गुरुवार, १९ मार्च, २०२६

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील 

दाढ बुद्रुक 
आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची मर्यादित परंपरा नसून सर्व धर्मांना एकत्र आणणारा उत्सव आहे, असे ठाम प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. दाढ बुद्रुक येथे आदन मदन बाबा यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करताना त्यांनी सामाजिक सलोखा, संयम आणि एकात्मतेचा संदेश दिला.

अनेक वर्षे खंडित झालेली ही यात्रा डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी पुन्हा सुरू झाली असून यंदा तिचे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि परस्पर सहकार्यामुळे यात्रा अत्यंत शांततेत व भव्य स्वरूपात पार पडली होती. त्याबद्दल त्यांनी सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानले.

यावेळी प्रवरा उद्योग समूहाचे पदाधिकारी, गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, यात्रा उत्सव समितीचे सदस्य तसेच सर्व समाजातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विखे परिवाराच्या वतीनेही या तीन दिवसांमध्ये कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील, असा विश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.

प्रवरा परिसराची ओळख ही सर्व धर्मीय एकात्मतेची आहे. येथे धर्माच्या नावावर भेदभाव कधीच होऊ दिला जाणार नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माचे सण-उत्सव साजरे करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासोबत इतरांच्या भावनांचा आदर राखणे तितकेच आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, माफी करणारा माणूस हा चूक करणाऱ्यापेक्षा मोठा असतो. त्यामुळे यात्रेदरम्यान संयम राखून, शांतता टिकवून ही परंपरा अधिक भक्कम करावी, असे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले.

यात्रेच्या निमित्ताने गावाच्या विकासासंदर्भातही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. आदन मदन बाबा प्रांगणात नियोजनबद्ध पद्धतीने नवीन वास्तू उभारण्याचा मानस व्यक्त करताना सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी, स्मशानभूमीसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणे व संरक्षक भिंत उभारणे आदी कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून, सार्वजनिक सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल. पुढील वर्षी अधिक सुसज्ज आणि नियोजनबद्ध स्वरूपात यात्रा साजरी करण्याचा आपला संकल्प आहे,असेही त्यांनी सांगितले.

शेवटी, आपली एकजूट हीच आपली खरी ताकद आहे. ही एकात्मता अबाधित ठेवणे हीच आदन मदन बाबा यात्रेची खरी परंपरा आहे,असे सांगत डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांना एकतेचा संदेश दिला.

बुधवार, १८ मार्च, २०२६

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता

राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.*

*रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.*

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता

राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.


राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह  कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता  रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवार, १७ मार्च, २०२६

घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्काळ सुरळीत करा - - शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची मागणी

घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्काळ सुरळीत करा - 
- शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची मागणी

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या  प्रमुख पदाधिकारी यांनी आज नुकतेच अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांची कार्यालयात भेट घेऊन जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलेंडरचा कृत्रिमपणे निर्माण झालेला तुटवडा तात्काळ दूर करण्याची मागणी केली, याची गंभीर दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी महोदयानी तात्काळ माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडून माहिती मागवली आणि काळाबाजार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात.
शिवसेना नेते तथा अध्यक्ष खा.अनिल भाऊ देसाई आणि सरचिटणीस विजय मालणकर यांच्या सुचनेवरून शिर्डी येथील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात कांही ग्राहकांच्या लेखी तक्रारी आल्याने त्याची दखल घेत सर्वं पदाधिकारी यांनी माननीय जिल्हाधिकारी यांची तात्काळ भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रांतिक सदस्य मुकुंद सिनगर यांनी अधिक सांगितले की, एका बाजूला राज्यकर्ते सांगतात की भारत देशाची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरु आहे आणि वास्तविकतेत आपण साधा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वेळेवर करू शकत नाही, हे भीषण सत्य आहे. यातच शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असून आपल्या जिल्ह्यातील गॅस वितरणामध्ये मोठा काळाबाजार सुरु असल्याचे आमच्याकडे आलेल्या तक्रारीतून स्पष्ट जाणवते आहे. अनेक गॅस एजन्सी कृत्रीम तुटवडा भासवून ऑनलाईन बुकिंग बंद करणे, बुकिंग नसेल तर वाढीव पैसे आकारणे, घरगुती गॅस वाढीव दराने व्यावसायिकांना देणे असे प्रकार सुरु आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. यापुढे असे प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ आमच्या जवळच्या कार्यालयात अथवा संबंधित शाखा संघटक यांच्याशी संपर्क साधून लेखी तक्रार देणेबाबत आवाहन करत सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी शिवसेना सतत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. यानंतर कार्यालयप्रमुख ऍड.राहुल नवले यांनी शासनाच्या परिपत्रकाची माहिती देत कायदेशीर मार्गाने प्रत्येक ग्राहकाला न्याय मागण्याचा अधिकार असून चुकीचा प्रकार दिसल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले. 

यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद सिनगर, जिल्हा कार्यालयप्रमुख ऍड.राहुल नवले, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख धर्मा जावळे, तालुका संघटक रिंकेश जाधव, उपतालुका संघटक श्रीराम कदम, कक्ष शहर संघटक रवि सोनवणे, कक्ष उपशहर संघटक हृषीकेश भोळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शुक्रवार, १३ मार्च, २०२६

डॉक्टर च्या रुपाने साक्षात देवच आले मदतीला

आज आम्ही पुणे येथून येवला येथे लग्नासाठी शिर्डी मार्गे जात असताना कवठे कमलेश्वर जवळ एका वळणावर आमची गाडी घसरून नाल्यात कोसळली. त्या वेळी आम्ही पती-पत्नी दोघेही गाडीत अडकून पडलो होतो आणि परिस्थिती अत्यंत धोकादायक होती.

अशा वेळी डॉ. योगेश गेठे यांनी देवदूतासारखे येऊन स्वतःची गाडी थांबवली आणि तात्काळ आमच्या मदतीला धावून आले. त्यांनी आम्हाला गाडीतून सुरक्षित बाहेर काढले, आमची विचारपूस केली तसेच आमचे प्राथमिक उपचार (First Aid) देखील केले.

याशिवाय त्यांनी क्रेन सर्व्हिसची व्यवस्था केली, इन्शुरन्स क्लेम प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले आणि संबंधित लोकांचे संपर्क (contacts) देखील आमच्याशी शेअर केले. संपूर्ण प्रसंगात त्यांनी अतिशय शांतपणे, निस्वार्थ भावनेने आणि माणुसकी जपत आम्हाला सर्वतोपरी मदत केली.

यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीत बसवून शिर्डी बसस्टँडपर्यंत सुरक्षित सोडले. इतकेच नव्हे तर आमच्यासाठी चहा-नाश्त्याचीही व्यवस्था करून आमची मनापासून काळजी घेतली.

नंतर आम्हाला समजले की डॉ. योगेश गेठे हे शिर्डी संस्थानमध्ये ENT स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी केलेली ही निस्वार्थ मदत, दाखवलेली माणुसकी आणि सेवाभाव आम्हाला आयुष्यभर लक्षात राहील.

आजच्या काळात अशी निस्वार्थ सेवा आणि माणुसकी दुर्मिळ झाली आहे. शिर्डी संस्थानमध्ये अशा सेवाभावी आणि कर्तव्यदक्ष व्यक्ती कार्यरत आहेत, याचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो. आपल्या संस्थान मध्ये अशा व्यक्ती कार्यरत आहेत ही खरोखरच संस्थानची प्रतिष्ठा वाढवणारी बाब आहे

सुसंकल्प ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साही. राजेंद्र फंड यांची निवड:

सुसंकल्प ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साही. राजेंद्र फंड यांची निवड:
   
                   मराठी भाषा गौरव दिनानिमित्त  दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचे गांव  असणाऱ्या तरवडी येथे घेण्यात येणाऱ्या सुसंकल्प ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साही. राजेंद्र फंड यांची निवड झाल्याची घोषणा या संमेलनाचे अध्यक्ष साही. सायमन भारस्कर यांनी केली आहे. 
              साही. राजेंद्र फंड  हे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख असून गेल्या 15 वर्षापासून  ते " ग्रामसेवा संदेश " हा दिवाळी अंक प्रकाशित करतात. महाराष्ट्रभर त्यांचा दिवाळी अंकामुळे खूप मोठा  साहित्यिक परिवार आहे.  यांची या वर्षात महाराष्ट्रातील पुणे , कोल्हापूर, सातारा, भंडारा, वडाळा, निमगाव वाघा , श्रीरामपूर, दाभे मोहन, शिर्डी, अहिल्यानगर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात व  ठिकाणी 4 वेळा संमेलनाध्यक्ष, एक वेळा स्वागताध्यक्ष, 4 वेळा कविसंमेलनाध्यक्ष, एक वेळा विशेष अतिथी, एक वेळा पुस्तक प्रकाशन समारोह अध्यक्ष, 14 व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन महाबळेश्वर येथे आयोजक सदस्य होते. 
               संमेलनाचे अध्यक्षपदी कवी,गितकार बाबासाहेब पवार हे असुन उदघाटक ॲड.देसाई देशमुख.(व्हा.चे.ज्ञा.स.सा.का.) असणार आहे.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे खासदार भाऊसाहेब वाकचौरे सो., आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आदर्श ग्रा.पं.सौंदाळाचे सरपंच  शरद पा.अरगडे, , ग्रामीण साहित्यिक भाऊसाहेब सावंत, आला बाबुराव फेम सुरेश कांबळे,  वरिष्ठ पत्रकार डॉ.शाम जाधव नाशिक.अब्दुल भय्या शेख.आदी उपस्थित राहणार आहेत.
               या एकदिवसीय साहित्य संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद,कवी संमेलन व पुरस्कार वितरण समारोह आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
            साही. राजेंद्र फंड यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाचे संपादक डॉ. एकनाथराव ढाकणे, शिवसेना नेते रामदास गोल्हार, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव साही. सुनील गोसावी, राज्य संघटक प्राध्या. डॉ. अशोक कानडे, शर्मिला गोसावी, राहाता शाखेचे कवयत्री वैष्णवी निर्मळ , सुमेध ब्राम्हणे, नरेंद्र पवार, शब्दगंध नेवासा शाखेचे दिगंबर गोंधळी, कोपरगांव शाखेचे   ऐश्वर्याताई सातभाई, , प्राध्या. संजय दवंगे, पत्रकार हेमचंद्र भवर,  विष्णू तांबे, प्राध्या. संजय दरवडे, मेजर रामचंद्र पाठक, कवी संदीप नांगरे, रज्जाक शेख, मच्छिंद्र जाधव, बाळकिसन धूत,  पत्रकार सुधीर चव्हाण,  लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे प्रेसिडेंट तथा सह्याद्री ट्रेकिंग ग्रूपचे अध्यक्ष ला. विनोद गाडेकर व सर्व टीम, झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे, बाळासाहेब कचरे, लक्ष्मण कचरे, अंबादास कचरे, बाजीराव कचरे, आप्पासाहेब कावरे, रामकृष्ण गरड, राजेंद्र राऊत , शकूर इनामदार आदींनी अभिनंदन केले आहे.

गुरुवार, १२ मार्च, २०२६

महागाई व गॅस दरवाढीविरोधात राहाता तहसीलवर महाविकास आघाडीचा एल्गार

महागाई व गॅस दरवाढीविरोधात राहाता तहसीलवर महाविकास आघाडीचा एल्गार

राहाता  
केंद्र सरकारच्या धोरणांमुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने राहाता तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाढत्या महागाईचा व गॅस दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. शेतकरी, कामगार तसेच महिला वर्गावर या महागाईचा मोठा आर्थिक बोजा पडत असून केंद्र सरकारने यावर तात्काळ नियंत्रण आणावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे घरगुती अर्थकारण कोलमडल्याचे नमूद करण्यात आले. तसेच गॅस ऑनलाइन बुकिंग करताना ओटीपी वेळेत न मिळणे, बुकिंग प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येणे तसेच बुकिंग करूनही गॅस वेळेत उपलब्ध न होणे अशा समस्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गॅस वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सौ. प्रभावती घोगरे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाल्याचे सांगितले. गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे जनतेवर अन्याय होत असून सरकारने तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, धनंजय गाडेकर, सचिन चौगुले, शशिकांत लोळगे, उत्तमराव घोरपडे, सौ. नीलम ताई सोळंकी, रणजीत बोठे, गणेश सोमवंशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या आंदोलनात सुधीर म्हस्के, अनिल बोठे, उत्तमराव मते, ज्ञानेश्वर वर्पे, राजेंद्र निर्मळ, राजेंद्र अग्रवाल, पुंडलिक बावके, अमोल गायके,सदाशिव गाडेकर, मुन्ना फिटर, जयसिंग सातव,शिवप्रसाद आहेर सह महिला प्रतिनिधी लोणी खुर्द ग्रामपंचायत सदस्या सौ.आशाताई आहेर, सौ. सुनिताताई कोरडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...