मंगळवार, २२ जुलै, २०२५

राहाता तालुक्यातील शेतकरी एकवटणार – सौ.प्रभावती घोगरे

 राहाता तालुक्यातील शेतकरी एकवटणार – सौ.प्रभावती घोगरे


२४ जुलैला राहाता येथे शेतकरी मोर्चा – शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन


राहाता (प्रतिनिधी) –
राज्यातील शेतकरी वर्ग सध्या कर्जमाफी, सातबारा कोरा, पीकविमा, वीजबिल माफी अशा अनेक प्रश्नांनी त्रस्त झाला आहे. शासनाच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, याविरोधात आता शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), प्रहार जनशक्ती पक्ष, तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आणि शेतकरी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने, गुरुवार, दिनांक २४ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता राहाता येथे भव्य शेतकरी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
हा मोर्चा विरभद्र मंदिर, राहाता येथून सुरू होऊन तहसील कार्यालय, राहाता येथे पोहोचेल. तेथे शेतकरी वर्गाच्या मागण्यांवर विविध नेत्यांची भाषणे होतील आणि शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार आवाज उठवण्यात येईल.
या मोर्चाचे नेतृत्व सौ. प्रभावती घोगरे करणार असून, त्यांनी शेतकरी, महिला, दिव्यांग, तरुण कार्यकर्ते आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
मोर्चा शांततेत, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गानेच पार पडणार असल्याचे सौ. घोगरे यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...