गुरुवार, २८ मे, २०२६

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याकडून सलग सातव्‍या वर्षी सेंद्रिय केशर आंब्याची देणगी

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याकडून सलग सातव्‍या वर्षी सेंद्रिय केशर आंब्याची देणगी

शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील प्रगतिशील शेतकरी श्री. रवी नारायण करगळ यांनी श्री साईबाबा संस्थानसाठी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला ३५०७ किलो केशर आंबा साई चरणी अर्पण केला आहे. 
श्री. करगळ हे गेल्या १५ वर्षांपासून केशर आंब्याची शेती करत असून त्यांच्या बागेत सुमारे १२५० आंब्याची झाडे आहेत. सुरुवातीपासूनच त्यांनी संपूर्ण बागेत सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. गावरान गायीच्या शेणापासून तयार होणारे सेंद्रिय खत व जीवामृताचा वापर करूनआंबा उत्पादन करत असल्‍याची माहीती त्यांनी दिली.
विशेष म्हणजे, श्री. करगळ हे मागील सहा वर्षांपासून नियमितपणे श्री साईबाबा संस्थानला आंब्याची देणगी देत आहेत. 
देणगी मिळालेल्‍या आंब्‍यांच्‍या रसाचा श्री साईबाबा संस्‍थानचे श्री साईप्रसादालयात प्रसादभेजनामध्‍ये समावेश करण्‍यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...