शनिवार, ११ जुलै, २०२६

इमामपूर घाट आता हजारो माऊलींच्या भक्तांचा उपस्थितीत ज्ञानेश्वरी घाट नामकरण

इमामपूर घाट आता हजारो माऊलींच्या भक्तांचा उपस्थितीत ज्ञानेश्वरी घाट नामकरण
 - 
बाळासाहेब नवगिरे 

नेवासा  
 अहिल्यानगर- संभाजीनगर राज्यमार्गावरील इमामपूर घाट आता झाला ज्ञानेश्वरी घाट उद्धव महाराज व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थित नामकरण
उद्धव महाराज मंडलीक नेवासेकर, देविदास महाराज म्हस्के तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने इमामपुर घाटाचे नामकरण ज्ञानेश्वरी घाट असे करण्यात आले असून 
यावेळी हभप राम महाराज झिंजुर्के, यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयन गडाख, डॉ. निवेदिता गडाख यांच्यासह हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत इमामपुर घटाचे नामकरण ज्ञानेश्वरी घाट करण्यात आले. या प्रसंगी हजारो वारकरी उपस्थित होते. यावेळी घाटाच्या पायथ्याला ज्ञानेश्वर महाराजांचे शिल्प व पैस खांबाची प्रतिकृती साकारण्यात आली असून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
ज्ञानेश्वरी रचनास्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा ज्ञानोबा,तुकारामाचा जय घोष करत मोठ्या भक्तिमय वातावरणात
  शनिवारी सकाळी शिंगवेतूकाई फाट्यावरून पालखी निघाल्यानंतर पांढरीपुल येथे ठिकठिकाणी ग्रामस्थांनी जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत पालखीचे स्वागत केले. याप्रसंगी बोलतांना देविदास महाराज म्हस्के म्हणाले कि,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी एकत्र येवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीच्या धर्तीवर नेवासा संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या दिंडींला शासनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा पांडुरंगाच्या आशीर्वादाने उत्तरोत्तर वाढत जाणार आहे.संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या जगाला तत्वज्ञान सांगणारी ज्ञानेश्वरी जेथे लिहिली त्या ठिकाणचा असणारा हा सोहळा आता संत ज्ञानेश्वर 
 घाटातुन मार्गस्थ होत असताना मन आनंदाने भरून आले. ज्या प्रमाणे माऊलींची पालखी दिवे घाटातून जाते.त्याच प्रमाणे ज्ञानेश्वरीचे रचना स्थान आलेले श्री क्षेत्र नेवासा येथे पालखी संत ज्ञानेश्वर 
 घाटातून जात आहे. गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत,राम महाराज झिंजुरके,वारकरी व परिसरातील नागरिकांनी स्वागत केले. 
 दिंडी सोहळा मार्गस्थ होत असताना यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख व कार्यकर्ते हे दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते
इमामपूर घाट आता झाला ज्ञानेश्वरी घाट; उद्धव महाराज व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थित नामकरण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...