संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५
संस्कार असेल तर संस्कृती टिकेल.- अनिलकाका गाढवे
रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती कार्यक्रमाला सुरुवात झाली.यावेळी अध्यक्षपदावरून गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे पाटील यांनी छत्रपती शिवरायांचे कार्य सांगताना असे सांगितले की आज समाजामध्ये संस्काराची फार गरज आहे संस्कार असतील तर संस्कृती टिकेल देश बलवान होईल.हे सांगताना महाराजांचे विचार आचरणात आणायचे असतील तर प्रत्यक्षात भारतातील प्रत्येक नागरिकाने छत्रपती शिवरायांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. त्यांच्या विचारावर निष्ठा ठेवून कृती केली पाहिजे, समाजातील माता भगिनींना आदरपूर्वक सन्मानाची वागणूक दिली पाहिजे.या जयंतीनिमित्त हेच खरे अभिवादन शिवरायांसाठी असेल . या वेळी विद्यार्थी भाषणामध्ये गौरी घोगळ, प्रणाली पवार,आरोही बोधक, श्रेया कासार, तेजल शेलार, आराध्य गाढवे, अभिषेक बिरदोडे , श्रुती बोर्डे ,भावना गाढवे ,गोरे कोमल, तेजस्विनी आदिक या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर भाषणे केली इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यिनींनी शिवरायांच्या जीवनावर गीत गायन केले. शिक्षक मनोगतमध्ये श्री धनवडे सर यांनी छत्रपती शिवरायांच्या जन्माचा प्रसंग सांगून राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांवरती बालपणापासून जे संस्कार केले तेच संस्कार त्यांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी प्रेरणादायी ठरले.म्हणून आई असावी तर राजमाता जिजाऊ सारखी पुत्र असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे.हे सांगतांना महाराजांच्या कर्तबगारीचा लेखा जोखा विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर यांनी शिवरायांच्या जीवनातील युद्धचातुर्य कौशल्याची माहिती मुलांना सांगितली. आदर्श राजा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हे सांगताना जी व्यक्ती प्रसंगी दोन पाऊल मागे येते ती चार पाऊल जास्त प्रगती करू शकते. आणि याच जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 360 किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे समजावून सांगितले. घरातील प्रत्येक आईने आपल्या मुलावरती राजमाता जिजाऊ सारखे संस्कार केले पाहिजेत तरच घराघरात छत्रपती शिवाजी महाराज पाहायला मिळतील व स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर होईल.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शिर्डी, संरक्षण क्षेत्रात खास...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा