सोमवार, १४ एप्रिल, २०२५

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त दलित समाजच नव्हे तर सर्व जाति धर्मातील नागरिकांना न्याय व हक्क मिळुन देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले- .प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त दलित समाजच नव्हे तर सर्व जाति धर्मातील नागरिकांना न्याय व हक्क मिळुन देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले- .प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा



डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त दलित समाजच नव्हे तर सर्व जाति धर्मातील नागरिकांना न्याय व हक्क मिळुन देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अशी भावना प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना व्यक्त केली. यावेळी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा आरपीयाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव वाघमारे,साहिल पिपाडा आदी यावेळी उपस्थित होते. 
           सौ.ममता पिपाडा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली यावेळी बाबासाहेबांचे प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन केले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना त्या पुढे म्हणाल्या की, एकसंघ भारत बनविण्याचे काम हे डॉ.बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या  संविधानमुळे आहे. देश घडविण्यासाठी बाबासाहेबांचे अतुलनील कार्य आहे.चुकीच्या रुढी परंपरा -मानवाला मानव म्हणायला तयार नव्हता अशा परिस्थितीतुन त्यांना संविधानाच्या माध्यमातुन न्याय व हक्क मिळुन दिला. प्रत्येक व्यक्तीला जगणाच्या समान अधिकार मिळवुन दिला. भारतातील प्रत्येकाचे स्वप्न पुर्ण होतील असे संविधान देशाला दिले. विसकित भारत घडण्यात संविधानाचा वाटा मोठा आहे. त्यांचे शिक्षण  चालु असताना त्यांना अनेक अडी-अडचणींना समोरे जावे लागले तरी त्यांना समाज उत्थानाचा विचार कधी सोडला नाही. समाज निर्मितीचे कार्य अतुलनीय आहे. संपूर्ण विश्वाला शांतीच्या जोरावर जिंकले असे भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला त्याचे प्रतिक म्हणुन भारतीय संविधानाचा गाभा- भगवान बुद्धांच्या विचाराने तयार झालेला आहे. तोच विचार प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजविण्याचा काम डॉ.आंबेडकरांनी केला. बाबासाहेबांनी संकल्प केला होता की कुठल्याही परिस्थित संविधानिक मुल्यांपासुन आपण तसुभर ढळणार नाही. हे सर्व ग्राथांपेक्षा संविधानच सर्वोचच आहे.डॉ.बाबासाहेब हे उत्तम प्रशासक होते,कामगार मंत्री असताना कामगारांना त्यांचे अधिकार देण्याचे कायदे तयार केले. त्यांना मिळालेल्या पदांच्या माध्यमातुन बाबासाहेबांनी विकासाचा पाया रचण्याचे काम केले. अशा या महामानवाला कोटी-कोटी वंदन करते अशी भावना प्रथम लोकनियुक्त सौ.ममता पिपाडा यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...