बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

संस्कार असेल तर संस्कृती टिकेल.- अनिलकाका गाढवे

 संस्कार असेल तर संस्कृती टिकेल.-  अनिलकाका गाढवे




 गणेशनगर - 

 रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती कार्यक्रमाला सुरुवात झाली.यावेळी अध्यक्षपदावरून गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे पाटील यांनी छत्रपती शिवरायांचे कार्य सांगताना असे सांगितले की आज समाजामध्ये संस्काराची फार गरज आहे संस्कार असतील तर संस्कृती टिकेल देश बलवान होईल.हे सांगताना महाराजांचे विचार  आचरणात आणायचे असतील तर प्रत्यक्षात भारतातील प्रत्येक नागरिकाने छत्रपती शिवरायांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. त्यांच्या विचारावर निष्ठा ठेवून कृती केली पाहिजे, समाजातील माता भगिनींना आदरपूर्वक सन्मानाची वागणूक दिली पाहिजे.या जयंतीनिमित्त हेच खरे अभिवादन शिवरायांसाठी असेल . या वेळी विद्यार्थी भाषणामध्ये गौरी घोगळ, प्रणाली पवार,आरोही बोधक, श्रेया कासार, तेजल शेलार, आराध्य गाढवे, अभिषेक बिरदोडे , श्रुती  बोर्डे ,भावना गाढवे ,गोरे कोमल, तेजस्विनी आदिक या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर भाषणे केली इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यिनींनी शिवरायांच्या जीवनावर गीत गायन केले. शिक्षक मनोगतमध्ये श्री धनवडे सर यांनी छत्रपती शिवरायांच्या जन्माचा प्रसंग सांगून राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांवरती बालपणापासून जे संस्कार केले तेच संस्कार त्यांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी प्रेरणादायी ठरले.म्हणून आई असावी तर राजमाता जिजाऊ सारखी पुत्र असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे.हे सांगतांना महाराजांच्या कर्तबगारीचा लेखा जोखा विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर यांनी शिवरायांच्या जीवनातील युद्धचातुर्य कौशल्याची माहिती मुलांना सांगितली. आदर्श राजा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हे सांगताना जी व्यक्ती प्रसंगी दोन पाऊल मागे येते ती चार पाऊल जास्त प्रगती करू शकते. आणि याच जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 360 किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे समजावून सांगितले. घरातील प्रत्येक आईने आपल्या मुलावरती राजमाता जिजाऊ सारखे संस्कार केले पाहिजेत तरच घराघरात छत्रपती शिवाजी महाराज पाहायला मिळतील व स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर होईल.
या कार्यक्रमासाठी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलकाका गाढवे पाटील, विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री वसावे के के सर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपभाऊ गाढवे पाटील, वाल्मीकभाऊ गाढवे पाटील ,सामाजिक कार्यकर्ते कारभारी पाटील घोगळ ,विनायकभाऊ देठे , पर्यवेक्षक तनपुरे सर उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रणाली पवार व गौरी घोगळ या विद्यार्थिनींनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती उंडे मॅडम यांनी केले 
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...