रविवार, २६ एप्रिल, २०२६

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जलसंवर्धनासाठी मोठे योगदान- खासदार सुजय विखे पाटील

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जलसंवर्धनासाठी  मोठे योगदान- खासदार सुजय
 विखे पाटील

नेवासा



-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त अहिल्यानगर जिल्हयाचे पालकमंत्री व  राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदर्शी व कल्पकतेतून व माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडी ते कर्मभूमी असलेल्या मध्य प्रदेशातील इंदूर संस्थान महेश्वर अशी काढण्यात आलेल्या गोदा-नर्मदा जलजागृती यात्रेचे रविवारी नेवासा नगरीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. अहिल्यादेवींचे जलसंवर्धनाविषयी असलेले योगदान मोठे असून त्यांचे हे कार्य नव्या पिढीला कळावे म्हणून गोदा नर्मदा जलजागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन सुजयदादा विखे पाटील यांनी यावेळी बोलतांना केले
   भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या जलजागृती यात्रेमध्ये जलयात्री मोठ्या संख्येने सहभागी झाले होते  जलजागृती यात्रेचे श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौकात धनगर समाजाच्या वतीने भंडारा उधळीत क्रेनद्वारे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.सदरची जल जागृती यात्रा नेवासा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर येथील स्मारक प्रांगणात आली याठिकाणी गोदावरी,प्रवरा,मुळा या तीन नद्यांच्या कलशातील पाण्याचे पूजन माजी खासदार सुजयदादा विखे पाटील व आमदार विठ्ठलराव लंघे पाटील,नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांच्या हस्ते करण्यात आले व यावेळी कलश यात्रेसाठी सुपूर्त करण्यात आला.
                  यावेळी नगरपंचायत चौकात झालेल्या सभेच्या प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य समाजासह पुढच्या पिढीला कळावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी जलजागृती यात्रेची धुरा जलसंपदा मंत्री ना.विखे पाटील यांच्याकडे सोपवली त्या नुसार ही यात्रा चौंडी येथून सुजयदादा विखे पाटील यांची नेतृत्वाखाली येथे आली असल्याचे सांगत त्यांनी  जल जागृतीचे महत्व विषद केले.
            यावेळी बोलतांना खासदार सुजयदादा विखे पाटील म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्रासह देशात केलेले जलसंवर्धनाविषयी असलेले कार्य मोठे असून त्यांचे हे कार्य नव्या पिढीला कळावे म्हणून अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त ही गोदा नर्मदा जलजागृती यात्रा काढण्यात आली असून यानिमित्ताने गोदावरी व नर्मदा या दोन नद्यांचा संगम या यात्रेमध्ये झालेला आहे जलजागृतीचा हा संदेश समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचवा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
     पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाला विचारांसह दिशा देण्याचे काम केले त्यांच्या या कार्याला अनुसरून या जिल्हयाचे नामकरण अहिल्यानगर करण्यात आले यासाठी मी राज्य सरकारचे आभार मानतो असे सांगून या जलजागृती यात्रेचा संदेश व पाण्याचे महत्व समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचवा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.नेवासकरांच्या वतीने नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील यांनी यात्रेतील सहभागी झालेल्या जलयात्रीचे व नेवासकरांचे आभार मानले.
           यावेळी झालेल्या जलजागृती यात्रा स्वागत कार्यक्रम प्रसंगी भाजपनेते लक्ष्मण सावजी,जेष्ठ नेते किसनराव गडाख,शंकरराव लोखंडे,रामभाऊ खंडाळे,शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार,
जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव,मुळा पाटबंधारे  विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील,नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील, शिवसेनेचे तालुका विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ देसरडा, ज्ञानेश्वर  पेचे,किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे, मराठा महासंघाचे संभाजीराव दहातोंडे,भाजपचे तालुकाध्यक्ष प्रतापदादा चिंधे,जलमित्र व्याख्याते सुखदेव फुलारी,शिवसेना महिला तालुका प्रमुख सौ.शोभाताई आलवणे, कान्हूअण्णा दाणे,अशोकराव मिसाळ,बापूसाहेब नजन,नामदेव खंडागळे,महायुतीचे सर्व नगरसेवक,भाजप शिवसेनेचे पदाधिकारी, नागरिक,शेतकरी महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते


चौकट:-अतिक्रमण धारकांना त्यांच्या नावावर जागा करून देणार-सुजय विखे पाटील
यावेळी बोलतांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष  माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणाले की नगरपंचायतच्या निवडणूकीच्या वेळेला मी बोलल्याप्रमाणे दिलेला शब्द पाळणार असून लवकरच पुढच्या महिन्यात आमदार विठ्ठलराव लंघे पाटील,नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांच्या उपस्थितीत बैठक लावून सर्वांना विश्वासात घेऊन
जेवढे लोक अतिक्रमणधारक आहे त्या सर्वांना त्यांच्या नावे जागा करून देणार असल्याची ग्वाही सुजयदादविखे पाटील यांनी यावेळी बोलतांना दिली त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळयांच्या गजरात स्वागत केले
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...