शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४

चांगल्या कार्यास सहकार्य करने मानसांच्या जिवनात आनंद निर्माण करने हाच आपला. हेतु आहे आमदार- श्री बाळासाहेब थोरात

राहता 
चांगल्या कार्यास सहकार्य करने मानसांच्या जिवनात आनंद निर्माण करने हाच आपला. हेतु आहे
आमदार- श्री बाळासाहेब थोरात


चांगल्या कार्यास सहकार्य करणे, सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणे हाच आपला हेतू आहे.  बँकेच्या उद्घाटनाच्या  कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक उपस्थिती आहे.  असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या राहता शाखेच्या उद्घाटन  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, गणेश सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, गणेशचे माजी अध्यक्ष ऍड. नारायणराव कार्ले, उपाध्यक्ष विजयराव दंडवते, डॉ. राजेंद्र पिपाडा, प्रभाताई घोगरे, लताताई डांगे, डॉ. एकनाथ गोंदकर, बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी, उपाध्यक्ष ऍड. नानासाहेब शिंदे, श्रीरामपूर दूध संघाचे अध्यक्ष सुधीर म्हस्के, सुरेश थोरात, शिवाजीराव लहारे, सुरेंद्र खर्डे, विक्रांत दंडवते, भगवानराव टिळेकर, धनंजय गाडेकर यांच्यासह संजीवनी, गणेश व संगमनेर साखर कारखान्याचे संचालक, अमृतवाहिनी बँकेचे संचालक मंडळ ,परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते 


यावेळी आमदार थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृत वाहिनी सहकारी बँकेची उत्कृष्ट पद्धतीने वाटचाल सुरू असून पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी बँकेकडे आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी ही बँक स्थापन केली. आज बँकेचा व्यवहारात खूप मोठी वाढ झाली असून एनपीए हा अत्यंत कमी आहे. बँकेचे कार्य हे अत्यंत उत्कृष्ट असून संगमनेर तालुक्याच्या विकासात मोठा हातभार लावला आहे. संगमनेर साखर कारखाना, संगमनेर तालुका राजहंस दूध संघ, बाजार समिती, विविध सहकारी संस्था, बँका, पतसंस्था, शिक्षण संस्था यांच्यामुळे संगमनेरचा सहकार हा राज्यात आदर्श ठरला आहे. मेडिकल, इंजीनियरिंग व  विविध कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थी आज शिक्षण घेत आपले भविष्य घडवीत आहे . समृद्ध अर्थव्यवस्था संगमनेर तालुक्यामध्ये  निर्माण झाली आहे. आपल्या राजकारणाचा उद्देश हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणे हाच असून गरिबांचे जीवनमान उंचावणे, त्यांची जीवनातील वाटचाल यशस्वी करणे हीच राजकीय भूमिका सातत्याने घेऊन वाटचाल सुरू आहे असे सांगून थोरात पुढे म्हणाले, पूर्वी गणेश कारखान्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली होती. परिसरात पेरूच्या बागांची समृद्धी होती. हजारो ट्रक भरून जात होत्या परंतु कालांतराने पाणी कमी झाले. परिस्थिती बदलली सभासदांनी कारखाना ताब्यात दिला परंतु आज गणेश कारखाना आर्थिक अडचणीत आहे. कारखान्याच्या कोणीही कर्ज पुरवठा करण्यास तयार नाही या सर्व आर्थिक अडचणीतून कारखान्याची वाटचाल सुरू आहे पहिल्या वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक उतारा मिळवीत सव्वा दोन लाख टन उसाचे गाळप केले. येणाऱ्या गळीत हंगामात देखील आर्थिक अडचणींवर मात करून गणेश चांगले गाळप करेल असे त्यांनी सांगितले.



याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, एड. नारायणराव कार्ले सुधाकरराव जोशी यांची देखील भाषणे झाली.शशीकांत लोळगे,सचिन चौगुले,ॲड. पंकज लोंढे,सचिन सदाफळ, गणेश सोमवंशी,शिमाॅन जगताप, राजेंद्र अग्रवाल, अनिल जगताप, बाबासाहेब डांगे, घोरपडे यासह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने हजर होते...*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...