सोमवार, ३० जून, २०२५

साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने पुन्हा गुणवंत गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनीना सायकल वितरण.

 साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने पुन्हा गुणवंत गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनीना  सायकल वितरण. 


श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने शिर्डी शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या  गुणवंत गरजू विद्यार्थी/ विद्यार्थिनींना आज दि. २९ जून २०२५ रोजी सायकल वाटप  करण्यात आले. ट्रस्ट चे अध्यक्ष अरुणराव शिंदे- गायकवाड पा.यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी सौ. संगीता गायकवाड पा. श्री. साईराज अरुणराव गायकवाड पा. व सहपरिवार तसेच  रमेश गोंदकर पाटील जिल्हा उपाध्यक्ष- अहिल्यानगर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,संग्राम कोते पाटील ,प्रदेश सरचिटणीस- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,दीपक गोंदकर पाटील 



शिर्डी शहर अध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,निलेश शिंदे पाटील 
युवक अध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,सचिन सोपान गोंदकर पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,
शंतनू सुगवेकर माजी क्रिकेटपटू 
अनिल वाल्हेकर माजी  क्रिकेटपटू,खंडोबा मंदिर चे अध्यक्ष संदीप नागरे, शिव छत्रपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष अशोक भाऊसाहेब गायके पा.
शिवा गोंदकर पाटील- उद्योजक 
अभिजीत गोंदकर ,पाटील-उद्योजक अजित जगताप पा.,राहुल फुंडे ,संकेत बोराडे ,अमोल सुपेकर ,
गंगाधर वाघ,आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी ट्रस्ट च्या कार्याचे भरभरून कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. शिक्षणसाठी होणारी गैरसोय दूर केल्याने पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हिचं आमच्या कामाची पोहच पावती आहे. शैक्षणिक कामासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना आमच्या ट्रस्ट चे नेहमीच सहकार्य राहील असे ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे-गायकवाड पा. यांनी बोलताना सांगितले.

साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने पंधरावे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मा वाटप शिबिर यशस्वीरित्या संपन्न*- नेत्रसेवा हीच साईसेवा

 साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने पंधरावे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मा वाटप शिबिर यशस्वीरित्या  संपन्न*- नेत्रसेवा हीच साईसेवा



श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल मुंबई यांच्या सौजन्याने  दिनांक 29 जून 2025 रोजी  पंधरावे मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर साई9 ग्रुप कार्यालय शेजारील अयोध्या हॉस्पिटलच्या जागेत पिंपळवाडी रोड शिर्डी येथे पार पडले.
यावेळी उपस्थित शंकरा आय हॉस्पिटल चे श्री विश्वनाथ पाटील व  साई दृष्टी ऑप्टिकल चे श्री साई सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
29 जून रोजी संपन्न झालेल्या शिबिरात  जवळपास 1600 रुग्णांची मोफत तपासणी होऊन  रूग्णांना मोफत चष्मा वाटप केले व 48 पेशंट ला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी पनवेल येथे नेण्यात आले. शिर्डी शहर व परिसर तसेच, ठाणे,कल्याण, मालेगाव, अहिल्यानगर ,येवला, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी नाशिक,राहाता, कोपरगाव, धुळे आशा अनेक ठिकाणांहून आत्तापर्यंत 14650 पेक्षा जास्त गरजू व वयोवृद्ध  रुग्णांनी शिबिरांचा लाभ घेतला. व आत्तापर्यंत  2050 पेशंट ची  मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया  शंकरा आय हॉस्पिटल पनवेल मुंबई येथे  यशस्वीरित्या पार पडली. ट्रस्ट चे हे कार्य अल्पावधीतच  भारतात नावारूपास आले असून ट्रस्ट च्या वतीने  अशा  प्रकारची सेवा ट्रस्ट च्या वतीने अविरतपणे सुरू राहील. पुढील २७ जुलै २०२५ रोजी होणार्‍या १६व्या मोफत शिबीराचा लाभ देशातील अनेक  गरजूंनी घ्यावा असे आवाहन  ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे- गायकवाड पाटील यांनी केले.  ट्रस्ट च्या विश्वस्त सौ.संगीता गायकवाड पाटील व साई9 ग्रुप चे संचालक श्री साईराज गायकवाड पाटील यांच्या विशेष परिश्रमाने कार्यक्रम सुरळीत पार पडला.



याप्रसंगी  रमेश गोंदकर पाटील 
जिल्हा उपाध्यक्ष- अहिल्यानगर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,संग्राम कोते पाटील ,प्रदेश सरचिटणीस- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,दीपक गोंदकर पाटील 
शिर्डी शहर अध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,निलेश शिंदे पाटील 
युवक अध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,सचिन सोपान गोंदकर पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,
शंतनू सुगवेकर माजी क्रिकेटपटू 
अनिल वाल्हेकर माजी  क्रिकेटपटू,खंडोबा मंदिर चे अध्यक्ष संदीप नागरे, शिव छत्रपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष अशोक भाऊसाहेब गायके पा.
शिवा गोंदकर पाटील- उद्योजक 
अभिजीत गोंदकर ,पाटील-उद्योजक अजित जगताप पा.,राहुल फुंडे ,संकेत बोराडे ,अमोल सुपेकर ,
गंगाधर वाघ,आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढील शिबिरासाठी नावनोंदणी करिता संपर्क:
मो. 8055855445 / 7030035445

रविवार, २९ जून, २०२५

साई भक्तांकडून सावळविहीर बुद्रुक केंद्र शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

साई भक्तांकडून सावळविहीर बुद्रुक केंद्र शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

.
ठाणे येथील साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे आले होते, त्यावेळी त्यांनी सावळविहीर बुद्रुक केंद्र शाळेत भेट दिली. शाळेतील परिसर, विद्यार्थी, शैक्षणिक वातावरण त्यांना अतिशय भावले. त्यामुळे त्यांनी शाळेतील मुलांना रंगपेटी, नॅपकिन, चॉकलेट, चित्रकला वही ,पट्टी, पेन्सिल ,खोड रबर, शार्पनर ,पेन, पेन पाऊच आणि बिस्किट पूडे मुलांना वाटले .शाळेतील मुलांशी खूप छान प्रकारे हितगुज करून मुलांना योगाचे महत्व, चांगल्या सवयी, चांगला अभ्यास ,या विषयावर मार्गदर्शनही केले .त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी शाळेविषयी व गावाविषयी गौरवोदगार काढले. आरोग्यधन योगाभ्यास या नावाने ते चर्चासत्र आयोजित करून पालकांना ,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना विविध प्रकारचे सेमिनार आयोजित करत असतात. सप्टेंबर महिन्यात देखील सावळविहीर बुद्रुक गावातील पालकांना एकत्र करून पालकत्व याविषयी सखोल असे मार्गदर्शन करून योगाचे मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने नरेंद्र गांधालीकर ,विनोद पितळे, राजेश वैद्य ,निलेश वाजे ,अवंती परब ,मीना वैद्य ,रोहिणी पितळे, ,नंदिनी वाजे या साई भक्तांचा समावेश होता. 



शाळेत आल्याबरोबर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी साई भक्तांचे छान प्रकारे स्वागत केले. सर्वांचे सत्कार केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता गायकवाड यांनी केले तर आभार रूपाली मंद्रे यांनी मानले .प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब मेहेत्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक सिताराम गुरसळ ,विद्या गोर्डे , सुचित्रा चवाळे ,संगीता याईस ,सविता बर्डे,प्रियंका जाधव यांनी परिश्रम घेतले.

शनिवार, २८ जून, २०२५

भारतीय जैन संघटना उत्तर आहिल्यानगर मेळावा शिर्डी येथे संपन्न

  भारतीय जैन संघटना उत्तर आहिल्यानगर मेळावा शिर्डी येथे संपन्न 


महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातुन राज्यभर जलक्रांतीचे काम झाले. ओढे नाले तलाव भरल्यामुळे शेतक-यांना शेती व पशुधनासाठी नवसंजीवनी मिळाली. त्यामुळे   ब-याच अंशी गोहत्या होण्याला रोख बसला. लातुरचा भुकंप असो किंवा पुरग्रस्तांचा विषय,कोविड सारखी आपत्तीच्या काळात भारतीय जैन संघटना अहोरात्र कार्य करत होती सामाजिक कामामध्ये देशपातळीवर निस्पृहपणे काम करणारी संघटना म्हणुन भारतीय जैन संघटनेची ख्याती आहे. अधुनिक युगातील कुटुंब व्यवस्था बळकट करण्याचे काम भारतीय जैन संघचटनेच्या माध्यमातुन चालु आहे. असे मनोगत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साकला यांनी बोलताना यावेळी व्यक्त केले.
 शिर्डी येथे भारतीय जैन संघटनेचा उत्तर अहिल्यानगर जिल्हाचा मेळावा पार पाडला. यात भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय,राज्य व  जिल्हास्तरिय पदाधिकारी उपस्थित होते.भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा,भारतीय जैन संघटनेचे राज्याचे प्रमुख केतनाभाई शहा, प्रविणजी पारख,मनसुखजी चोरडीया,संजयजी शिंगवी,जिल्हाध्यक्ष आनंदजी भंडारी,सुमतीलाल गांधी,नरेशजी सुराणा,कमलेश लोढा, निलेश संकलेचा, संघपती अनिलजी पिपाडा,बीजेएसचे नेमिचंदजी लोढा, डॉ.बोरा, शहराध्यक्ष संकेतजी सोळंकी,पियुषजी सोळंकी,पुखराजजी पिपाडा,अँड.बाठीया, स्वप्निलजी भंडारीसंतोषजी लोढा,निलेशजी गंगवाल,आशिष राका,प्राजक्ता भंडारी, संतोषजी चोरडीया,ललितजी मुनावत, जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साकला, भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा,भारतीय जैन संघटनेचे राज्याचे प्रमुख केतनाभाई शहा, प्रविणजी पारख,मनसुखजी चोरडीया,संजयजी शिंगवी,जिल्हाध्यक्ष आनंदजी भंडारी,सुमतीलाल गांधी,संघपती अनिलजी पिपाडा,नरेशजी सुराणा,कमलेश लोढा, निलेश संकलेचा,बीजेएसचे नेमिचंदजी लोढा, डॉ.बोरा, शहराध्यक्ष संकेतजी सोळंकी,पियुषजी सोळंकी,पुखराजजी पिपाडाआदी यावेळी उपस्थित होते.

        यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साकलाजी पुढे म्हणाले की, समाजातील नव युवक व युतींसाठी जनजागृती व्हावी हा या कार्यक्रमाचा मुळ उद्देश होता. 21 व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आपल्या नैतीक जबाबदा-या न विसरता समाजपयोगी कार्य करत राहणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.एकत्र कुटुंब पद्धती फायद्याची होती त्यावेळी घरातील जेष्ठ सदस्यांचा आदरपूर्वक वचक होता. कुटुंब प्रमुख म्हणून तेच मुलामुलींच्या विवाहाचे निर्णय घेत होते, आता मुलामुलींच्या पसंती शिवाय पुढील निर्णय होत नाहीत. कुटुंब व्यवस्था मजबूत करण्याचे काम बीजेएसच्या माध्यमातून होत आहे. यावेळी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्या सहित इतरही वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 


      दर कार्यक्रमा प्रसंगी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा समाजातील तरुण युवकांनी अन्यायाच्या विरोधात लढले पाहिजे. घरातील जेष्ठ मंडळींनी तरुणांना धाडसी बनवले पाहिजे. गुंडगिरी व दहशत यांच्या विरोधात तरुणांनी एकत्र येवुन प्रतिकार केला पाहिजे. अहिंसेचा अर्थ अन्याय सहन करणे असा नाही. दडपशाहीला न जुमानता तरुणांनी संघटन वाढवुन पुढे येण्याची गरज आहे. धाडसी समाज असल्याची ओळख निर्माण कऱणे गरजेचे आहे. फक्त व्यापार व्यवसाय न बघता समाजिक व राजकीय क्षेत्रात येवुन आपले योगदान देणे गरजेचे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत जैन समाजाचा सिंहाचा वाटा आहे. दान धर्म असेल किंवा गो-रक्षा असेल अशा प्रत्येक क्षेत्रात जैन समाज आपले योगदान देत असतो.     
(डॉ.राजेंद्र पिपाडा)
 

शुक्रवार, २७ जून, २०२५

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध



 "शेतकऱ्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही" - काँग्रेस नेत्या सौ.प्रभावती घोगरे यांचा इशारा

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी अलीकडेच शेतकऱ्यांविषयी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात आणि शेतकरी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सत्तेची गुर्मी दाखवत शेतकऱ्यांचा अवमान करणे, हे अत्यंत निंदनीय आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस नेत्या, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी कन्या सौ. प्रभावती घोगरे यांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.


शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्याच्या घामाच्या किमतीवर सत्तेत पोहोचलेल्यांनी त्याचा अवमान करणं, हे आम्हाला कदापी मान्य नाही. आम्ही शांत बसणार नाही.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य आहे. कोणत्याही दबावाला न जुमानता आम्ही संघर्ष करत राहू. शेतकरीविरोधी प्रवृत्तींचा आम्ही पर्दाफाश करू असे मत प्रभावतीताई घोगरे व्यक्त केले.

मंगळवार, २४ जून, २०२५

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयामध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी राष्ट्रवादी काँग्रेस शिर्डी शहराध्यक्ष दीपक गोंदकर


शिर्डी 
गोरगरीब जनतेची सेवा आणि 'सर्वांसाठी आरोग्य' हे ब्रीद व्रत मानणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीतील श्री साईनाथ रुग्णालयामध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी शहर अध्यक्ष दीपक गोंदकर यांनी केली आहे. याकरिता स्वतंत्र एमआरआय आणि सिटीस्कॅन विभाग सुरू करण्याची आणि बालकांसाठी स्वतंत्र आयसीयु युनिटसह प्रौढांसाठी आयसीयु खाटांची संख्या वाढवण्याची मागणी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्याकडे अधिकृत निवेदनाद्वारे सादर करण्यात आली आहे.





दरम्यान साई संस्थानच्या रुग्णालयात महाराष्ट्रासह देशभरातून रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. विशेषतः एमआरआय व सिटीस्कॅनसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असून, रुग्णांना आठवडे, कधी कधी महिन्याभराची प्रतिक्षा करावी लागते. ही स्थिती गंभीर असून, वेळेत निदान न झाल्यामुळे उपचार विलंबाने होतात व रुग्णाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे या विभागाची स्वतंत्र सुसज्ज केंद्र रुग्णालय स्थापन करणे काळाची गरज असल्याचे गोंदकर यांनी निदर्शित केले.गर्भवती महिलांची प्रसूती, नवजात अर्भकांच्या तातडीच्या केसेस आणि गंभीर आजाराने पीडित बाल रुग्णांसाठी शिर्डीमध्ये अद्याप स्वतंत्र बाल आयसीयु उपलब्ध नाही. परिणामी अशा रुग्णांना नाशिक, पुणे किंवा मुंबई गाठावी लागते, ज्यामुळे वेळ व पैसा वाया जातो तसेच जीवित हानीचीही भीती निर्माण होते. श्री साईनाथ रुग्णालयासारख्या संस्थेत बालकांसाठी स्वतंत्र आयसीयु असणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.सध्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये प्रौढांसाठी असलेल्या आयसीयु खाटांची संख्या अपुरी आहे. जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांमुळे येथे दररोज खचाखच गर्दी असते. त्यामुळे गंभीर स्वरूपाचे रुग्ण तातडीने आयसीयु बेड न मिळाल्याने उपचारासाठी दुसरीकडे हलवावे लागतात, यामुळे रुग्ण व नातेवाईकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर आयसीयु विभागाचे विस्तारीकरण तातडीने करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.श्री साईबाबांच्या रुग्णसेवेच्या तत्वज्ञानाशी सुसंगत अशी ही मागणी असून, संस्थान प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने लावून धरली आहे. श्री साईनाथ हॉस्पिटलमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध असल्या तरी त्या रुग्णांच्या वाढत्या संख्येला पुरेशा ठरत नाहीत. त्यामुळे या योजनेला गती देऊन गोरगरिबांच्या जीवनाला आधार देण्याची गरज आहे.यासंदर्भात श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्याकडे निवेदन देऊन पुढील कार्यवाहीसाठी आग्रही मागणी करण्यात आली आहे.याप्रसंगी बाबासाहेब अप्पा कोते , रमेश ( भाऊ ) गोंदकर,निलेश दादा कोते,अमितजी शेळके,शहर अध्यक्ष दिपक गोंदकर, युवक अध्यक्ष निलेश शिंदे अनिल कोते, साई कोतकर,अमोल सुपेकर, सचिन सो.गोंदकर,अमोल गिरमे,राहुल फुंदे,रामू तिवारी,सादिक शेख,फिरोज पठाण,राजेंद्र कांबळे,गणेश कानडे व इतर उपस्थित होते.

कृष‌‌ि विभागामार्फत विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन

कृष‌‌ि विभागामार्फत विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन

तालुका कृषि अधिकारी राहाता यांच्या वतीने मौजे एकरूखे व रांजणगाव खुर्द येथे विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी प्रवीण गोसावी व तालुका कृषि अधिकारी आबासाहेब भोरे उपस्थित होते. 
     कृषि विभाग मार्फत खरीप हंगामामध्ये विविध मोहिमा राबवण्यात येत आहेत. प्रगतिशील शेतकरी गौरव गाढवे यांच्या शेतावर सीआरए पद्धतीने आंबा फळबाग लागवड‌ करण्यात आली. तसेच एकात्मिक पद्धतीने हुमणी किड नियंत्रण , सोयाबीन बीजप्रक्रियेची प्रात्यक्षिके घेण्यात आली. 
     प्रवीण गोसावी यांनी कृषी विभागामार्फत खरीप हंगामामध्ये राबवण्यात येणाऱ्या मोहिमांविषयी माहिती देऊन मोहिमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.



आबासाहेब भोरे यांनी हवामान अनुकूल शेती (सीआरए) पद्धतीने आंबा फळबाग लागवड, हुमणी एकात्मिक कीड नियंत्रण विषयी प्रात्यक्षिकद्वारे माहिती दिली. सहाय्यक कृषि अधिकारी राजेश पऱ्हे यांनी बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले व‌ प्रात्यक्षिकाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्न केले. याप्रसंगी प्रगतशील शेतकरी गोरक्षनाथ गाढवे, गौरव गाढवे, शिवाजी भवर, बजरंग गाढवे,विलास गाढवे, बाळासाहेब गाढवे, विठ्ठल ढमढेरे, नवनाथ   कार्ले, विश्वास गाढवे इत्यादी शेतकरी बांधव उपस्थित होते.

मतदारसंघातील एक स्क्वेअर फूट देखील जागा पाण्यापासून वंचित ठेवणार नाही ◻️माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही

मतदारसंघातील एक स्क्वेअर फूट देखील जागा पाण्यापासून वंचित ठेवणार नाही ◻️माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही 


◻️आश्‍वी येथे विखे पाटील कारखान्याच्या नुतन संचालकाचा सत्कार सोहळा संपन्न 


आश्‍वी, 

शेजारील कारखाना निवडणूक प्रक्रियेदरम्यान दोनशे अर्ज, नाराजीनाटय, संन्यास घेण्याची भाषा ऐकायला मिळाली. मात्र, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, कै. बाळासाहेब विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या कारखान्याच्या सभासदांचा विश्‍वास संपादन केल्यामुळे तिसऱ्यांदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत २१ जागांसाठी एकवीसचं अर्ज आले. त्यामुळे सभासदांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणामुळे आपल्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. तर, २०२९ ला विधानसभेसाठी मतदान मागण्यापूर्वी निळवंडे कालव्याच्या पाण्यापासून मतदार संघातील एक स्क्वेअर फूट जागा देखील आपण वंचित ठेवणार नाही. अशी ग्वाही पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.



संगमनेर तालुक्यातील आश्‍वी बु।। येथे डॉ. विखे पाटील कारखान्याच्या नुतन संचालकांच्या आयोजित सत्कार सोहळ्यात डॉ. विखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. शाळीग्राम होडगर होते. कारखान्याचे माजी चेअरमन कैलास तांबे, ज्येष्ठ नेते भगवानराव इलग, अशोकराव म्हसे, सरुनाथ उंबरकर, अशोक जऱ्हाड, अ‍ॅड. रोहीनी निघुते, रामभाऊ भुसाळ, सतिष जोशी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतून आलेले कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कारखान्याच्या सर्व नवनिर्वाचित संचालकाचा सत्कार करण्यात आला. तर, नुतन संचालक विजय म्हसे यांचा सन्मान करण्यात आला.

सभासदांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगताना डॉ. विखे पुढे म्हणाले की, सहकारी कारखान्याचे संचालक पद हे लाभाचे पद नसून कार्यकर्त्यानी पिढ्यानपिढ्या केलेल्या कामाची आणि दाखवलेल्या विश्‍वासाची पावती आहे. तर, संघटनेच्या हितासाठी तब्बल १८ वेळा विविध निवडणूकामधून माघार घेणाऱ्या कार्यकर्त्याचे विशेष कौतुक करताना यावेळी त्यांना संधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.



राजकीय टिप्पणी करताना ते म्हणाले की, गणेश कारखान्याचा आणि लोकसभेचा पराभव झाल्यानंतर ही शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेने मोठे मताधिक्य देऊन ना. विखे पाटील यांना विधानसभेत पाठवले. मात्र, शेजारी कामगाराच्यां माध्यमातून आपल्या मतदारसंघातील माहिती गोळा करत होते. त्यामुळे बेसावध असलेल्या शत्रुच्या घरात घुसुण पराभूत करणे सोपे झाले. असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावताना, निवडणूक संपली आहे. त्यामुळे आमच्या मनात आता कोणतीही द्वेष भावना नसून आमची लढाई ही कोणत्याही व्यक्तीशी नव्हे तर विचारांशी होती. असे स्पष्ट करुन भोजापूर चारीचे आणि साकुर उपसा योजनेचे भूमिपूजन करणार नाही, तोपर्यत संगमनेर तालुक्यात सत्कार स्विकारणार नसल्याचा पुनरुच्चार डॉ. विखे यांनी केला.

कार्यकर्त्याचे कान टोचताना ते म्हणाले की, खुर्चीचा मोह आता सोडा, शेवटी माणूस लाकडावरचं झोपून जातो असे म्हणताचं उपस्थितांमध्ये एकचं हशा झाला. संघटनेत काम करताना एकनिष्ठ कार्यकर्त्याला काही मागण्याची गरज पडणार नाही. त्याला योग्य वेळी मान सन्मान आणि पद देण्याची ग्वाही दिली. तसेच गावागावांतील कार्यकर्त्यानी अबोला आणि मतभेद न ठेवता एकमेकांशी संवाद ठेवावा आणि एकदिलाने काम करावे. असे आवाहन करताना अंबानी बंधूंच्या उदाहरणासह पटवून दिले.

दरम्यान खळी, पिंप्री - लौकी अजमपुर, अंभोरे, पिपंरणे आणि घारगाव या भागाला लवकरचं पाईप टाकून निळवंडे कालव्यांचे पाणी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, लवकरचं दुध उत्पादक शेतकऱ्यांना निम्या किंमतीत पशुखाद्य उपलब्ध करुन देणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला आहे.

***चौकट :-

संघटनेसाठी प्रामाणिक काम करत संघटनेला वाहून घेतले तर, त्यांची दखल विखे पाटील कुटुंबिय घेतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आश्‍वी बु।। येथील सर्व सामान्य घरातील तरुण विजय म्हसे यंना सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे विखे पाटील कुटुंब हे धनवान, श्रीमंत तथा मोठ्या राजकीय घराण्यालाचं संधी देतात. असे नव्हे तर, सर्व सामान्य कार्यकर्त्याला देखील संधी देत असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. तसेच जो पडल्यानंतर ही उभा राहतो, तोचं खरा नेता आणि कार्यकर्ता असतो. हे विजय म्हसे याने ग्रामपंचायत निवडणूकीनंतर दाखवून दिले आहे.

अ‍ॅड. शाळीग्राम होडगर, जेष्ठ नेते संगमनेर

सोमवार, २३ जून, २०२५


शिर्डी –
 श्री साईबाबा संस्थान  मा. तदर्थ समिती  निर्णयानुसार, २२ जुन २०२५ पासून ‘ब्रेक दर्शन’ व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. भाविकांच्या सातत्यपूर्ण मागणीनुसार व वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, मंदिरातील दर्शन प्रक्रियेला अधिक सुलभ, सुरक्षित व शिस्तबद्ध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
 सध्या जनसंपर्क विभागाकडे संपूर्ण दिवसभरात विविध शासकीय विभाग, अधिकारी , पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आजी माजी विश्वस्त आणि इतर शिफारसीद्वारे ‘प्रोटोकॉल दर्शन’ व्यवस्था मागणी केली जाते. मात्र अशा शिफारसीमुळे सामान्य रांगेतून येणाऱ्या भक्तांच्या दर्शनात अडथळा निर्माण होतो आणि सुरक्षा, पोलीस तसेच जनसंपर्क विभागावर अतिरिक्त ताण निर्माण होतो. यावर उपाय म्हणून, आता शिफारस प्राप्त मान्यवरांचे दर्शन केवळ खालील ‘ब्रेक दर्शन’ वेळांमध्येच होणार आहे,
ब्रेक दर्शन वेळापत्रक
सकाळी : ०९.०० ते १०.००
दुपारी : ०२.३० ते ०३.३०
सायंकाळी : ०८.३० ते ०९.००
ब्रेक दर्शनसाठी अनिवार्य प्रक्रिया
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विविध विभागांच्या अधिकृत प्रतिनिधींनी संस्थानच्या जनसंपर्क विभागाकडे आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.अशा नोंदणीकृत साईभक्तांनी ब्रेक दर्शन वेळेच्‍या अर्धा तास अगोदर संस्थान जनसंपर्क विभागात उपस्थित राहून सशुल्क पास प्राप्त करणे बंधनकारक असेल. सदर पासधारक साईभक्तांना केवळ जनसंपर्क विभागामार्फत निश्चित वेळेतच ब्रेक दर्शनाची सुविधा दिली जाईल.

सर्वसामान्य भाविकांसाठी पूर्ववत व्यवस्था कायम
गेट क्र. ६ (सशुल्क दर्शन) व गेट क्र. ७ (मोफत दर्शन) ही दर्शन व्‍यवस्‍था पुर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. यासह शिर्डी व पंचक्रोशीतील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्‍यक्‍ती, गर्भवती महिला, नवजात बालकांसह कुटुंबीयांसाठी निश्चित असलेले विशेष प्रवेशमार्ग पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतील.

प्रोटोकॉल अंतर्गत दर्शन सुविधा यथावत 
भारतीय गणराज्याचे आजी माजी मा. राष्ट्रपती, मा.उप राष्ट्रपती, मा. पंतप्रधान, मा.उप पंतप्रधान, सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्वोच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व इतर सर्व न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष/उपाध्‍यक्ष, केंद्रीय मंत्रीमंडळातील सर्व मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातील सर्व मंत्री, महाराष्ट्र राज्य विधानसभा/ विधानपरिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, महाराष्‍ट्र राज्‍याचे आमदार, खासदार, महाराष्ट्र राज्यासह विविध राज्‍यातील उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश व इतर सर्व न्यायाधीश, प्रसिध्‍द उद्योगपती, आंतरराष्‍ट्रीय खेळाडू, सिनेअभिनेते, शास्‍त्रज्ञ, मा.व्‍यवस्‍थापन / मा.तदर्थ समितीचे आजी माजी अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष व सदस्‍य आदि महत्वाच्या व्यक्तीं तसेच एक लक्ष रुपयांचे वरील देणगीदार साईभक्‍त यांना प्रोटोकॉल अंतर्गत दर्शन सुविधा यथावत सुरु राहील. 
श्री साईबाबा संस्थानकडून भाविकांच्या हितासाठी नेहमीच सुसूत्र, पारदर्शक व शिस्तबद्ध सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. 'ब्रेक दर्शन' व्यवस्थेमुळे, मंदिर प्रशासनावरचा तसेच तालुकास्‍तरीय इतर शासकिय यंत्रणांचा देखील ताण कमी होणार असून, सर्वसामान्य साईभक्तांना अडथळारहित व समाधानकारक दर्शन अनुभवता येईल, असा विश्वास संस्थान प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दिव्यांग सहाय्यक साहित्य वाटपात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथमस्थानी !डॉ. सुजय विखे

दिव्यांग सहाय्यक साहित्य वाटपात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथमस्थानी !
डॉ. सुजय विखे
:



 संवत्सर येथे 210 दिव्यांग, वयोवृद्धांना सहाय्यक साहित्य वाटप


कोपरगाव :

 देशातील दिव्यांगांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी योजना आणली या योजनेच्या माध्यमातून देशातील दिव्यांग, वयोवृद्धांना सहाय्यक साधने वाटपासाठी बजेटमध्ये एका वर्षाकरिता 70 कोटींची तरतूद करण्यात आली. त्यापैकी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच वर्षात 45 कोटी रुपयांची सहाय्यक साधने आणणारा देशातील एकमेव खासदार ठरलो आणि त्याच माध्यमातून सर्वाधिक चाळीस हजार लाभार्थ्यांना साहित्य वाटप करणारा अहिल्यानगर जिल्हा हा देशात प्रथमस्थानी राहिला आहे. असे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.
 


  कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे लोकनेते स्वर्गीय नामदेवरावजी परजणे पाटील यांच्या 21व्या पुण्यस्मरणानिमित्त संवत्सर परिसरातील 210 दिव्यांग, वयोवृद्धांना प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र, अहिल्यानगर यांच्यामार्फत सहाय्यक साधनांचे रविवारी (दि.22) वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. विखे पाटील अध्यक्षस्थानाहुन बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व नामदेवरावजी परजणे पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
    यावेळी व्यासपीठावर गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक नंदकुमार फुले, अहिल्यानगर प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचे कनिष्ठ व्यवस्थापक व नोडल अधिकारी कमलेश यादव, टर्शियरी सुपर स्पेशालिटी सेंटर व्यवस्थापक डॉ. अभिजित मेरेकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. दीपक अनाप, आदिनाथ ढाकणे, सरपंच सुलोचना ढेपले, उपसरपंच विवेक परजणे,तसेच विखे पाटील हॉस्पिटल, ऍलिमको (ALIMCO), संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा दिव्यांग केंद्राचे सर्व अधिकारी, लाभार्थी उपस्थित होते. 
     

यावेळी राजेश परजणे यांच्या संकल्पनेतून संवत्सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 21 विद्यार्थिनींचा सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पहिला हप्ता भरण्यात आला तसेच नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून कोमल अरुण कानडी हिने (७१.१७) टक्के, वाणिज्य शाखेतील वैशाली कचेश्वर खिलारी व पठाण परवेज इसरारखान (६९.३३), कला शाखेतील पायल संजय खटकाळे (७१.१७) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
      डॉ. विखे पाटील म्हणाले,  सर्वसामान्य माणूस आयुष्यभर कष्ट करतो. वयाच्या साठ वर्षानंतर त्यांचे जीवनमान कसं असेल, आर्थिक परिस्थितीमुळे सहाय्यक साधने घेणे शक्य होत नसेल, याचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारकाईने विचार करून ही योजना आणली आहे आणि आज याच योजनेच्या माध्यमातून देशभरात मोठे काम होत आहे. विविध योजना राबविण्यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सतत प्रयत्न सुरू राहतील. तसेच संवत्सर गावामध्ये प्रत्येकापर्यंत या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असा शब्द दिला.
   कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपसरपंच विवेक परजणे म्हणाले, विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय उपचाराची मदत असेल, संवत्सर येथे सुरू असलेल्या नवीन ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती असेल, उभारण्यात आलेल्या नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य असेल, वयोश्री योजना दिव्यांग योजनेतून गरजवंतांना साहित्य वाटप असेल यासाठी कोपरगाव तालुक्यावर विखे पाटील परिवाराचे नेहमी सहकार्य राहिले आहे. आणि त्याच माध्यमातून या योजनेअंतर्गत एका व्यक्तीला बारा हजार रुपयांपर्यंतची साहित्यांची मदत करता येते. त्या माध्यमातून संवत्सर परिसरातील 210 लाभार्थ्यांना एकूण 1155 साहित्यांचे वाटप करण्यात आले. त्यांची एकूण किंमत 16 लाख 34 हजार 228 रुपये इतकी आहे. यापूर्वी 2023 मध्ये 79 दिव्यांग लाभार्थ्यांना साडेपाच लाख रुपयांचे साहित्याचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांसाठी युडीआयडी कार्ड महत्त्वपूर्ण आहे. ते काढण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी एकच वार असतो. एकच दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्याचबरोबर काहींना तेथे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे दिव्यांग बांधवांची गैरसोय लक्षात घेता. आपल्या माध्यमातून संवत्सर येथे कॅम्प घेण्याची परवानगी मिळून द्यावी असेही परजणे यावेळी म्हणाले. 
   आभार प्रदर्शनाप्रसंगी राजेश परजणे म्हणाले, देशात दिव्यांग व वयोश्री योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक लाभ मिळवून देण्यासाठी डॉ. सुजय विखे यांचा प्रथम क्रमांक राहिला आहे. सुजय विखे यांच्या माध्यमातून विखे परिवाराची चौथी पिढी ही जनसेवेसाठी यशस्वीरित्या काम करत आहे. यातूनच जनतेचे विखे परिवारावर किती प्रेम आहे हे लक्षात येते. खासदारकीच्या पराभवानंतर अवघ्या काही दिवसातच पुनश्च एकदा कामाला लागून सुजयवर जनतेचे असलेले प्रेम जनतेने दाखवून दिले आहे. दरम्यान या कॅम्पसाठी डॉ. अभिजित दिवटे यांचे विशेष सहकार्य लाभले. 
-----------

कोपरगावात संघटनेची बांधणी करणार...

कोपरगाव तालुक्यात अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर बोलणे अपेक्षित आहे. त्याला वाचा फोडणे अपेक्षित आहे. परंतु; दुर्दैवाने यावर बोलल्या जात नाही. परंतु या पुढील काळात असे होणार नाही कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक गावात मोर्चे बांधणी करून तालुक्यातील जनतेला बरोबर घेऊन सर्वसामान्यांचे, प्रश्न सोडवण्यासाठी राजेश परजणे व आम्ही प्रयत्नशील राहू असेही डॉ. सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले.
------------

या साधनांचे केले वाटप...

वयोश्री योजनेच्या माध्यमातून श्रवणयंत्र, मानेचा पट्टा, कमोड चेअर, वॉकर, गुडघ्याचा पट्टा, पाठीचा पट्टा, सिलिकॉन कुशन, पाठीचा आधार पट्टा, तीन व चार पायाची काठी, साधी काठी, ऍडजेस्टेबल काठी, शीटसहित काठी, व्हीलचेअर, कमोड व्हीलचेअर तसेच दिव्यांग योजनेच्या माध्यमातून बॅटरी चलीत तीन चाकी सायकल, श्रवणयंत्र, तीन चाकी सायकल, ब्रेल किट, व्हीलचेअर मोठी, व्हीलचेअर या सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले.

--------

-

कृषीभूषण प्रभावतीताई घोगरे यांची दु:खद प्रसंगी सांत्वनपर भेटी

कृषीभूषण प्रभावतीताई घोगरे यांची दु:खद प्रसंगी सांत्वनपर भेटी


शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये नुकतेच काही स्नेही, नातेवाईक व हितचिंतक व्यक्तींचे दुःखद निधन झाले.
रहिमपूर येथील कै.भीमाजी बाबुराव शिंदे, मनोली येथील कै.अलका सोपान शिंदे, कोल्हेवाडी येथील कै. प्रयागाबाई देवराम दिघे आणि सोनगाव सात्रळ येथील कै.अमरीश किशोर भांड यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या सर्व दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी कृषीभूषण सौ.प्रभावती जनार्दन घोगरे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
या दु:खद प्रसंगात आपण कुटुंबीयांसोबत आहोत, ही भावना सौ.घोगरे यांनी व्यक्त केली.
त्यांनी सर्व दिवंगत आत्म्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करत ईश्वरचरणी प्रार्थना केली की, “या दु:खातून सावरण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला लाभो.”

रविवार, २२ जून, २०२५

AI तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर विशेष कार्यशाळा संपन्न


AI तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर विशेष कार्यशाळा संपन्न


श्रीरामपूर, 



शेतकऱ्यांना आधुनिक शेतीत नवे तंत्रज्ञान आत्मसात करता यावे, या उद्देशाने रयत शिक्षण संकुल, श्रीरामपूर येथे साई सोशल फाउंडेशन आणि एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने "AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान" या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मा. प्रतापराव पवार (अध्यक्ष, सकाळ पेपर्स प्रा. लि. व विश्वस्त, एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती) हे होते.
कार्यक्रमास श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.हेमंत ओगले,पंचायत समितीच्या सभापती सौ.वंदनाताई मुरकुटे, तसेच कृषीभूषण सौ.प्रभावतीताई घोगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.



या कार्यशाळेत शेतकऱ्यांना AI तंत्रज्ञानाचा ऊस उत्पादनात कसा प्रभावी वापर करता येतो, याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. याशिवाय सेंद्रिय शेती, आधुनिक सिंचन पद्धती, माती परीक्षण, पीक आराखडा तयार करणे अशा विविध बाबींवर सखोल माहिती देण्यात आली.

शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, भविष्यात असे उपक्रम अधिकाधिक व्हावेत, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.

शेतकऱ्याचा आपल्या प्रती असणारा स्नेह आणि जिव्हाळा पाहून खूप भारावून गेलो डॉ सुजय विखे


राहाता तालुक्याच्या दौऱ्यावर असताना रस्त्यालगत एक महिला शेतकरी भुईमुगाच्या शेंगा काढणीचे काम करीत होत्या. या महिलेने अतिशय साधेपणाने "या ना शेतात... थोड्या शेंगा खा!" म्हणून बोलावले असता, तेथे थांबलो आणि त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला.  



त्यांच्या साधेपणात आणि स्वागतात असणारी आपुलकी यावेळी मनाला खूप भावली. शेतकऱ्यांचा आपल्याप्रती असणारा स्नेह आणि जिव्हाळा पाहून खूप भारावून गेलो. दरम्यान शेतात गेलो, जमिनीवर बसलो, मातीचा गंध घेतला आणि माणुसकीच्या नात्याला पुन्हा एकदा नव्याने अर्थ दिला.


यावेळी पीक, पाणी आणि इतर गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा रंगल्या. ही फक्त एक भेट नसून माणुसकीची, मातीची आणि नात्यांची केलेली जपणूक होती. एकूणच ही भेट मनाला अतिशय आनंद देणारी ठरली.

श्री गणेश विद्यालयामध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा


श्री गणेश विद्यालयामध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा


रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर च्या भव्य प्रांगणामध्ये 21 जून 2025 रोजी सकाळी सात ते नऊ या वेळेत जागतिक योग दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री वसावे के के सर यांनी योग दिनाचे महत्त्व समजावून सांगितले जीवनातील प्राणायाम आणि योग याचे महत्त्व सांगितले शरीर निरोगी राहण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी रोज प्राणायाम आणि योगा करावे असे आव्हान केले


 यावेळी विद्यालयातील श्री धनवडे सर यांनी विद्यार्थ्यांकडून प्राणायाम आणि योगा करून घेतले विद्यालयातील शिक्षक श्री तनपुरे सर ,झडे सर ,वसावे सर , घोरपडे सर ,श्रीमती वराडे मॅडम ,सौ उंडे मॅडम श्रीमती शहारे मॅडम, गांगुर्डे मॅडम, भांगरे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांसमवेत योगा आणि प्राणायाम करण्यामध्ये सहभाग नोंदवला.


मोठ्या उत्साहामध्ये विद्यार्थ्यांनी योग दिनाचे औचित्य साधून मनशांतीसाठी अतिशय छान पैकी सर्व योगासने मन लावून केली विद्यार्थ्यांना यावेळी अतिशय आनंद वाटला श्री भोये कैलास सर यांनी सर्व कार्यक्रमाचे फोटोशूट व व्हिडिओ तयार केले.


मुख्याध्यापक श्री वसावे के के सर यांनी जागतिक योगा दिन योग दिन हा कार्यक्रम छान व्यवस्थित संपन्न झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

शुक्रवार, २० जून, २०२५

सौ.प्रभावतीताई घोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; वृक्षारोपण, सन्मान कार्यक्रमाने सामाजिक बांधिलकी जपली

सौ.प्रभावतीताई घोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; वृक्षारोपण, सन्मान कार्यक्रमाने सामाजिक बांधिलकी जपली

लोणी खुर्द (ता. राहाता) :



काँग्रेसच्या महिला नेत्या सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेटी व सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याला सलाम केला.


सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. प्रभावतीताई घोगरे या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब, शेतकरी, महिला व सामान्य जनतेच्या समस्या तत्परतेने सोडवणाऱ्या संघर्षशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात.

वाढदिवसानिमित्त लोणी खुर्द येथील युवक कार्यकर्त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमातून सामाजिक जागृती आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला.


सकाळपासूनच जिल्ह्यातील मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे शुभेच्छांचा वर्षाव केला. सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश, पोस्टर, फोटो आणि व्हिडीओद्वारे मोठ्या प्रमाणात काकींना शुभेच्छा मिळाल्या.

गणेश परिसर व प्रवरा परिसरातील अनेक चाहत्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सौ. प्रभावतीताईंचा सत्कार केला व त्यांच्या कार्याची स्तुती केली.


घराणं गौरवशाली...

सौ. प्रभावतीताई यांचं कुटुंब हे राजकीय व सामाजिक परंपरेने समृद्ध आहे –
🔹 वडील- स्व. शंकरनाना पाटील खर्डे, कोल्हार येथील अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष
🔹 भाऊ - श्री.सुरेंद्र पाटील खर्डे, कोल्हारचे माजी सरपंच
🔹 सासरे - शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार स्व. चंद्रभान दादा घोगरे पाटील
🔹 पती - लोणी खुर्दचे सध्याचे सरपंच श्री. जनार्दन घोगरे

या गौरवशाली कुटुंबाची परंपरा पुढे नेत, सौ. प्रभावतीताई घोगरे या सामाजिक न्याय आणि जनसेवेची नवी दिशा ठरवताना दिसतात. वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेले उपक्रम हे त्यांच्या लोकसंग्रहाचे आणि कार्याबद्दलच्या विश्वासाचे प्रतीक ठरले.

साई आश्रम येथील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा साई भक्ताचे मौल्यवान वस्तू पैसे परत

 साई आश्रम येथील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा साई भक्ताचे मौल्यवान वस्तू पैसे परत  



शिर्डी 

श्री साई आश्रम भक्तीनिवास येथे दिनांक 19.06.2025 शिफ्ट 22/6 मध्ये H इमारतीच्या आऊट गेटवर गोरे केशव बारकू आणि साई सुभाष गायके यांना 01 सोन्याची चैन व 02 सोन्याच्या बांगड्या अंदाजे किंमत 02 लाख रोख रक्कम 3100 रुपये पर्स व त्या व्यक्तीचे पासपोर्ट फोटो सापडले होते. सदरच्या वस्तू ह्या प्रमोद सिहं राहणार उत्तर प्रदेश यांच्या होत्या त्यांनी H इमारतीत रूम नंबर H119 व H127 रूम बुक केलेली होती. सदर साईभक्त यांची  त्या पर्स मधील फोटो पाहून ओळख पटवून मुद्देमाल त्यांना परत केला त्यांना त्यांचा ऐवज परत मिळाल्याबाबत लेखी घेण्यात आले. श्री विजय वाणी अधीक्षक म्हणाले की कर्मचाऱ्यांनी साई भक्तांशी प्रामाणिकपणे काम केल्यास साईबाबा निश्चित फळ देतील


जि. प. प्रा. शाळा एकरूखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

जि. प. प्रा. शाळा एकरूखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा



राहता तालुक्यातील एकरुखे येथील जि.प. प्राथमिक शाळा एकरूखे येथे  इयत्ता पहिली मध्ये नव्याने दाखल होणाऱ्या नवागत मुलांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवाची संपूर्ण गावात प्रवेश फेरी झाली. नवीन दाखल मुलांना बैलगाडी सजवून गाडीतून संपूर्ण गावामध्ये संगीत ,ढोल ताशांच्या वाद्यासह  मिरवणूक काढण्यात आली. 

यावेळी गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी नवीन मुलांना चॉकलेट, खाऊचे वाटप केले. प्रवेश फेरी शाळेत आल्यानंतर सर्व नवागत मुलांचे शाळेच्या गेट पासूनच फुलांच्या पाकळ्या फेकून जोरदार स्वागत करण्यात आले. मुलांना विविध खेळणी, फुगे देऊन तसेच गुलाब पुष्प देऊन त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.


नवागतांचे पहिलं पाऊल ठसे घेऊन त्यांचे औक्षण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे विद्यमान सरपंच आदरणीय जितेंद्र पा. गाढवे होते. तसेच कार्यक्रम प्रसंगी श्री जालिंदर पाटील गाढवे, श्री मधुकर सातव एस एम सीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब पगारे, सदस्य श्री रविंद्र भवर व इतर बहुसंख्य पालक व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश , पाठ्यपुस्तक, बूट,साँक्स  व वहयांचे वाटप करण्यात आले. मुख्या. श्री राधाकिसन दळवी सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,

जानका गोर्डे मॅडम यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली. श्री जगन्नाथ डांगे सर यांनी अनुमोदन दिले. सुनिता सातव मॅडम यांनी प्रवेश गीत सादर केले. श्री मधुकर थोरात सर यांनी आभार प्रदर्शन केले व श्री सुधाकर अंत्रे सर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अलका गाडेकर, संजिवनी गोर्डे,लिला चव्हाण,वैशाली गायकवाड, पौर्णिमा यादव,मयूरा कडू मँडम यांचे बहुमोल सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना स्वादिष्ट बुंदीचे गोड जेवण देण्यात आले.

निर्मलवारी अभियानात संजीवनी युनिव्हर्सिटीतील BBA अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

निर्मलवारी अभियानात संजीवनी युनिव्हर्सिटीतील BBA अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग





आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भक्त पायी दिंडी (वारी) करत जातात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्रंबकेश्वर येथून निघणारी *संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी* अहिल्यानगर जिल्ह्यात 16 जून रोजी पारेगाव या ठिकाणी दाखल झाली होती. या ठिकाणी पालखीचा मुक्काम होता. तसेच मंगळवार दिनांक 17 जून रोजी राहता तालुक्यातील गोगलगाव या ठिकाणी पालखीचा मुक्काम होता. 
गोगलगाव या ठिकाणी संजीवनी  युनिव्हर्सिटीच्या BBA अभ्यासक्रमाच्या 30  विद्यार्थ्यांनी  नाशिक चे सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेष तज्ञ डॉ. भरत केळकर यांच्या समन्वयाने व संजीवनीचे प्रा. सुधांशू भट यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मल वारी या अभियानात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. 
*निर्मल वारी अभियान हे वारी मार्गाच्या मुक्कामाच्या ठिकाणी राबविले जाते. या अभियानाला 2015 पासून सुरुवात झाली*. या अभियाना अंतर्गत वारी ज्या ठिकाणी मुक्काम करते त्या ठिकाणी काही फिरत्या शौचालयांची उभारणी केली जाते. व वारकऱ्यांना आग्रह केला जातो की त्यांनी शौचालयांचा वापर करावा. एका ठिकाणचा मुक्काम संपल्यानंतर ही सगळी शौचालय पुन्हा दुसऱ्या गावांमध्ये नेली जातात. म्हणजे वारकरी दुसऱ्या गावात जाऊन पोहोचेपर्यंत ही सगळी व्यवस्था त्या गावात पोहोचलेली असते.  या अगोदर अशा विविध मुक्कामांच्या ठिकाणी वारकरी आपला प्रातर्विधी उघड्या जागेवर करत असत, त्यामुळे वारी गावातून गेल्यानंतर त्या ठिकाणी अस्वच्छता, रोगराई वाढत असे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहत असे. त्यावर उपाय म्हणून निर्मल वारी अभियान राबविण्यात येते. 



या अभियानांतर्गत वारकऱ्यांनी शौचालयांचा वापर करावा असा आग्रह स्वयंसेवकांमार्फत केला जातो. या फिरत्या शौचालयांच्या ठिकाणी वापराचे पाणी ,वीज व्यवस्था केली जाते. अशा प्रकारची व्यवस्था राहता तालुक्यातील गोगलगाव या ठिकाणी सुद्धा केलेली होती. या ठिकाणी संजीवनी युनिव्हर्सिटीचे  बीबीए अभ्यासक्रमाचे हेड श्री. सुधांशू भट सर व विद्यार्थी यांनी या अभियानात सहभागी होत,  वारकऱ्यांना शौचालयाचा वापर करावा असे आवाहन केले. तसेच या ठिकाणी या सर्व टीमने सर्वेक्षण केले. येथील वारकऱ्यांशी संवाद साधत ,वारीची परंपरा, वारीचे नियोजन व व्यवस्था, वारकऱ्यांचे आरोग्य, गावातील स्वच्छता अशा विविध घटकांचा देखील अभ्यास केला.

  या निर्मल वारी अभियानाच्या यशस्वीतेसाठी शासनाबरोबरच समाजातील विविध सेवाभावी संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

बुधवार, १८ जून, २०२५

प्रा. हनुमंत माने या वलयांकित व्यक्तिमत्वास बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर...

प्रा. हनुमंत माने या वलयांकित व्यक्तिमत्वास बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर...



 बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिन दि.२४,२५ व २६ जून २०२५ रोजी होणाऱ्या महोत्सवानिमित्त
 रयत शिक्षण संस्थेचे शारदा शैक्षणिक संकुल राहाता जि- अहिल्यानगर 
या संकुलातील मराठी विषयाचे विद्यार्थी प्रिय, प्रभावी प्राध्यापक  व साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर 
या साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-
 प्रा. हनुमंत माने यांना यंदाच्या वर्षाचा बालगंधर्व परिवाराच्या वतीने "प्रेरणादायी भाषण कला प्रशिक्षक व प्रभावी वक्ता"
 या कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा "विशेष सन्मान" पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होणार आहे. 
 प्रा. हनुमंत माने यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मराठी भाषेचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे. व संभाषण कौशल्य विकसित व्हावे. यासाठी संभाषण कला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विशेष प्रयत्न व मार्गदर्शन केले आहे.
प्रेरणादायी भाषण कला प्रशिक्षक व प्रभावी वक्ता म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे.
 साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेच्या वतीने गेल्या १७ वर्षात संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिभावंत कवींच्या निवडक कवितांचा सहभाग असलेल्या २१ प्रातिनिधीक कविता संग्रहाचे संपादक म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. 
ते स्वतः प्रतिभावंत कवी, लेखक, निवेदक, सूत्रसंचालक, प्रभावी वक्ते व मराठी भाषेचे अभ्यासक म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत.
 सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील विविध कार्यक्रमांचे बहारदार सूत्रसंचालन, निवेदन, व्याख्यानमाला, परिसंवाद, कार्यशाळा, चर्चासत्र व मुलाखत इ. उपक्रमांचे यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे.
 आजपर्यंत त्यांच्या या कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्य स्तरावर विविध संस्थांनी १३ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.
 प्रा. हनुमंत माने यांना बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्य इ. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सरकारने दुधाला प्रति लिटर 50 रुपये दर द्यावा. विठ्ठलराव शेळके

सरकारने दुधाला प्रती लिटर ५० रूपये दर ध्यावा असी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्वारे केली पत्रकात शेळके यांनी म्हटले आहे की मागील वर्षी शेतकरी संघटना व दुध उत्पादक शेतकरी यांच्या वतीने राज्यात मोठे आंदोलन झाले यावेळी भाव वाढ करण्याऐवजी दुग्ध मंत्री  यांनी प्रती लिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले त्यात काही महिनेचे अनुदान दुध उत्पादक यांच्या बॅक खात्यात जमा झाले अनेक महीन्याचे अनुदान रखडले आहेत याचा पाठपुरावा शेतकरी माध्यमातून चालू आहे आज सरकारी अधिकारी सांगतात शाशनाकडे निधी नाही आम्हाला अनुदान नको दुधाच्या उत्पादन खर्चावर गायीच्या दुधाला किमान ५० रुपये व म्हशींच्या दुधाला प्रती लिटर ८० रुपये भाव द्यावा तरच दुध उत्पादक टीकेल आज पशुसंवर्धनाचे औषधे चारा पशुखाद्य मजुरी यांचे दर भरमसाठ गेली दोन वर्षांत कुठलही दर वाढ न झाल्यामुळे दुध उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे दोन वर्षांपुर्वी एक लाख रुपये किंमतीने विकणारे गाय आज तीस चाळीस हजार रुपये किंमतीने विकत आहे राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी दुध धंदा बंद करत आहे याचे एकमेव कारण दुध भेसळमुळे दुधाचा तुटवडा दिसत नाही   अनेक दुध संस्थांमध्ये दुध पुरवठा करणारे अनुदानापासून वंचीत आहे तरी शहरी लोकांना चांगल्या प्रकारे दुध पुरवणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे  तरी सरकारने दुधाला व सर्व शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा आम्हाला कुणाकडे भिक मागण्याची वेळ येणार परंतु राज्यांमध्ये शेतकरी संघटना व सर्व
 सामान्य नागरिक आज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा तयारीत असल्याचे विठ्ठलराव शेळके यांनी सांगितले आहे

जिल्हा परिषद शाळा म्हणजे जीवनाची उजेड वाट- गटविकास अधिकारी

जिल्हा परिषद शाळा म्हणजे जीवनाची उजेड वाट- गटविकास अधिकारी 



शैक्षणिक वर्ष 2025 26 आज दिनांक 16 जून पासून सुरू झाले, शाळेच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला. त्याचप्रमाणे आपल्या सावळविहीर बुद्रुक केंद्र शाळेतही नवागतांचे स्वागत खूप उत्साहात संपन्न झाले .
या कार्यक्रमासाठी उपसंचालक ,अर्थ व सांख्यिकी अधिकारी अहिल्यानगर येथील शिरीष व्हरसाळे, गटविकास अधिकारी पंडित वाघेरे, लोकनियुक्त सरपंच ओमेश् जपे, उपसरपंच विकास जपे, पोलीस पाटील सुरेश वाघमारे ,पत्रकार राजू दुनबळे ,पत्रकार राज गडकरी , माजी उपसरपंच गणेश कापसे, ग्रामविकास अधिकारी कार्ले भाऊसाहेब , ग्रामपंचायत सदस्य आशिष आगलावे, केंद्रप्रमुख सोमनाथ जावळे, मुख्याध्यापक नानासाहेब मेहेत्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर जपे ,साईनाथ निकम ,उपाध्यक्ष अनिता ढगे उपस्थित होते.
शाळेच्या पहिल्या दिवशी आलेल्या सर्व मुलांची वाद्यसह मिरवणूक काढण्यात आली. त्याचप्रमाणे इयत्ता पहिली ला दाखल झालेल्या सर्व मुलांचे शाळेतील शिक्षकांनी औक्षण केले. सुंदर प्रकारे शाळेची रंगरंगोटी झालेली असल्याने सजावट आकर्षक केली. मान्यवरांच्या असते सर्व मुलांना गुलाब पुष्प वाटप करण्यात आले. आलेले अधिकारी पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व मुलांना गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, शूज सॉक्स, देखील वाटप करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी पंडित वाघेरे म्हणाले ,की जिल्हा परिषद शाळा म्हणजे जीवनाची उजेड वाट आहे. या शाळेत शिक्षक वृंद अतिशय अभ्यासू, हुशार आणि मेरिट चे आहेत, त्याचप्रमाणे शाळेतील गुणवत्ता देखील खूप उत्कृष्ट आहे ,त्यामुळे बाहेरील झगमगटाकडे पाहण्यापेक्षा गुणवत्तेकडे पाहून या ठिकाणी आपल्या मुलांचे प्रवेश निश्चित करा. शाळेतील सोयीसुविधांबद्दल समाधान व्यक्त केले .
त्याचप्रमाणे अर्थ व सांख्यिकी अधिकारी शिरीष व्हरसाळे म्हणाले की जिल्हा परिषदेत शाळेत शिक्षणाचा पाया भक्कम झाला की पुढे जीवनामध्ये कुठलीही अडचण येत नाही. शाळेतील वातावरण निसर्गरम्य,  प्रसन्न आहे. शाळेतील स्वच्छता आणि सुविधा पोषक आणि पूरक आहेत.



 शाळेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्ता गायकवाड सर यांनी केले तर आभार श्रीमती विद्या गोर्डे यांनी मानले .
कार्यक्रम यशस्वीते साठी शाळेतील शिक्षक सिताराम गुरसळ ,रूपाली मंद्रे, सुचित्रा चवाळे, प्रियंका जाधव ,संगीता याईस,सविता बर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले.

मंगळवार, १७ जून, २०२५

योग प्राणायाम शिबिरास उदंड प्रतिसाद

योग प्राणायाम शिबिरास उदंड प्रतिसाद 




सालाबादप्रमाणे योगदिनाचे औचित्य साधत राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे पाच दिवसीय मोफत योग प्राणायाम शिबिराच्या पहिल्या दिवशी योगसाधकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.जनसामान्यात निरोगी आरोग्याची सजगता वाढविण्यासाठी साईयोग फाउंडेशन गेल्या अकरा वर्षांपासून राहाता शहरात सावता महाराज मंदिरात पहाटे ५.३० ते ७ वाजेपर्यंत मोफत योग शिबिराचे आयोजन करत आहे.तसेच नंतर वर्षभर राहाता नगरपालिकेच्या हॉल मध्ये पहाटे सर्वांसाठी मोफत योग वर्ग सुरु आहेत.
या शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी तथा राहाता नगरपालिकेचे प्रशासक माणिकराव आहेर,नायब तहसीलदार हेमंत पाटील,दहेगावच्या सरपंच पूनम डांगे,योगगुरू सुरेश भिंगारदिवे,अरुण मोकळ,प्रमोद तोरणे,बाळासाहेब गाडेकर,माजी नगरसेविका अनुराधा तुपे,डॉ अंजली पानगव्हाणे,सुष्मिता चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते साई प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली.प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी योगगुरू भिंगारदिवे यांच्या शास्त्रशुद्ध व सोप्या पद्धतीने योग शिकवण्याच्या कलेचे कौतुक करत सर्व योगसंधकांनी या शिबिराला नियमित उपस्थित राहून सहभागी होत आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.



याप्रसंगी साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे,दशरथ तुपे,भाऊसाहेब बनकर,दीपक गाडेकर,माजी उपनगराध्यक्ष संजय सदाफळ,प्रकाश पुंड,गोरखनाथ दंडवते,विलास वाळेकर,मनोज पिपाडा,संजय बाबर,संदीप डांगे,ॲड दिगंबर धनवटे,बबलू फटांगरे,दीपक दंडवते,मिलिंद बनकर,संजय वाघमारे,अनिल सातव,विष्णू गाडेकर,रंगनाथ सदाफळ,विठ्ठल निर्मळ,पांडुरंग गायकवाड,म्हसुपाटील सदाफळ,रवींद्र धस,अंकुश गांधी,उज्वला गाडेकर,नीलम चेनुके,आरती सदाफळ,कांचन बावके,सातव मॅडम,स्नेहल भागवत,दिव्या बाबर,सिद्धी डांगे,साईशा चव्हाण,नामदेव गवते,मेजर बाभुळखे,देविदास नागरे,परमेश चव्हाण,स्वप्निल गवते,सागर माळवेडॉ प्रवीण राठोड,सचिन डांगे आदी साईयोग फाउंडेशन व गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानत पुढील चार दिवस जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करत सर्वांचे आभार मानले.शेवटी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रवाश्यांना श्रद्धांजली अर्पण करून शिबिराच्या पहिल्या दिवसाचा समारोप करण्यात आला.

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...