बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

शेतकऱ्याच्या मागणीची दखल घेऊन उच्चस्तरीय कालव्यांना तातडीने आवर्तन सोडण्याचे सूचना

लोणी 

निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यातून पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण पाटील यांनी विभागातील अधिकार्यांना दिल्या.

उच्चस्तरीय कालव्यातून पाणी सोडावे या मागणीसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री ना विखे पाटील यांची भेट घेतली.भाजपाचे जेष्ठ नेते सिताराम भांगरे सुनिता भांगरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सद्यपरिस्थितीत अकोले तालुक्यातील शेतकर्यानी मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केली आहे.पाऊसचा मोसम संपल्यापासून उच्चस्तरीय कालव्यांना पाणी सोडण्यात आलेले नसल्याची गंभीर बाब शिष्टमंडळाने मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.

शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेवून उच्चस्तरीय कालव्यांना तातडीने आवर्तन सोडण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...