शेतकरी संपन्न झाला तर भारत सशक्त होईल
श्री पांडुरंग सातपुते
भारतीय शेतकऱ्याने शेती व्यवसाया बरोबरच दुग्ध व्यवसायाकडे लक्ष दिले पाहिजे दुग्ध व्यवसायामुळे शेतकरी संपन्न होईल पर्यायाने भारत सशक्त बनेल असे सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंती निमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले हिंदुस्तान फीड्स शाखा श्रीरामपूर चे एरिया सेल्स मॅनेजर श्री पांडुरंग सातपुते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे महत्त्व सांगितले. रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाखेमध्ये हिंदुस्तान फीड्स कंपनी तर्फे विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्टीफिन व टिफिन बॅग वितरित करण्यात आले याप्रसंगी मार्केटिंग ऑफिसर श्री रवींद्र पवार सर यांनी हिंदुस्तान फीड्स कंपनीचे बनवलेले पशुखाद्य उत्कृष्ट आणि भरपूर दूध देण्यासाठी उपयोगी आहे हे समजावून सांगितले श्री किरण गायकवाड ग्राहक सेवा अधिकारी यांनी हिंदुस्तान फीड्स चे पशुखाद्य अतिशय चांगल्या प्रतीचे आहे आणि ते आपल्या शेतकऱ्यांना स्वावलंबी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी उपयोगी आहे याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी धीरज बोरसे यांनी विद्यार्थ्यांना परिस्थितीनुरू प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात विजय मिळवतो हे पटवून देताना घोडा उंट आणि माकड यांची दाखले देऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगितले
*यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी वाकडी गावचे सुपुत्र हिंदुस्तान फीड्स पशुखाद्य कंपनीचे अधिकृत डीलर विनोद लहारे यांनी विद्यालयाच्या ऋणातून उतराई म्हणून विद्यालयाला सीसीटीव्ही कॅमेरे बसून देण्याचे आश्वासन दिले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 21 हजार रुपये देणगी दिली*
विद्यार्थ्यांना स्टीफन व स्टीफन बॅग मिळाल्यामुळे चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसून आला या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते सुभाषराव कापसे श्री गणेश साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे ,सोपान काका कासार, राजेंद्र जाधव , विजय सदाफळ, मुख्याध्यापक वसावे के के सर उपस्थित होते
मुख्याध्यापक वसावे सर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांचे आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा