रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

शिर्डी शहर ओबीसी समाजाने घेतला विकासाचा आणि सन्मानाचा संकल्प

शिर्डी शहर ओबीसी समाजाने घेतला विकासाचा आणि सन्मानाचा संकल्प


शिर्डी:  
शिर्डी शहरातील सर्व ओ.बी. सी. समाजाची शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच व्यापक बैठक यशस्वीपणे संपन्न झाली..

या ऐतिहासिक बैठकीत शिर्डीच्या ओबीसी समाजाने आपल्या अधिकारांसाठी आणि शहराच्या विकासासाठी ठोस संकल्प व्यक्त केला आहे. सभेत ओबीसी समाजाने आपली एकता आणि सामर्थ्य सिद्ध केले.

सभेत शिर्डीच्या ओबीसी समाजाने शहराच्या विकासात आणि केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव केला गेला. विशेषतः बाबूजी पुरोहित, सोपान काका वाघचौरे, हिरामण नाना वारुळे, बाळू भाऊ परदेशी यांसारख्या निष्ठावंत व्यक्तींनी शहर आणि समाजासाठी दिलेले योगदान अधोरेखित केले.

सभेत असे स्पष्ट केले गेले की शिर्डीची मतदारसंख्या ३३,००० आहे, त्यातील १६,००० ओबीसी समाजाचे आहेत, आणि या समाजाला निर्णय प्रक्रियेत योग्य स्थान मिळणे अत्यावश्यक आहे. यासाठी समाजाने आपली ताकद आणि एकता ओळखणे गरजेचे आहे.
भविष्याचे नेतृत्व तयार करण्यावर भर दिला गेला, तरुण आणि महिला सहभाग वाढवणे, स्थानिक समस्या सोडवणे, ओबीसी समाजाचा संघटना मजबूत करणे, चिन्ह बनविणे, सर्व समाजाची लोकसंख्या गणना करणे, येत्या शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत ओबीसी आरक्षित व खुल्या गटातील जागांवर मूळ ओबीसी उमेदवारालाच मतदान करणे, ओबीसी भवन व समाज मंदिर उभारणे, रोजगार निर्मिती करणे, मेळावा आयोजित करणे आणि शहराला नवीन नेतृत्वाचा पर्याय देणे हे प्रस्ताव बहुमताने मंजूर करून यावर विशेष लक्ष केंद्रीत केले गेले. यासाठी कोअर कमिटी तयार करण्याचा निर्णय घेतला गेला, जी समाजाच्या प्रत्येक बैठकीचे आयोजन करेल, अडचणी दूर करेल, आणि जयंती/उत्सव सर्वांनी एकत्रित साजरे करेल.
सभेत उपस्थितांना तीन शपथ घेण्याचे आवाहन केले गेले:
1. घराघरात संपर्क साधणे,
2. मतदानाचा योग्य वापर करून समाजाचा विकास घडवणे,
3. मतदान विक्री नाही तर भागीदारी या तत्त्वावर शिर्डीच्या प्रत्येक निर्णयात सहभाग घेणे.

सभेचा समारोप करताना उपस्थितांना असे आवाहन केले गेले की जर कोणी म्हणालं की तुम्ही अल्पसंख्याक आहात, तर सांगा – “आम्ही १६,००० आहोत. आम्ही अल्प नाही, आम्ही निर्णायक आहोत.”
असे जेष्ठ मार्गदर्शक हिरामण वारुळे यांनी सांगितले ते सभेचे अध्यक्ष स्थानी होते, सूत्रसंचालन, विषय वाचन व प्रास्ताविक ॲड.विक्रांत वाघचौरे यांनी केले तर आभार सुरेश मुळे यांनी मानले,

यामध्ये प्रत्येक समाजातील नेतुत्वाला आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. या व्यापक बैठकीत अनेक विचार पुढे आले प्रत्येक समाजातील लोकांनी आपल्या समाजातील समस्या मांडल्या.

यावेळी ओबीसी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक देवराम सजन, किशोर बोरावके, सुनील सोनवणे, दिपक वारुळे, बाळासाहेब लुटे,यशवंत वाघचौरे,पंढरीनाथ शेकडे, प्रभाकर गिते, आदी व्यास पीठावर विराजमान होते.

तर सुधीर शिंदे, भारत शिंदे, प्रमोद नागरे, संदीप रोकडे, कुणाल वारुळे, मंगेश खांबकर, अशोक पवार, गणेश वाघचौरे, सोमराज कावळे, बद्रीनाथ लोखंडे,अजय नागरे,उत्तम सजन, गणेश खैरे, संतोष जाधव, योगेश शिंदे, गणेश सोनवणे, नानासाहेब काटकर, संपत जाधव, रोहित सोळंकी,संजय परदेशी, शेखर सालकर, प्रशांत भालेराव, प्रशांत वाकचौरे, सहदेव बढे, सुनील मांजरेकर, धनंजय साळी, 
बद्रीनाथ वाकचौरे, संदीप बोबडे, रवी कोलकर, अजय वारुळे आदी  सर्व ओबीसी समाजाचे समाज बांधवांनी मनोगत व्यक्त केले,
यावेळी सर्व ओबीसी समाजातील समाजबांधव या ऐतिहासिक बैठकीस मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...