शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

अहिल्यानगर- छत्रपती संभाजी नगर अपघातातील मृतांची संख्या वाढल्यावर दुरुस्ती करणार का?- देसरडा

अहिल्यानगर- छत्रपती संभाजी नगर  अपघातातील मृतांची संख्या वाढल्यावर दुरुस्ती करणार का?- देसरडा 

 नेवासा (तालुका प्रतिनिधी)

 घोडेगांव राज्य महामार्गावर येथील दुरुस्ती व्हावी यासाठी येथे बस स्थानका समोर शनिवार दि.२७ सकाळी १०:३०ते ११ वाजे पर्यंत रास्ता रोको आंदोलन समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन देसरडा यांनी महामार्गावर अपघातांची,मृतांची काही टार्गेट आहे का? 

ते पुर्ण झाल्याशिवाय कामाला सुरुवात केली जाणार नाही का? असा संतप्त सवाल केला. महामार्गावरून अधिकारी जात नाही का? त्यांना या दुरावस्था दिसत नाही का? एखादा रुग्ण जर नगरला दवाखान्यात न्यायला आता दिड तास लागतो. तो वाटेतच जातो का अशी भिती कायम असते देसरडा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाभाडे काढून लवकरात लवकर रस्त्याचे काम पुर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलनचा इशारा दिला. 



   शिवसेना नेवासा विधानसभा संघटक पंकज लांभाते यांनी सा बां विभाग अधिकारी निगरगट्ट आहेत. नागरिकांच्या समस्या त्यांना समजत नाही. देखभाल दुरुस्ती साठी  लाखो रुपये खर्च केले. कायम स्वरुपी टिकाऊ काम करा.वाहनांच्या अपघातात जीव जाणार नाही याची काळजी घ्या. तातडीने कामास सुरुवात करा.तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ. कायद्याचा धाक दाखवु नका .नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर आलो. फक्त घोडेगाव करांचा प्रश्न नाही .ठोस कार्यवाही करा तरच येथुन ऊठु. अन्यथा गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही .


आमच्यासाठी येथे आलो नाही. जनतेत.या भावना लक्षात घ्याव्यात असे म्हणाले.
   माजी सरपंच बाळासाहेब सोनवणे यांनी थातुर मातुर काम नको.तातडीने कायम स्वरुपी दुरुस्ती करा गोड बोलुन वेळ मारुन‌ नेऊ नका. काम कधी सुरु करणार हे जनतेला सांगा अशी भूमिका घेतली.
   यावेळी सा बां विभाग चे अकोलकर यांनी अभियंता पाटील यांच्याशी भ्रमणध्वनी वर बोलणे करुन दिले तेव्हा पाटील म्हणाले सेक्रेटरी साहेबांचा दोन दिवस दौरा असल्याने मी आलो नाही. दहा दिवसांच्या अवधीत निविदा काढुन ठेकेदाराकडुन खडी ,डांबरांने खड्डे बुजवले जातील ,पावसात काम करणे शक्य होत नाही. दहा दिवसांच्या आत कामास सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिले तसे आशयाचे पत्र ही अकोलकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे.
घोडेगांव तालुका चळवळीचे नेते सुधिर वैरागर यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. आंदोलन शांततेत पार पडले. जवळपास तीनशेच्या वर 
  

आंदोलनात  नागरिक सहभागी झाले.रस्त्याच्या दुतर्फा दिड किमी पर्यंत वाहनांचा रांगा लागल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली.आंदोलनात युवकांनी स्वयं स्फुर्तीने सहभाग नोंदवला. 
पोलिस प्रशासनाच्या वतीने शेवगांव उपविभागीय पोलिस उपाधिक्षक निरजकुमार राजगुरू यांचा मागदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे स.पो.नि. विजयकुमार माळी उपनिरीक्षक सुरज मेढे सह पोलिस कर्मचारी यांनी आंदोलन वेळी चोख बंदोबस्त ठेवला.

प्रतिक्रिया - नगर मनमाड रस्त्यावरची वाहतूक अहिल्यानगर -छत्रपती संभाजीनगर मार्गी वळवल्यामुळे रस्त्यावर रोजचं अपघात होत असून रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडले आहे लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती हाथी घेवून नगर संभाजीनगर वळवलेली वाहतूक बंद करण्यात यावी अन्यथा पुन्हा रास्ता रोको आंदोलनचा इशारा कांगोणी सरपंच सोमनाथ कराळे यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...