,योगिता मुथा,जयश्री पिपाडा,प्रीती पिपाडा,सीमा बागुल,मोहिनी सदाफळ,प्रीतम सदाफळ,संजय चिकळकर,गजानन भुरके,सचिन सोनवणे,भास्कर जाधव,अवधूत अहिरे,देवांश अहिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 
साईयोग फाउंडेशनच्या इतर सामाजिक कार्या बरोबरच या साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य भरत दवंगे,मनोज पिपाडा,रविंद्र धस, बबलू फटांगरे यांची संकल्पना व प्रयत्नातून हवा,पाणी व ध्वनीचे प्रदूषण टाळून साकारलेल्या या आगळ्यावेगळ्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे सर्वत्र कौतुक होत आहे.पर्यावरणाच्या रक्षणासाठी या पद्धतीने सर्वांनी गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज आहे.
डॉ बापूसाहेब पानगव्हाणे 
अध्यक्ष,साईयोग फाउंडेशन राहाता

महाराष्ट्रातील इतर गणेश मंडळे त्यांच्या उपक्रमाचे आदर्श घेतील - माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

महाराष्ट्रातील इतर गणेश मंडळे त्यांच्या उपक्रमाचे आदर्श घेतील - माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

राहाता-
    शनिचौक गणेश मित्रमंडळाने डीजे, फटाके व गुलाल हद्दपार करत धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केले. गणेश उत्सवात आनंदाचे वातावरण निर्माण केले महाराष्ट्रातील इतर गणेश मंडळे त्यांच्या उपक्रमाचे आदर्श घेतील अशी भावना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाघचौरे, खासदार भास्करराव भगरे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, माजी आमदार सुधीर तांबे, कृषी भूषण प्रभावती घोगरे व इतर मान्यवरांच्या हस्ते शनि चौक गणेश मित्रमंडळाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करत शनिरत्न पुरस्कार देऊ सन्मानित केले.कीर्तन महोत्सव, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबीर, अनाथ मुलांना मदत, महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान अशा विविध प्रकारचे सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवून मंडळाच्या सदस्यांनी शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. 
यावेळी आ. थोरात म्हणाले, या धार्मिक गणेशोत्सवात अतिशय सुरेख नियोजन या मंडळाच्या सदस्यांनी केले आहे. खरतर महाराष्ट्रात प्रथमच डी.जे गुलाल, फटाके मुक्त असा गणेश उत्सव या मंडळाने विविध उपक्रम व धार्मिक कार्यक्रम हाती घेऊन साजरा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर मंडळे निश्चितच या मंडळाचा आदर्श घेऊन या निर्णयाची नोंद घेतली पाहिजे.
यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, मंडळाने स्तुत्य असे विविध स्पर्धा, सामाजिक उपक्रम व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले. याठिकाणी टाळ, मृदूंग, भजन किर्तनाच्या तालावर तसेच बाल कीर्तनकार, टाळकरी, वारकरी यांच्या उपस्थितीत अतिशय भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा केला जात आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. समाजात योगदान देणाऱ्या सत्कारमूर्ती यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले हे अभिमानास्पद आहे. याची संपूर्ण महाराष्ट्र दखल घेईल. 
खा. भाऊसाहेब वाकचौरे, खा. भास्करराव भगरे, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, सौ. प्रभावती घोगरे, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशचे माजी अध्यक्ष व संचालक अॅड. नारायणराव कार्ले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना योगेश बोठे यांनी मांडली तर अनुमोदन निलेश कार्ले यांनी दिले. प्रास्ताविक रणजित बोठे यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष अनिल बोठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यावेळी गणेशचे चेअरमन सुधीर लहारे, धनंजय गाडेकर, अॅड. पंकज लोंढे, सुधीर म्हस्के, भगवानराव टिळेकर, संपत हिंगे, बाबासाहेब डांगे, नानासाहेब नळे, महेंद्र गोर्डे, अनिल गाढवे, बाळासाहेब चोळके, विष्णूपंत शेळके, आलेश कापसे, गंगाधर डांगे, अभिषेक बोरसे, नितीन कोल्हे, चंद्रशेखर कार्ले, नितीन सदाफळ, दत्तात्रय सदाफळ, विजय सदाफळ, सोपान हिंगे, प्रतीक हिंगे, सचिन मेचे, सचिन खरपस, अभिजित बोठे, अमोल सदाफळ, दीपक सदाफळ, कुमार सदाफळ, साईनाथ जाधव, भोजराज चौधरी, रवी सदाफळ, अमोल लोहाटे, धीरज सोनवणे, कैलास मेचे, रवींद्र मेचे, किरण लांडगे, धीरज कार्ले तसेच आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर, पुरस्कारार्थी तसेच गणेश व शनि भक्त, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

रविवार, १५ सप्टेंबर, २०२४

दत्त नगरातील स्वस्त धान्य दुकानात गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा वाटप

दत्त नगरातील स्वस्त धान्य दुकानात गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा वाटप

शिर्डी प्रतिनिधी :

सामोडे प्रतिनिधी  सामोडे येथील दत्त नगरातील स्वस्त धान्य दुकानात गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला स्वस्त धान्य दुकान नंबर165 येथे भाजपाचे पिंपळनेर मंडळ कोषाध्यक्ष नियोजित पिंपळनेर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दिलीप घरटे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा किट वाटप करण्यात आले यावेळी दुकान मालक श्री आर एस वाघ दादा वाघ जगन्नाथ साळवे तसेच लाभार्थी श्री पुरुष यांनायात आले गावातील300 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे  महाराष्ट्र शासनाचे जनतेने आभार मानले आहेत.

विश्वस्तरीय ऑनलाईन लेखन स्पर्धा 2024 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन :- गंगाधर मुटे

विश्वस्तरीय  ऑनलाईन लेखन स्पर्धा 2024  मध्ये  सहभागी होण्याचे आवाहन :- गंगाधर मुटे
     

  कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण तथा शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी
यांच्या ८९  व्या जयंतीदिनानिमित्त (३ सप्टेंबर २०२४)  
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य परिषदेने सालाबादप्रमाणे या ही वर्षी  "विश्वस्तरीय लेखन स्पर्धा 2024 " चे आयोजन केले आहे. यावर्षी शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे " शेतमालाचा भाव " हा विषय ठेवण्यात आला असून या विषयावर  दोन हजार शब्दापर्यंत लिहिण्याची मर्यादा दिली गेली आहे. या  स्पर्धेचे चार लेखनप्रकार असतील : 
1)गद्यलेखन स्पर्धा-२०२४ यात  ललितलेख , कथा , वैचारिक लेख , मागोवा , शोधनिबंध  हे प्रकार असतील.
2) पद्यलेखन स्पर्धा-२०२४,  यात  पद्यकविता , छंदमुक्त कविता , छंदोबद्ध कविता , गझल , गेय रचना/गीत (पोवाडा इत्यादी) हे काव्याचे प्रकार असतील.
3) अनुभवकथन स्पर्धा-२०२४  यात  सुखद अनुभव ,  दुःखद अनुभव हे प्रकार असतील. 
4) समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०२४ यात पुस्तक समीक्षण ,ललित लेखांचे समीक्षण, कवितेचे रसग्रहण या साहित्याचा समावेश असेल. 
                    समीक्षणासाठी व रसग्रहणासाठी पुस्तकाची/लेखाची/कवितेची निवड स्पर्धकाने स्वत:च करायची आहे. मात्र  लेख/कविता "शेतमालाचे भाव" या विषयाशी साधर्म्य राखणारे असणे अनिवार्य  असणार आहे.स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.
पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात.
एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त कितीही प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. महत्तम गूण प्राप्त करणार्‍या रचनेची पारितोषिकासाठी निवड केली जाईल.  लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते. SIGN IN/LOG IN केल्याशिवाय लेखन करा ही लिंक ओपन होणार नाही. 
                   जगभरातील मराठी साहित्यिक, विचारवंत या स्पर्धेत भाग घेत असतात. आलेल्या साहित्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस हे स्मृतिचिन्ह, सर्टिफिकेट  व नामवंत, विचारवंत साहित्यिकांचे पुस्तके हे  असून बाराव्या अखील भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते  पारितोषिक वितरण होईल. सदरची विश्र्वस्तरिय लेखन स्पर्धा ही 3 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरपर्यंत  असून आपले लेखन कसे करावे यासाठी  https://www.baliraja.com/it-15 या लेखात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त साहित्यिक, साहित्यरसिक, विचारवंतांनी सहभागी व्हावे असे आवाहन  संयोजन मंडळातील श्री. गंगाधर मुटे, ला. राजेंद्र फंड, श्रीम. संगीता थोरात यांनी केले आहे.

शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

साई सद्गुरु गंगागिरीजी गुरुकुल येथे साईबाबा मंदिराची प्राण प्रतिष्ठा१५ सप्टेंबर रोजी.

लोहगाव (वार्ताहर )
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील साई सद्गुरु गंगागिरीजी गुरुकुल मध्ये साई  बाबांचे मंदिर बांधले असून सदर मंदिर  मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा  रविवारी 15 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ह .भ. प. मधुसुदन महाराज( शिर्डी ) यांच्या शुभहस्ते होणार आहे. तरी परिसरातील भावीक भक्तांनी या सोहळ्या साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान रामायणाचार्य ह. भ. प .संदीप महाराज चेचरे यांनी केले आहे.

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४

रयत शिक्षण संस्थेचे श्री गणेश विद्यालय गणेशनगरचे जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश

रयत शिक्षण संस्थेचे श्री गणेश विद्यालय गणेशनगरचे जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश
 

आज दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बुद्रुक या शाळेत स्वर्गीय माधवराव खर्डे पाटील स्मृती प्रित्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये श्री गणेश विद्यालय गणेशनगरची विद्यार्थिनी कुमारी गौरी किरण घोगळ इयत्ता आठवी या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
 या विद्यार्थिनीचे स्कूल कमिटीचे सदस्य रावसाहेब गाढवे पाटील, गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे पाटील, दादासाहेब गाढवे पाटील, अण्णासाहेब कोते पाटील, संदीप भाऊ गाढवे पाटील, जयभाऊ कालेशेठ,विद्यालयाचे  मुख्याध्यापक आदरणीय वसावे के.के.सर परिसरातील सर्व शिक्षणप्रेमी यांनी व सर्व शिक्षकांनी गौरीचे व पालकांचे विशेष अभिनंदन केले.
 या विद्यार्थिनीला विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

गोदावरी कालव्यांना मंजूर असलेले पाणी पूर्ववत देऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी एरिगेशनद्वारे ठोस उपाययोजना कराव्यात. ......विवेक कोल्हे

राहाता (वार्ताहर) सन 2011-12 पासून जलसंपदा विभागाने गोदावरी कालवे लाभ क्षेत्रातील ब्लॉकला मुदतवाढ दिलेली नाही. ते स्थगित ठेवलेले आहे. चालू वर्षी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे व वैतरणा सॅडल गेटचे काम प्रगतीपथावर आहे. शासनाने पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात ओळखण्यासाठी तरतूद केलेली आहे त्यामुळे चालू हंगामापासून ब्लॉकवरची स्थगिती  उठून सर्व ब्लॉक पूर्वत चालू करावे जेणेकरून शेतीसाठी शाश्वत पाणीपुरवठा होऊ शकेल अशी मागणी गणेश साखर कारखान्याचे मार्गदर्शक, युवा नेते विवेक कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केले आहे 

पत्रकात कोल्हे यांनी म्हटले आहे की, पाटबंधारे खात्याने खरीप हंगामात बारमाही गोदावरी कालव्यांना मंजूर असलेले पाणी पूर्ववत देऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी मायनर एरिगेशनद्वारे ठोस उपाययोजना कराव्यात.ऊर्ध्व गोदावरी खोरे हे अति तुटीची असून त्यात पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी वळविण्याच्या कामाला माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी सन 2000 मध्ये मंजुरी घेतली असून त्यावर सध्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत कामाला सुरुवात देखील केली आहे. हे काम युद्ध पातळीवर व्हावी यासाठी पुरेशा प्रमाणात आर्थिक निधीची उपलब्धता व्हावी व ब्लॉक पुनर्जीवित करावे असेही त्यांनी म्हटले आहे 
याबाबत कोल्हे यांनी पुढे म्हणाले की, जायकवाडी धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यापासून गेल्या पन्नास वर्षात फक्त चौदा वेळा हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. म्हणजेच या धरणाची विश्वासार्हता 30 टक्क्यांपेक्षा कमी आहे. मागील अनुभव लक्षात घेता वाढत्या भविष्यात पर्यावरणीय प्रदूषणामुळे पर्जन्यमान दिवसेंदिवस कमी कमी होत आहे त्यामुळे घाटमाथ्यावरील समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याचे काटेकोर नियोजन करावे जेणेकरून भविष्यात शेती व पिण्याच्या पाण्यासाठी बारमाही गोदावरी कालव्यांना पाण्याची टंचाई जाणवणार नाही व ब्लॉक देखील चालू राहतील तेव्हा बारमाही गोदावरी कालवे लाभ लाभधारक शेतकऱ्यांसह लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी वरील उपाय योजना तात्काळ अमलात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे 

तुटीच्या गोदावरी खोऱ्यात पाण्याची समृद्धी व्हावी व गोदावरी कालव्यांना कमी पडणारे 11 टीएमसी पाणी पूर्ववत निर्माण व्हावी यासाठी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी आळंदी, पालखेड, वाघाड, कश्यपी, वालदेवी, गौतमी गोदावरी, भाम, भावली तसेच मुकणे धरणाची उंची वाढ ही कामे प्राधान्याने पूर्ण करून वाढत्या औद्योगिक व नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळविले. मात्र 2005  समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याने 2012 पासून बारमाही गोदावरी कालव्यांना त्याच्या झळा बसण्यास सुरुवात झाली. त्याच्या आधीपासून व समन्यायी कायद्यानंतर माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी हक्काच्या पाट पाण्यासाठी रस्त्यावर येत स्वतःच्या शासनाविरुद्ध अनेक आंदोलने केली. सर्व पक्षीय नेत्यांनी नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा असा प्रादेशिक वाद निर्माण न करता पाण्यासाठी सर्वांनी एका झेंड्याखाली यावे असे आवाहनही अनेक वेळा केलेले आहे असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

बिहार राज्य येथील मा. ना.श्री.मंगल पांढेजी आरोग्यमंत्री शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते,त्यांचा सत्कार इंडिया लॅबोरेटरी ऑफिसर असोसिएशन चे राज्याध्यक्ष डॉ.संजय उबाळे व टीम यांनी केला

बिहार राज्य येथील मा. ना.श्री.मंगल पांढेजी आरोग्यमंत्री शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते,त्यांचा सत्कार  इंडिया लॅबोरेटरी ऑफिसर असोसिएशन चे राज्याध्यक्ष डॉ.संजय उबाळे व  टीम यांनी केला
बिहार येथील आरोग्यमंत्री यांचा शिर्डी येथे सत्कार अखिल भारतीय प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माननीय नामदार श्री मंगलजी पांडे यांचा सत्कार अखिल भारतीय प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय उबाळे व त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांनी केला 
दिल्लीत होणाऱ्या कॉन्फरन्स साठी 20 व 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले  महाराष्ट्रातील व बिहार मधील प्रयोग शाळेसाठी असणाऱ्या सोयी सुविधा व इतर बाबीवर चर्चा करण्यात आली. सन्माननीय मंत्री यांनी ऑल इंडिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आपुलकीने चौकशी करून विचारपूस केली त्याबद्दल ऑल इंडिया संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे 
या प्रसंगी अखिल भारतीय प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे सरसचिव माननीय देवेंद्र प्रसादजी, ऑल इंडिया संघटनेचे झोनल सेक्रेटरी श्री रामेश्वरजी लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व टीम काम करत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मंत्री महोदयाची भेट शक्य झाली 
याप्रसंगी अहील्यानगर जिल्हाध्यक्ष रामचंद्र घनगाव व उपाध्यक्ष उल्हास गलांडे, बाबासाहेब गाडेकर ,योगेश धावणे व इतर सभासद उपस्थित होते

बुधवार, ११ सप्टेंबर, २०२४

लेख खंडोबाचा

लेख  खंडोबाचा
श्री खंडोबाचे नि:स्सीम  भक्त व पुजारी असलेले म्हाळसापती यांनी आपले बहुतेक आयुष्य श्री खंडोबा मंदिर नीं श्री साईबाबा यांच्यासोबत घालवले.  म्हाळसापती यांच्या शिवाय  साईलाही राहता आले नाही. कारण म्हाळसापतीच्या माध्यमातून बाबांची खरी ओळख साऱ्या जगाला झाली. आणि म्हाळसापतीद्वारा  दिलेले "साई" हे नाव सहजतेने बाबांनी स्वीकारले. कोणतीही औपचारिकता नाही, पूर्वकल्पना नाही, फक्त म्हाळसापतीच्या तोंडून "साई" शब्द बाहेर पडले आणि लोक त्या फकीरला "साई" नावाने हाक मारू लागले. म्हालसापती, कांशीराम शिंपी आणि आप्पा जागले हे तिघे शिडीमध्ये संत, महात्मा, फकिर, मौलवी यायचे त्यांची सारी व्यवस्था करायचे,  त्यांची सेवा करायचें,त्यांची सर्व व्यवस्था करायचे आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करायचे.या गोष्टीवर ते लक्ष देत होते. 

अंदाजे १८५४ साली  एके दिवशी दुपारी काही बैलगाड्या धूपखेडा हून (औरंगाबाद )निघाल्या आणि शिर्डीत दाखल झाल्या. चांद पटेल धुपखेडा गावचे पाटील, गावातील इतर लोक, आणि फकीरासारखा दिसणारा तेजपुंज सुंदरसा  तरुणही त्या वऱ्हाडा बरोबर होता म्हाळसापती यांच्या शेतात बैलगाड्या मुक्कामी होत्या,जिथे त्यांचे खळं होते, (खळं म्हणजे शेतातील पीक लावणी  करून मळणी करण्याची जागा) 
सगळे लोक आपापल्या कामात व्यस्त होते, तो तेज पुंज तरुण एकटाच  खंडोबाच्या मंदिराकडे चालायला लागला असे मानले जाते की खंडोबा स्वतःच त्यां फकिराला हाक मारतो जणू ते त्यांची वाट पाहत होते, जेव्हा तो तेजपुंज तरुण खंडोबा मंदिराकडे चालत येतो तेव्हा त्या सत्पुरुषाची व म्हाळसापतीची भेट होती यावेळी जणू काही सर्व ग्रह एकत्र येतात आणि त्यांना जोडतात. तो तेजस्वी तरुण पुढे सरकताच स्वतः म्हाळसापती स्वंय पूजेचे ताट घेऊन मंदिरातून बाहेर येतात.आणि समोर येऊन म्हणतात "!! या साई !!"त्या दिवसापासून बाबा साई हे नाव स्वीकारतात 
साईंसोबत रोज एकटे राहणाऱ्या भक्तांमध्ये म्हाळसापतींचे नाव सर्वप्रथम येते. रोज रात्री साई , म्हाळसापती आणि तात्या रात्री उशिरापर्यंत मशिदीत (द्वारकामाई )कुठल्या ना कुठल्या विषयावर भरपूर गप्पा मारत. मग तिघेही तिथेच झोपायचे. कधी-कधी रात्री झोपेतून उठल्यावर म्हाळसापतीना म्हणाले की बाबा वर, "मशिदीच्या छतावर जुन्या खुंट्यांनी टांगलेल्या लांबलचक लाकडी फळीवर बाबा झोपलेले दिसायचे,सात-आठ फूट वर, बाबा कधी गेले ? ते कधी खाली आले ?" त्याला कोणी खाली येताना पाहिले नव्हते आणि अगदी मनातल्या मनात म्हाळसापती यांनी बाबांना विचारले होते.पुढे बाबांनी ती फळी तोडून टाकली.

1886 साली मार्गशिर्ष पौर्णिमा च्या दिवशी बाबा तीन दिवस ब्रम्हाडी जाण्यापुर्वी म्हाळसापतींना बाबांनी बोलावून घेतले व बोलले माझ्या पार्थिव नश्वर देहाची काळजी घ्या - मी त्यांना या विश्वात सोडत आहे. मी नक्कीच तीन दिवसांनी परत येईन,असे म्हाळसापती यांना बाबांनी सांगितलं त्यांच्या भक्तीवर बाबांना अपार विश्वास होता. म्हाळसापती यांच्या मांडीवर  डोकं ठेवून बाबांनीं श्वास सोडला - दोन दिवस बाबांचा श्वास परत आला नाही, तेव्हा त्यांच्या मृत्यूची घोषणा झाली. तिसरा दिवस उजाडला तेव्हा गावात हिंदू-मुस्लिम धर्मगुरू तसेच बाबा विरोधी मंडळी मधील तणाव आणखी वाढला. बाबांचा अंत्यविधी करण्याचा अतोनात प्रयत्न झाला परंतु त्यावेळी म्हाळसापती च्या मागे खंबीर पणे हे महान साईभक्त तात्याबा , रामचंद्रदादा, शामा, काशीराम शिंपी या सारखे बरेच साई भक्त उभे राहिले. काही मुस्लिमांनी व बाबा विरोधी मंडळी नी बाबांना जाळून अथवा दफन करण्याची पूर्ण व्यवस्था केली होती. पण म्हाळसापतीना पूर्ण विश्वास होता, की बाबांचा शब्द कधीच खोटा होत नाही - जोपर्यंत कोपरगाव दरबाराचे (कोर्ट) अधिकारी येत नाहीत;तोपर्यंत मृतदेह कोणाच्याही ताब्यात दिला जाणार नाही असा पवित्रा सर्व भक्तांनी घेतला या वादातच तिसरा दिवस पूर्ण झाला नीं बाबांनी डोळे उघडले आणि म्हाळसापतींकडे पाहून म्हणाले, " जात नाही, कोणीही दुनिया पासून दूर चालत"!.
 खऱ्या भक्तीचा परिचय देऊन म्हाळसापतीने साईबाबांचे मस्तक तथा डोकं तीन दिवस जमिनीवर ठेवले नाही. आणि ते कोणाच्याही हाती दिले नाही. त्याचा विश्वास जिंकला होता. बाबांच्या शब्दांचा विजय झाला होता. बाबांना जिवंत पाहून सर्व भक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.  त्यानंतर जवळपास 32 वर्ष साई नीं या शिर्डीच्या भूमीवर  आपले कार्य केले.
आजही भाविक प्रथम श्री खंडोबा च्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. व नंतर श्री साईबाबा च्या दर्शनाला जातात जसे प्रथम बाबा खंडोबाच्या दर्शनाला आले होते, तसेच भाविकही  सर्वप्रथम खंडोबाच्या मंदिरात येतात.
म्हाळसापती फार वयोवृद्ध झाले होते. दृष्टीचें तेज ही मंद झाले होते वृद्धावस्थेमुळे ते चालू शकत नव्हते. पण मुलगा मार्तंडरावा च्या पाठीवर बसून मशीदीत दिवसातून एकदा तरी ते बाबांना भेटायला नक्की येत असत. 
श्री साईबाबा व श्री म्हाळसापती या दोघांमधील प्रेम सदैव जिवंत होते. ते दोघे ही पुराणकथा व 
इतर धार्मिक विषयांवर त्यांना चर्चा करायला नेहमीच आवडत होते. आणि त्यामुळे बाबा त्यांचे ऐकायचे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्री म्हाळसापती ही अशी एकमेव व्यक्ती होती जी बाबांच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावत असत. बाकीचे भक्त ते फक्त मानेवर किंवा छातीवर लावू शकत होते. याचमुळे म्हाळसापती हे एकमेव श्रेष्ठ भक्त होते.श्री साईबाबांच्या आगमनापासून ते त्यांच्या समाधी पर्यंत संपूर्ण साई बाबांचा सहवास त्यांना लाभला अविरत बाबा आणि खंडोबाची सेवा करून भक्तांच्या मनावर उंच स्थान प्राप्त केले.आजही श्री म्हाळसापती हे नाव बाबांशी जोडले जाते. मरण्यापूर्वी त्यांना "मल्हारी महात्म्य" एकायचे होते ते ऐकताच त्यांनी  प्राणाची आहुती दिली. ,
त्यांचे पुत्र मार्तडराव यांनी मंदिरातील पूजा अर्चा करण्याची जबाबदारी स्वत:वर घेतली.अशा महान श्री साई परमभक्त म्हाळसापती यांचे मंगळवार १२ सप्टेंबर १९२२ रोजी निधन झाले. अविरत बाबा आणि खंडोबाची सेवा करून भक्तांच्या मनावर उंच स्थान प्राप्त केले.आज त्यांची 102 वी पुण्यतिथी निमित्ताने हा लेख 
शब्दांकन  श्री म्हाळसापती यांचे पंतू 
संदिप मनोहर नागरे

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...