बिगर सिंचनाच्या आवर्तना बरोबर सात नंबर फॉर्म वर शेती सिंचनाचे खरीप आवर्तन द्यावे
राहाता=
पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी होत असताना ही राहाता तालुक्यात परिसरात अद्यापही रिमझिम पाऊस वगळता समाधानकारक मोठा पाऊसच नसल्याने शेतकऱ्यासह नागरिकात चिंता व्यक्त केली जात असून गोदावरी कालव्यांना खरिपाची आवर्तनची मागणी गोदावरी कालवा लाभ क्षेत्रातून होत आहे गोदावरीला दुसऱ्यांदा पाणी सोडल्याने गोदामाई दुथडी भरून वाहू लागली आहे गोदाकाठी समाधान व्यक्त केले जात आहे
पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले आहे. मात्र तालुक्यात तसेच राहता परिसरात मुसळधार पाऊस झालेला नसून ओढ, नाले वाहते झाले नसल्याने विहिरींच्या पाणीपातळीत ही वाढ झाली नाही. आठ दिवसांनी एखादा रिमझिम पाऊस हजेरी लावीत आहे. अपुऱ्या पावसावरच खरीप पिकांच्या काही प्रमाणात पेरण्या झालेल्या असून पेरण्या केलेले शेतकऱ्यासह नागरिक समाधानकारक मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गोदावरीला दुसऱ्यांदा अकरा हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी आता दुथडी भरून वाहती झाली आहे. त्यामुळे नदीकाठ सुखावला आहे परंतु तालुक्यात पावसाअभावी जमिनीतील पाणी पातळी खोलवर गेली असून विहिरी, बोरवेल यांना पाणी उतरलेले नाही. जुन महिन्यातील झालेल्या जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, कापूस, चारा पिकांची पेरणी केली आहे. परंतु जवळपास दीड ते पावणेदोन महिने पावसाने उघडी दिल्यामुळे सध्या उतरून पडलेली पिके पाण्याअभावी सुकून चालली आहे. गोदावरी कालवा लाभ क्षेत्रातील फळबागा, ऊस या बारामाही पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने सध्या सुरू असलेल्या बिगर सिंचनाच्या आवर्तना बरोबरच सात नंबर फॉर्मवर शेती सिंचनाचे खरीप आवर्तन देखील द्यावे अशी मागणी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
पुणतांबा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट यामुळे पाण्याखाली गेला आहे गोदामाई दुथडी भरून वाहती झाल्याने पुणतांबा परिसरातील नदी काठावरील गावांना मोठा फायदा होणार असून तसेच धाकट्या आषाढी एकादशीला पुणतांबा येथे मोठ्या संख्येने भाविक संत चांगदेव महाराज यांच्या दर्शनासाठी व गंगा स्नानासाठी येत असतात. गोदामाईच्या पाण्यात पवित्र स्नानाची परवणी यामुळे साधता येणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा