सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली एम्प्लॉईज सोसायटी प्रगतीपथावरशिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन ) सामाजिक बातमीसाई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी शिर्डी ही संस्था चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने सभासदांच्या हितासाठी घेतलेल्या भरीव निर्णयांमुळे प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करत आहे आणि विरोधकांना चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.कायम कर्मचारी व नाममात्र सभासदांसाठी स्थापन झालेली ही सोसायटी आज सभासदांच्या जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवत आहे. सभासदांना ७ लाख रुपयांपर्यंत फक्त ८ टक्के व्याजदराने कर्ज, क्लिन कॅश क्रेडीट ११ टक्के व्याजदराने, गृहदुरुस्ती कर्ज १३ टक्के दराने तसेच सेवक कर्जावर ८ टक्के दराने आर्थिक मदत दिली जात आहे. आतापर्यंत सभासदांना तब्बल ७२ कोटी रुपयांहून अधिक कर्जपुरवठा करण्यात आल्याने सोसायटीवर विश्वास वाढला आहे. याशिवाय मुला मुलींच्या लग्नासाठी ११ हजार रुपये विनापरतीचे अनुदान, कुटुंबातील सदस्याच्या निधनानंतर तेवढ्याच रकमेत प्रासंगिक मदत, मुलांच्या शैक्षणिक प्रोत्साहनासाठी शालेय साहित्य, सभासद व कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी १० लाखांचा नैसर्गिक मृत्यू विमा यासारख्या योजना राबवल्या जात आहेत. दिवाळी, संक्रांत व गुढीपाडवा निमित्त सभासदांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमुळे सोसायटीने कुटुंबवत्सल संस्थेचा दर्जा मिळवला आहे.फक्त सभासदांपुरतीच नाही तर साईभक्तांसाठीही सोसायटीने पुढाकार घेतला आहे. संस्थान परिसरात प्रसाद व नॉव्हेल्टी स्टोअर, जनरल स्टोअर, दुग्धजन्य पदार्थ व थंडपेय विक्री स्टॉल तसेच मोफत पादत्राणे गृह व बॅग क्लोकरूम यांसारख्या सुविधा देऊन सेवा हाच धर्म ही संकल्पना साकारली आहे. साई तीर्थ किंवा ट्रेडमार्कसह विक्रीस ठेवलेला प्रसाद, पेढा आणि बाटलीबंद पाणी भक्तांचा विश्वास संपादन करत आहे.सभासद व भक्तांच्या सेवेसाठी पारदर्शक व हितकारक काम करत असल्यामुळे सोसायटी प्रगतीपथावर आहे. सभासद, साईभक्त, लोकप्रतिनिधी व संस्थान अधिकारी यांचे सहकार्य लाभत असल्याने विरोधकांचे सर्व डावपेच फोल ठरले आहेत, असे प्रतिपादन चेअरमन विठ्ठल पवार यांनी केले.

विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली एम्प्लॉईज सोसायटी प्रगतीपथावर


शिर्डी 



साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी शिर्डी ही संस्था चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने सभासदांच्या हितासाठी घेतलेल्या भरीव निर्णयांमुळे प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करत आहे आणि विरोधकांना चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.

कायम कर्मचारी व नाममात्र सभासदांसाठी स्थापन झालेली ही सोसायटी आज सभासदांच्या जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवत आहे. सभासदांना ७ लाख रुपयांपर्यंत फक्त ८ टक्के व्याजदराने कर्ज, क्लिन कॅश क्रेडीट ११ टक्के व्याजदराने, गृहदुरुस्ती कर्ज १३ टक्के दराने तसेच सेवक कर्जावर ८ टक्के दराने आर्थिक मदत दिली जात आहे. आतापर्यंत सभासदांना तब्बल ७२ कोटी रुपयांहून अधिक कर्जपुरवठा करण्यात आल्याने सोसायटीवर विश्वास वाढला आहे. याशिवाय मुला मुलींच्या लग्नासाठी ११ हजार रुपये विनापरतीचे अनुदान, कुटुंबातील सदस्याच्या निधनानंतर तेवढ्याच रकमेत प्रासंगिक मदत, मुलांच्या शैक्षणिक प्रोत्साहनासाठी शालेय साहित्य, सभासद व कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी १० लाखांचा नैसर्गिक मृत्यू विमा यासारख्या योजना राबवल्या जात आहेत. दिवाळी, संक्रांत व गुढीपाडवा निमित्त सभासदांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमुळे सोसायटीने कुटुंबवत्सल संस्थेचा दर्जा मिळवला आहे.

फक्त सभासदांपुरतीच नाही तर साईभक्तांसाठीही सोसायटीने पुढाकार घेतला आहे. संस्थान परिसरात प्रसाद व नॉव्हेल्टी स्टोअर, जनरल स्टोअर, दुग्धजन्य पदार्थ व थंडपेय विक्री स्टॉल तसेच मोफत पादत्राणे गृह व बॅग क्लोकरूम यांसारख्या सुविधा देऊन सेवा हाच धर्म ही संकल्पना साकारली आहे. साई तीर्थ किंवा ट्रेडमार्कसह विक्रीस ठेवलेला प्रसाद, पेढा आणि बाटलीबंद पाणी भक्तांचा विश्वास संपादन करत आहे.

सभासद व भक्तांच्या सेवेसाठी पारदर्शक व हितकारक काम करत असल्यामुळे सोसायटी प्रगतीपथावर आहे. सभासद, साईभक्त, लोकप्रतिनिधी व संस्थान अधिकारी यांचे सहकार्य लाभत असल्याने विरोधकांचे सर्व डावपेच फोल ठरले आहेत, असे प्रतिपादन चेअरमन विठ्ठल पवार यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...