शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

शिर्डी मतदारसंघातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत डॉ.राजेंद्र पिपाडा यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे निवेदन

शिर्डी मतदारसंघातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत - डॉ.राजेंद्र पिपाडा यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे निवेदन 



     

शिर्डी मतदारसंघातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत या आशयाचे निवेदन देवुन आपण मुख्यमंत्री या नात्याने स्वत: लक्ष घालावे अशी मागणी करुन मुंबई येथे भाजपाचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा केली. दिलेल्या निवेदनात पुढे म्हणाले आहे की, शिर्डी हे देशातील तीर्थ क्षेत्रापैकी एक आहे. लाखो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात परंतु हेच भाविक व शिर्डीतील सामान्य नागरीक सुरक्षित नाही. नुकतेच शिर्डीमध्ये साई संस्थानच्या दोन कामगारांची निर्गुण हत्या झाली व त्यातील एक कामगार गंभीर रित्या जखमी आहे. तसेच शिर्डी परिसरात रस्त्याने जाणा-या शेतक-याला मारहाण झाली,मोटारसायकल चो-या व घरफोड्या हि तर नित्याची बाब झाली. शिर्डीत आलेल्या साईभक्तांच्या गाड्यांच्या काचा फोडुन त्यातुन सामान चोरीला जाते. साई भक्तांच्या गाड्या रात्रीच्या वेळी बंदुकीचा धाक दाखवुन राजरोसपणे लुटल्या जातात. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शिर्डीत येवुन मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचे कारण आहे शिर्डीतील वाढती गुन्हेगारी. शिर्डीमध्ये वेगवेगळे अंमली पदार्थ तसेच व्यसनाधीनतेचे साहित्य पुरवून तरुणांची व्यसनाधीन पिढी बनविण्याचे व गुन्हेगार बनविण्याचे काम चालू असून त्यामुळे हे व्यसनाचे साहीत्य पुरविणारे व विकणारे यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. या गुन्हेगारी मुळे सामान्य लोकांचे बळी जात आहे. शिर्डीतील कामगारांचे खून ही घटना अत्यंत संतापजनक आहे. शिर्डीत गुन्हेगारांच्या टोळ्या वाढवल्या आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शिर्डीत येणारे साईभक्तही सुरक्षित नाहीत चैन स्नॅकींग ,पाकीटमारी या गोष्टीही थांबविणे गरजेचे आहे. सामान्य लोकांच्या मोटरसायकल चो-यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. माझ्या घरासमोरुन ३ दुचाकी चोरीस गेल्या सीसीटीव्हि फुटेज मध्ये आरोपी स्पष्ट दिसत असतानाही अद्यापपर्यंत आरोपी पकडले गेले नाही. सर्व पुरावे असतानाही दुचाकी चोरणारे आरोपी पकडले जात नाहीत हे अतिषय संताप जनक आहे. शिर्डीला दर्शनासाठी येणा-या साईभक्तांच्या गाड्या रात्री रस्त्यावर लुटल्या जातात. काही दिवसांपुर्वीच दोन ठिकाणी साई भक्तांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत याबाबत पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहे. शिर्डी व परिसरामध्ये मोटरसायकल चो-या, खुन,दरोडे, अपहरण, तसेच आमली पदार्थ विक्री या सर्व प्रकारांवर आळा घालून गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी ही विनंती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...