शनिवार, १७ मे, २०२५

शिर्डी विधानसभा मतदार संघ हा राज्यात आदर्श कसा राहील यासाठी सदैव प्रयत्नशील - डॉ.सुजय विखे पाटील





 निळवंड्यांचे पाणी देणार हा विश्वास जनतेला दिला होता आज निळवंडे चे पाणी आपल्याला मिळाल्याने हा विश्वास सार्थकी ठरला. आपण ठेवलेला विश्वास हाच खऱ्या अर्थाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय आहे. पाण्यासाठी कुणी आडवे येवू नये. गुन्हेगारी मुक्त शिर्डी मतदार संघासाठी आजही आपली भूमिका आपण बदललेली नाही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही उलट शिर्डी विधानसभा मतदार संघ हा राज्यात आदर्श कसा आदर्श कसा राहील यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
निर्मळ पिंपरी, अस्तगांव, केलवड, आडगांव बुद्रुक येथील पाझर तलाव तलावाचे जलपूजन प्रसंगी डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी पाटबंधारे विभागाचे अभियंता लव्हाटे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी महिला उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ. विखे पाटील म्हणाले,,निळवंडे चे पाणी येईल की नाही ही प्रत्येकाच्या मनात शंका होती परंतु आज ती शंका दूर झाली आहे. प्रत्येकाला पाणी मिळत आहे आणि यापुढेही ते मिळत राहणार आहे. आज मी बोललो की मोठी टीका टिपणी होती परंतु शिर्डी आज भयमुक्त होत आहे. त्याचबरोबर मतदार संघामध्ये वेगवेगळ्या कामातून विकास हा सुरू आहे विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध आहे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे निळवंडे हे स्वप्न होते आज त्याची पूर्तता झाली आहे ते जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष असतांना जिरायत भागांमध्ये पाझर तलावाची निर्मिती त्यांनी केली आज ते पाझर
 तलाव उन्हाळ्यामध्ये भरले हा आनंद आपल्यासाठी मोठा आहे.
जनतेच्या हितासाठी वाईटपणा घ्यावा लागला तरी तो वाईटपणा घेण्यासाठी आपण सज्ज आहोत आणि मतदार संघ हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आपण होऊ देणार नाही. या मतदारसंघा मध्ये अनेकांनी विष कालवण्याचे काम केलं परंतु त्यांना जनतेने धडा शिकवला आहे काम करणाऱ्याच्या मागे जनता ही कायम असते हेच शिर्डी मतदार संघामध्ये जनतेने दाखवून दिले आहे. गोरगरीब जनतेसाठी सदैव कार्यरत राहून जनतेसाठी आपल्यापुढे पैशाचे मोल काहीच नाही आज जिरायत भागाची ओळख बागायत भाग म्हणून होत आहे. आता प्रत्येकाला पाणी मिळणार आहे उपलब्ध पाण्यावरती ऊस लागवड करून ऊस उपलब्ध करा विखे पाटील कारखान्याची गाळप क्षमताही वाढवली आहे. आपण ऊस बेणे देऊ तुम्ही फक्त ऊस लागवड करा त्याची जोपासना आणि
ऊस तोडून नेण्याची जबाबदारी आपली राहील. संकटामध्ये तुम्ही उभे राहिलात मी तुमच्या पाठीशी कायम उभा राहील असेही डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.


प्रत्येक आवर्तनातून आपण पाणी देण्यासाठी अभ्यास करत आहोत प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी देणे ही आपली जबाबदारी आहे या पुढील काळात पाणी द्या असे अर्ज तुम्ही करण्याऐवजी पाणी बंद करा असे अर्ज आपल्याकडून येतील असे सांगतानाच ज्यांनी पाणी दिले त्यांनाच ऊस द्या असे आवाहन डॉ. विखे यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार गाजला; तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आश्वासन

डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार गाजला; तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आश्वासन   राहाता  भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे प...