संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४
यशवी दायमा सीए परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
गणेशनगर शाळेतील युवा वैज्ञानिक सचिन वाघ यांना फेलोशीप
सोमवार, ३० डिसेंबर, २०२४
दिव्यांगाच्या मदतीसाठी राहाता सह्याद्री क्लबचे मोठे योगदान
रविवार, २९ डिसेंबर, २०२४
स्वतंत्र सैनिकाच्या पत्नीच्या स्मरणार्थ वृक्षारोपण....साईयोग फाउंडेशन व दहेगाव ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम
शनिवार, २८ डिसेंबर, २०२४
Atrocity गुन्ह्यातील आरोपी यांचा जामीन मंजूर
Atrocity गुन्ह्यातील आरोपी यांचा जामीन मंजूर
राहाता-
दिनांक २७/११/२०२४ पिडीतेने भारतीय न्याय सहिता कलम 64 (1) 3/5 ( जुना I p c 376, 34 ) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सन 2015 सुधारित कलम 3 (1) (w) (I) (II) 3(2) (v) प्रमाणे शिर्डी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजी नं 646/2024 प्रमाणे गुन्ह्या रजिस्टर करण्यात आला होता . आरोपी २ व आरोपी क्र ३ यांचा वतीने राहाता येथील जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये अटक पूर्व जामीन दाखल करण्यात आला होता सदर अटकपूर्व जामीन अर्जाचे कामी ॲड विलास जी आसने ,ॲड शरद पी तांबे , ॲड दीपाली पदोकर यांनी कामकाज पाहिले आरोपी विरुद्ध गुन्हा हा खोटा असून पैशाचा वादावरून खोटा गुन्हा दाखल केला व प्रथमदर्षणी attrocity कायद्याचा तरतुदी प्रकरणास लागू होत नसल्याने अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची विनंती ॲड विलास जी आसने ॲड शरद पी तांबे ॲड दीपाली पदोलकर यांनी माननीय न्यायालयास केली सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद व आरोपीच्या वतीने ॲड विलास जी आसने, ॲड शरद पी तांबे यांचा युक्तिवाद ऐकून ॲड विलास जी आसने ॲड शरद पी तांबे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने अटी शर्ती सह आरोपी क्र २ आरोपी क्र ३ यांचा अटकपूर्व जामीन मा राहाता येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांनी दिनांक २१/१२ /२०२४ रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला सदर जामीन अर्जाकडे शिर्डी येथील सर्व ग्रामस्थांचे व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले होते
गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत धनगरवाडी शाळेची चमकदार कामगिरी
सोमवार, २३ डिसेंबर, २०२४
राहाता शहरात डॉ डांगे दातांचा दवाखाना चे उद्घाटन संपन्न
शनिवार, २१ डिसेंबर, २०२४
राहाता सह्याद्रीचे रायगडावर गाडगेबाबा पुण्यतिथी स्वच्छता अभियानाने साजरी :-
राहाता सह्याद्रीचे रायगडावर गाडगेबाबा पुण्यतिथी स्वच्छता अभियानाने साजरी :- यावर्षी लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्री, सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप व राहाता तालुका परीट/धोबी समाजाच्या वतीने गाडगेबाबा यांची पुण्यतिथी रायगडावर जावून साजरी करण्यात आली. या पुण्यतिथीच्या निमित्ताने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना अभिप्रेत असणारी स्वच्छता मोहीम रायगड किल्ल्यावर जातांना पायऱ्यांच्या आसपासचा व किल्ला परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून तो मशीनच्या साहाय्याने क्रश करण्यात आला. गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात ते म्हणाले की स्वच्छता सेवा हीच परमेश्वराला भावणारी सेवा आहे आणि हीच सेवा गाडगेबाबा यांनी आयुष्यभर केली. प्रत्येक गावात कीर्तनाला जाण्याअगोदर ते संपूर्ण गावाची स्वच्छता करत व रात्री कीर्तन करत. कुठल्याही यात्रेत ते मंदिरात न जाता तेथील नदी, घाट, मंदिर परिसर स्वच्छ करत. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी त्यांना जनतेनी दान दिलेली जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समाज कार्यासाठी देवू केली. पण डॉ. आंबेडकरांनी या जमिनीची गरज कर्मवीर भाऊराव पाटील यांना रयत शिक्षण संस्थेसाठी गरजेची असल्याने त्यांना देण्याची कल्पना मांडली. व गाडगे बाबा यांनी ती जमीन कर्मवीर अण्णा यांना दान केली. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांना कीर्तन चालू असताना समजली. पण त्याहीपेक्षा पण जास्त वाईट त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाल्याची बातमी समजल्यावर झाली. आणि त्यांनी अन्नत्याग सुरू केला. आणि त्यातच त्यांनी देह ठेवला. ला. विनोद गाडेकर यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज हेच खरे स्वच्छतेचे पुजारी होते. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या नावाने स्वच्छता अभियान राबवून त्यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव केला. या स्वच्छता अभियानात व्हॉईस प्रेसिडेंट ला. सुनील धाडगे, सेक्रेटरी ला. सागर रोकडे, ला. ॲड. सुधीर बोठे, ला. ज्ञानेश्वर नळे , ला. बापूसाहेब गायकवाड, ला. सुनील काळोखे, ला. नितीन दिवटे, सह्याद्री ट्रेकिंग ग्रुपचे श्री. रवी शिवरकर, श्री. विजय गाडेकर, श्री. नवनाथ बनकर, श्री. विजय बनकर, श्री. धीरज जहांगीर, श्री. गणेश जगदाळे, श्री. दिनेश जगदाळे, श्री. विजय पठाडे, श्री. गोवर्धन गाडेकर, श्री. बबनराव आजबे, श्री. गंगाराम भुजबळ यांनी सहभाग घेतला. ला. सागर रोकडे यांनी अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत व आभार मानले.
चि. श्रेयश जॉन त्रिभुवन यांचा वाढदिवस
स्वच्छता अभियान राबवून गाडगे महाराजांना अभिवादन....
शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४
अहिल्यानगर -मनमाड या महामार्गावर कंटेनर व बसची धडक! कंटेनर भरधाव वेगाने रस्ता सोडून घुसला बंगल्यात! त्यामुळे झाडे पडली? ट्रॅक्टरचे नुकसान! सुदैवाने जीवित हानी नाही!अर्धवट रस्त्याच्या कामामुळे घडला अपघात! वाहनधारक व नागरिकांमधून संताप!!
अहिल्यानगर -मनमाड या महामार्गावर कंटेनर व बसची धडक! कंटेनर भरधाव वेगाने रस्ता सोडून घुसला बंगल्यात! त्यामुळे झाडे पडली? ट्रॅक्टरचे नुकसान! सुदैवाने जीवित हानी नाही!अर्धवट रस्त्याच्या कामामुळे घडला अपघात! वाहनधारक व नागरिकांमधून संताप!!
लोहगाव (वार्ताहार )
अहिल्यानगर मनमाड या महामार्गावर लोहगाव शिवारामध्ये हॉटेल अजित जवळ एका वस्तीवर थेट भरधाव वेगाने कंटेनर हा रस्ता सोडून नारळाचे झाडे तोडून, ट्रॅक्टर धडकून ,थेट भिंत पाडून घरात घुसला . मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र हा अपघात दिवसा झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. हा जबरी अपघात झाल्यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. खराब रस्त्यामुळेच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
अहिल्यानगर ते कोपरगाव या रोडवरील अपघाताची मालिका थांबेना. या रोडवर आतापर्यंत बरेचसे अपघात झाली की, अनेकांचे पाय गेले, हात गेले कित्येक जायबंदी झाले तर काही मृत्यूमुखी पडले याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अहिल्या नगर कडून कडून शिर्डी कडे जाणाऱ्या लक्झरी बस क्रमांक MH18B.G9300 व मनमाड कडून अहिल्यानगर कडे जाणारा कंटेनर क्रमांक GJ06B.T8334
लोहगाव शिवारात हॉटेल अजित जवळ बबन हौशीराम चेचरे यांच्या बंगल्यात रात्री १.४० मिनिटे घुसला. लक्झरी बस व कंटेनर समोरासमोर धडक झाल्याने कंटेनरचा वेग इतका जोरात होता की त्यांने बंगल्या समोरील तारकंपाऊंड, नारळाचे एक झाड. मूळासकट उन-मळून पडले तर दुसरे झाड भुई सपाट झाले. घराशेजारी लावलेला ट्रॅक्टर देखील या कंटेनर ने दाबला. त्यामुळे ट्रॅक्टरची पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.जर नारळाचे झाड तार कंपाऊंड मुळा सगट उपटून पडले असेल तर त्या गाडीचा वेग किती असू शकतो याचा अंदाज सर्वसामान्य पडलेला आहे व समोर असणारा त्यांच्या ट्रॅक्टर दाबून कंटेनर डायरेक्ट भीतीला आदळला व भिंत तुटून त्या खाली पडल्या .ज्या घरात विटा पडल्या होत्या त्या घरात चेचरे कुटुंब काही सदस्य झोपलेले होते. एक इट त्यांच्या घरातील व्यक्तींना घासून गेल्यामुळे बोटाला मोठ्या प्रमाणात इजा झाली. व त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणून त्यांच्या घरातील कोणालाही मोठ्या प्रमाणात दुखापत झाली नाही. हा अपघात जर पाठीमागे पाचशे फुटावर जर झाला असता तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती. प्रथम दर्शनी तिथे लोकांनी पाहिले असता लक्झरी बस वाल्याचीच या ठिकाणी चूक आढळून येते कारण की तो त्याची साईट सोडून रॉंग साईडने घुसल्यामुळे समोरून येणारा कंटेनर व त्यांच्यात अपघात होऊन कंटेनर डायरेक्ट चेचरे यांचे कंपाउंड तोडून घरात घुसला व त्यांच्या घराची मोठ्या प्रमाणात तोडमोड झाली. स्लॅबला क्रॅक पडले आहे .मोठ्या प्रमाणात आवाज झाल्यामुळे घरातील सदस्य उठले त्यांनी बघितले तर कंटेनर डायरेक्ट आपल्या घरात घुसला त्यांनी लगेचच परिसरातील नागरिकांना फोन करून या गोष्टीची कल्पना दिली व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिसरातील लोक जमा झाले तेवढ्या रात्रीस त्यांनी कंटेनरचा ड्रायव्हर आत गुंतलेला होता. त्याला बाहेर काढून दवाखान्यात नेले हाच अपघात जर दिवसा झाला असता तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती. या अपघाताची खबर स्थानिक पोलीस स्टेशनला दिली असता पोलिसांनी रात्री सदर घटनेची पाहणी केली. हा अपघात झाल्यानंतर परिसरातील रस्त्यालगत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे व नगर मनमाड रोड हा सातत्याने वाहत असल्यामुळे जाणाऱ्या प्रवाशी देखील थांबून हा अपघात
(अपघात राहाता तालुक्यातील लोहगाव शिवारात घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमा झाली होती)
बघत आहे. त्यामुळे या रस्त्याचे लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.अहिल्यानगर ते कोपरगाव रोडचे काम बऱ्याच वर्षापासून चालू आहे .काही ठिकाणी एकतर्फी होणारे वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची कोंडी होती.
या रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होईल. याचा अंदाज कोणीही देऊ शकत नाही. कारण की या ठिकाणी बरेचसे कॉन्ट्रॅक्टर आले व अर्धवट काम सोडून निघून गेले त्यामुळे हा रस्ता भविष्यात लवकर पूर्ण होईल की नाही हे सांगणं आता कठीण झाले आहे.
मात्र या खराब रस्त्यामुळे अनेक अपघात होऊन अनेक जण अपंग होत आहेत. अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हा महामार्ग बनवण्यात यावा .अशी मागणी आता परत एकदा वाहनधारक, ग्रामस्थ यांच्याकडून जोर धरू लागली आहे. या अपघातात संदर्भात पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
लोहगाव सोसायटीच्या व्हा चेअरमनपदी राजेंद्र चंद्रभान चेचरे यांची बिनविरोध निवड.
गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४
गणेशनगर शाळेत क्रीडा महोत्सव संपन्न*
सोमवार, १६ डिसेंबर, २०२४
दिपिकाबाई पिपाडा यांचे मरणोत्तर नेत्रदान साईयोग फाऊंडेशनची वृक्षरोपणरुपी श्रद्धांजली......
सिनेअभिनेत्री कतरीना कैफ ने घेतले साईचे दर्शन
मराठी अभिनेते महेश कोठारे यांनी घेतले साई बाबांचे दर्शन
शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४
पितृ कृतज्ञमातृता सोहळा करणारे एकमेव इंदुरीकर महाराज :- डॉ. विखे पाटील
क्षेत्रभेट व वनभोजनाचे आयोजन
गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४
शिवप्रताप दिनानिमीत्त शिर्डीत रक्तदान शिबीर
कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार -एडवोकेट पंकज लोंढे
कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार -एडवोकेट पंकज लोंढे
राहाता (वार्ताहर) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल फक्त कॉंग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच नाही तर राज्यातील मतदार, जनतेसाठी धक्कादायक, अविश्वसनीय व अकल्पनीय आहेत. कोणतीही लाट नसताना पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या एकदम उलट निकाल कसे लागू शकतात असा प्रश्न राजकीय नेते, कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य जनतेलाही पडलेला आहे,असे प्रतिपादन राहता तालुका काँग्रेस अध्यक्ष एड. पंकज लोंढे यांनी केले
पुढील येणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर (मतदान पत्रिकेवर) घेण्यात याव्या यासाठी तालुका कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी कृषिभूषण सौ. प्रभावती घोगरे, राहता काँग्रेस शहराध्यक्ष नितीन सदाफळ, संजय जेजुरकर, उत्तमराव मते, सदाशिव गाडेकर, गणेश सोमवंशी,भगवान टिळेकर, नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, बाबासाहेब डांगे, संपत हिंगे अमोल आरणे, सिमोन जगताप, संजय पगारे, संजय डांगे, रमेश गागरे, राजेंद्र आग्रे, संदीप कोकाटे,राजेंद्र निर्मळ,अमोल घोगरे, जाकीर शेख, मुन्ना फिटर, प्रशांत घोगरे,अनिस शेख, समद शेख, प्रफुल्ल धिवर, उत्तमराव अरंगळे, भाऊसाहेब नळे, विजय जगताप, विष्णू डांगे,भानुदास कातोरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी एड. पंकज लोंढे म्हणाले , या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे. निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतांच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२% मतदान झाले. त्याच रात्री ११.३० वा ते ६५.०२% तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५% झाल्याचे सांगितले यात एकूण ७.८३% वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची हि वाढ असून मतांचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे ईव्हिएम मतदान प्रक्रिये संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे येथून पुढे सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली.
चौकट
सर्वसामान्य मतदार, जनता, राजकीय पक्ष, नेते, राजकीय विश्लेषक यांचा ईव्हिएम वर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे येथून पुढे सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात असा समाजातून आवाज उठत आहे. सर्वसामान्य जनतेचा लोकशाहीवरील विश्वास टिकून राहावा यासाठी येथून पुढच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपर घेण्यात याव्यात यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
एडवोकेट पंकज लोंढे (तालुकाध्यक्ष, राहाता तालुका कॉंग्रेस)
श्री.साईबाबा संस्थानचे रुग्णालय खेळतय रुग्णांच्या जिवाशी खेळ - डॉ.राजेंद्र पिपाडा
श्री.साईबाबा संस्थानचे रुग्णालय खेळतय रुग्णांच्या जिवाशी खेळ -डॉ.राजेंद्र पिपाडा
श्री.साईबाबा संस्थानचे रुग्णालय खेळतय रुग्णांच्या जिवाशी खेळ...संस्थानच्या रुग्णालयात प्रशासनाच्या ठिसाळ कारभारामुळे रुग्णांच्या जीवाची होणारी हेळसांड थांबवुन रुग्णांच्या जिवाशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा तसेच रुग्णांना दर्जेदार व वेळवर उपचार मिळावेत तसेच तेथील वेगवेगळ्या विभागातील अडचणी दूर व्हाव्यात या आशयांचे निवेदन डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डी संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले. यावेळी आरपीयाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव वाघमारे,ट्विंकल पिपाडा व इतर उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आलेल्या आहेत. साई संस्थानचे रूग्णालय हे नगर जिल्ह्यासह मराठवाडा व विदर्भातील रूग्णाला वरदान ठरले आहे. मात्र तेथील अनागोंदी कारभारामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे रूग्णांच्या जिवावर बेतण्याचे प्रसंग वारंवार उदभवत आहे.याबाबत आम्ही स्वत अनुभव घेतला असुन राहाता येथील पंकज बागरेचा यांचा अपघात झाला बेशुद्ध अवस्थेत त्यांना संस्थानच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांना तात्काळ एमआरआय व सिटीस्कॅनची गरज होती. परंतु पेशंटला स्कॅन रुममध्ये नेण्यासाठी संस्थानचा एकही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. शेवटी माझा मुलगा निखील पिपाडा व योगेश मुनावत यांनी स्ट्रेचर लोटत पेशंट स्कॅन रुममध्ये नेले. अतिशय दुर्दैवी घटना त्यादिवशी पहावयास मिळाली. हि परिस्थीती तातडीने बदलणे गरजेचे आहे.
अपघातात जबर जखमी झालेल्या रूग्णाला कॅज्युलीटी, सीटी स्कॅन, एमआरआय या विभागात नेण्यासाठी प्रशिक्षीत कर्मचारी दोन तीन पाळ्यात चोवीस तास तैनात असावेत. सध्या याबाबतची परिस्थीती अतिशय गंभीर आहे. ब-याचदा रूग्णाला हलविण्यासाठी कर्मचारी जागेवरच नसतात. रूग्णालयातील सर्वच कर्मचा-यांना तातडीने प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. रूग्णालयाच्या रिसेप्शन काऊंटरचे कर्मचारी देखील प्रशिक्षीत नाहीत. त्याचे कुणी ऐकत नाही. त्यांना पुरेशी माहिती देखील नसते असा रूग्णांचा अनुभव आहे. रूग्णालयासाठी स्वतंत्र जनसंपर्क अधिकारी नेमून त्यांना अधिकार देणे गरजेचे आहे. आणिबाणीच्या वेळी हे अधिकारी रूग्णाच्या नातेवाईकास मदत व मार्गदर्शन करू शकतील.अपघातग्रस्त रूग्णावर तातडीने उपचार करण्याची आणि पोलीसांत तक्रार नोंदवीण्याची गरज असते. त्यासाठी कॅज्युलीटी विभागात एक पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी तैनात करावा. तेथे पोलीस कर्मचारी नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना पोलीसात तक्रार देण्यासाठी पळापळ करावी लागते. त्यांना पोलीस ठाण्यात योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. रूग्णालयातील सोनोग्राफी विभाग ब-याचदा बंद असतो. सीटीस्कॅन आणि एमआरआय करण्यासाठी तिन तीन महिन्यांची वेटींग लिस्ट असते. कर्मचा-यांवर त्याचा मोठा ताण पडतो. हे लक्षात घेऊन आणखी एक सिटीस्कॅन व एमआरआय मशिन तेथे बसवीणे गरजेचे आहे.आणीबाणीच्या प्रसंगी रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात बेड उपलब्ध नसतो. हे लक्षात घेऊन अतिदक्षता विभागाचा विस्तार केला जावा.
साई संस्थानच्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांकडून आपआपसात धक्का बुक्की व शिविगाळ होते अशा स्वरुपाच्या बातम्या वर्तमान पत्रात वाचल्या. ही अतिशय खेदजणक बाब आहे. देशभरात प्रसिद्ध असलेल्या संस्थानच्या हॉस्पिटलची बदनामी होत आहेत. याही गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
श्री.साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर डॉक्टरांअभावी बंद आहे. एमआरआय,सीटीस्कॅन करिता तीन-तीन महिन्याच्या तारखा दिल्या जातात. अपघात किंवा ह्रदयविकाराचा झटका अशा तातडीच्या रुग्णांकडे कॅज्युल्टीत लक्ष दिले जात नाही. तसेच बेड उपलब्ध नसल्याचे कारणे सांगून पेशंट बाहेर पाठवले जातात. शिर्डी संस्थानचे सुपर हॉस्पीटल नव्हे तर रेफर हॉस्पीटल झाले आहे असे वाटु लागले आहे.
-डॉ.राजेंद्र पिपाडा
बुधवार, ११ डिसेंबर, २०२४
रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर या शाखेमध्ये पालक - शिक्षक - विद्यार्थी सहविचार सभा संपन्न
Featured post
आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील
आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील दाढ बुद्रुक आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...
-
राहाता तालुक्यातील एकरुखे येथील ॲड ऋषिकेश किसन आभाळे यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ( JMFC) पदी नियुक्ती राहाता तालु...
-
साई महिमा ट्रस्ट व गोपुरम टीव्ही भक्ती महिमा यांच्या वतीने गणेशनगर विद्यालयामध्ये अन्नदान व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप रयत श...
-
राहता अहिल्यानगर ते शिर्डी रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी कॉंक्रीटीकरण होवुन राहाता शिर्डी शहरातुन जाणा-या रस्त्यावर उड्डाणप...






