जलसाठा पाच पाटील टीम चाळीसगाव यांच्या वतीने चाळीसगाव येथील अरिहंत मंगल कार्यालयात मिशन ५०० या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाला जलबचतीचे महत्त्व समजावून उत्कृष्ट जलसंधारणाचे काम करणाऱ्या गावप्रमुखांचा सत्कार
पुणतांबा::
. मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा संकल्पक डॉ उज्ज्वल कुमार चव्हाण सर यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने मिशन ५००कोटी जलसाठा पाच पाटील टीम चाळीसगाव यांच्या वतीने चाळीसगाव येथील अरिहंत मंगल कार्यालयात मिशन ५०० या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाला जलबचतीचे महत्त्व समजावून उत्कृष्ट जलसंधारणाचे काम करणाऱ्या गावप्रमुखांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, सदर कार्यक्रमात पुणतांबा येथील पाच पाटील टिम विनोद धनवटे गणेश बनकर,पाराजी वरखड, बाळासाहेब भोरकडे, सतिश मगर, यांनी पुणतांबा व परिसरात जलबचतीची चळवळ उभी करुन अतिरिक्त पावसाचे वाहून जाणारे लाखो लिटर पाणी अडवून जलसाठा तयार करण्यासाठी मोलाचे योगदान दिले म्हणून त्यांना कार्यक्रमांचे अध्यक्ष तथा कराड येथील शिवम् प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख, मा.आयकर आयुक्त डॉ. उज्ज्वल कुमार चव्हाण , श्रीकांत पायगव्हाणेसर सहाय्यक अभियंता मुंबई महापालिका, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्रोही कवी नितिन चंदनशिवे
शेखर निंबाळकर सर यांच्यासह सर्व पाच पाटील टीम चाळीसगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला, या प्रसंगी रवींद्र आमले उपसरपंच गोडेगाव, प्रकाश शेळके पाटील, रामपूर वाडी,अशोकराव आग्रे,जितेंद्र साबदे, सोमनाथ जगताप,संगम भोरकडे हे देखील उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा