संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
शनिवार, ३१ मे, २०२५
साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी नवोदित कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत पत्रकार विश्वास आरोटे .
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी..
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी..
एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव इतिहासात सुवर्णकारांनी लिहिले गेले आहे अशी भावना प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी बोलताना व्यक्त केल्या. अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी भाजपाचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा, नामदेवराव गिधाड,प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आनप, आबा मेचे ,मदनलालजी पिपाडा, रविंद्र मेचे,लिलाबाई पिपाडा,श्रृती पिपाडा,नमीता मुनोत,नेहा ताथेड,ट्विंकल पिपाडा आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतना सौ.ममता पिपाडा म्हणाल्या की,अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्यकारभारात अनेक सुधारणा केल्या. त्यांनी सैन्याची रचना मजबूत केली, अर्थव्यवस्थेला चालना दिली आणि प्रशासकीय सुधारणा केल्या. त्यांनी लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. विशेषतः त्यांनी गरीब आणि गरजू लोकांसाठी मदत केली. अहिल्याबाई होळकर यांनी अनेक सामाजिक कार्ये केली. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि महिलांच्या हक्कांसाठी काम केले. त्यांनी महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि त्यांच्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. त्यांनी गरीब आणि गरजू लोकांसाठी दवाखाने आणि आश्रमांची स्थापना केली. अहिल्याबाई होळकर या धार्मिक विचारांशी जोडलेल्या होत्या. त्यांनी अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळांची निर्मिती केली. त्यांनी तीर्थक्षेत्रांचे पुनरुत्थान केले आणि धार्मिक कार्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी अनेक धार्मिक संस्थांना मदत केली. अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्य कारभारात आणि सामाजिक कार्यांमध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी एक आदर्श राज्यकर्ती म्हणून नाव कमावले आणि लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले. त्यांचे कार्य आजही लोकांना प्रेरणा देत आहे.
यावेळी उपस्थित सर्वांनी अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन केले.
शुक्रवार, ३० मे, २०२५
डॉ संजय उबाळे यांची इंटरनॅशनल लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234D2 झोन चेअरमन पदी निवड
गुरुवार, २९ मे, २०२५
राहता तालुक्यातील कोऱ्हाळे डोऱ्हाळे वाळकी येथील निळवंडे कालव्यातून भरलेल्या पाझर तलावाचे जल पूजन प्रसंगी डॉ सुजय विखे
शिर्डी मध्ये मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
रविवार, २५ मे, २०२५
तुम्ही ऊस लावा तो वाढवण्याची आणि तोडण्याची जबाबदारी सोबतच त्या ऊसाला उच्चांकी भाव देण्याची जबाबदारी आमची राहील डॉ सुजय विखे पाटील
राहाता
चांगल्या मनाने, निस्वार्थ भावनेने काम केले तर त्याला निसर्गाची सूध्दा साथ मिळत असते. निळवंडेचे पाणी देणार हा शब्द जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला आहे. आता पाण्याची चिंता करू नका उपलब्ध पाण्यावरती ऊस लागवड करा ऊस लागवडीसाठी सर्वतोपरी मदत विखे पाटील कारखान्याच्या माध्यमातून केली जाईल केली जाईल. हसून आणि आश्वासने देऊन जनतेची कामे होत नाहीत त्यासाठी प्रत्यक्ष काम करावे लागते असे प्रतिपादन विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
गणेश परिसरातील खडके वाके येथील निळवंडे पाण्याने भरलेल्या पाझर तलावाचे जलपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावसाहेब लावरे हे होते. यावेळी सरपंच सचिन मुरादे, दिपक गायकवाड जलसंपदा विभागाचे कैलास ठाकरे, महेश गायकवाड आदींसह विविध संस्थाचे पदाधिकारी, केलवड, आडगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डाॅ.विखे पाटील म्हणाले,
निळवंडेचे पाणी हे शेवटच्या शेतकर्याला देणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण पूर्ण करणार आहोत. गणेश परिसर कायमच विखे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. निवडणुकीच्या काळात राज्यातले आणि केंद्रातले लोक या ठिकाणी एकत्र आले पण जनतेने कायमचं विखे पाटील यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी भाषणे सोडून आणि वैयक्तिक टीका सोडून काहीच केले नाही.श्री गणेश कारखान्याच्या माध्यमातून राजकारण करू नका. अजून बराच हिशोब मला पूर्ण करायचा आहे असे सांगत गणेश कारखाना सुरू करण्यासाठी जवळ पास शंभर कोटी खर्च केले तो कारखाना व्यवस्थित चालवा त्याचा वापर हा राजकारणासाठी करू नका सल्ला डाॅ सुजय विखे पाटील यांनी दिला.
मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून जलसंपदा विभागाचे काम लोकाभिमुख ठरत आहे. शिर्डी मतदार संघ हा भयमुक्त आणि गुन्हेगार मुक्त करणे हाच आपला ध्यास आहे. मंत्री विखे पाटील यांनी जिरायत भागासाठी सुरू केलेल्या साईगंगा योजनेचे नूतनीकरण करून ही योजना जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने सुरु होणार असल्याची ग्वाही दिली

शिर्डी मतदारसंघात पुढील ५० वर्षाचा विचार करून शेती, दूध, पाणी, आणि रोजगारासाठी आपण प्रयत्न करत आहोत. जनतेच्या विश्वासाला विखे पाटील परिवार हा तडा जाऊ देणार नाही. आपले भविष्य उज्वल करण्याचे काम आपण करत आहोत. भाषणे करून गेले त्यांना जनतेने निवांत केले आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजोबांनी पाझर तलाव बांधले, वडिलांनी त्यात पाणी आणले, आणि मी त्याचे पूजन करतो यासाठी मोठं भाग्य लागते आणि हे सर्व केवळ जनतेने दिलेल्या प्रेमामुळेच शक्य झाले आहे. आज शिर्डी मतदार संघामध्ये विविध विकास कामांच्या माध्यमातून काम उभे राहत आहे दूध उत्पादन दूध उत्पादकांसाठी पशुखाद्य प्रकल्प, कचरा मुक्त गाव योजना राबवण्यासाठी गोगलगांव या ठिकाणी सेंद्रिय खत उत्पादन प्रकल्प राबवला जाणार आहे.

विखे पाटील कारखान्याच्या माध्यमातून प्रवरेच्या आणि विळद घाट येथील कृषी महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र,बाभळेश्वर याठिकाणीहून दर्जेदार ऊस रोपे देऊन लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे हे प्रोत्साहन देताना एकरी उसाची उत्पादकता वाढीसाठी विशेष प्रयत्न हे या भागामध्ये केले जाणार आहे. तुम्ही ऊस लावा तो वाढवण्याची आणि तोडण्याची जबाबदारी सोबतच त्या ऊसाला उच्चांकी भाव देण्याची जबाबदारी ही आमची राहील असेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी सरपंच सचिन मुरादे यांनी खडकेवाके गांवच्या विकासामध्ये विखे पाटील कुटुंबाचे योगदान आहे. पाणी आल्याने आणि कात नदीवरील बंधा-यासाठी भरीव निधी दिल्याने आज शेतीचाही प्रश्न सुटला आहे. जालिंदर मुरादे यांनी आभार मानले.

राजकारण हे व्यक्ती केंद्रित करू नका. गणेश कारखाना जरूर चालवा परंतु त्याचा वापर राजकारणासाठी करू नका. गणेशच्या कर्मचाऱ्यांना भरभरून दिले पण त्यांनी विरोधात काम केले अशी खंत व्यक्त करतानाच मी दिलखुलास माणूस आहे मी गोड बोलत नाही परंतु जे बोलतो तेच करतो.आज अनेकांची दुकाने बंद झाल्याने विरोधक हे आपल्याकडे येतात पण या विरोधकांना कार्यकर्त्यांनी चांगले पारखून घ्या त्यांचा त्रास आपल्याला होता कामा नये ही जाणीवही ठेवा असाही सल्ला कार्यकर्त्यांना देत मंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऊस उत्पादकांसाठी उस लागवडीसाठी विशेष घोषणा करणार असल्याचेही सुवाच्च त्यांनी केले.
शनिवार, २४ मे, २०२५
कॅबिनेट मंत्री ना , श्री छगन भुजबळ यांनी साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले
शुक्रवार, २३ मे, २०२५
पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या शिर्डीतील मुस्लिम बांधवांना मान्यवरांकडून शुभेच्छा
संत ज्ञानेश्वर महाराज साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कवी राजेंद्र फंड यांची निवड :
गुरुवार, २२ मे, २०२५
खडकेवाके येथे डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या सोडविण्याची दिली ग्वाही
लक्ष्मीबाई आग्रे यांचे निधन
शनिवार, १७ मे, २०२५
शिर्डी विधानसभा मतदार संघ हा राज्यात आदर्श कसा राहील यासाठी सदैव प्रयत्नशील - डॉ.सुजय विखे पाटील
निळवंड्यांचे पाणी देणार हा विश्वास जनतेला दिला होता आज निळवंडे चे पाणी आपल्याला मिळाल्याने हा विश्वास सार्थकी ठरला. आपण ठेवलेला विश्वास हाच खऱ्या अर्थाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय आहे. पाण्यासाठी कुणी आडवे येवू नये. गुन्हेगारी मुक्त शिर्डी मतदार संघासाठी आजही आपली भूमिका आपण बदललेली नाही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही उलट शिर्डी विधानसभा मतदार संघ हा राज्यात आदर्श कसा आदर्श कसा राहील यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
निर्मळ पिंपरी, अस्तगांव, केलवड, आडगांव बुद्रुक येथील पाझर तलाव तलावाचे जलपूजन प्रसंगी डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी पाटबंधारे विभागाचे अभियंता लव्हाटे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी महिला उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ. विखे पाटील म्हणाले,,निळवंडे चे पाणी येईल की नाही ही प्रत्येकाच्या मनात शंका होती परंतु आज ती शंका दूर झाली आहे. प्रत्येकाला पाणी मिळत आहे आणि यापुढेही ते मिळत राहणार आहे. आज मी बोललो की मोठी टीका टिपणी होती परंतु शिर्डी आज भयमुक्त होत आहे. त्याचबरोबर मतदार संघामध्ये वेगवेगळ्या कामातून विकास हा सुरू आहे विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध आहे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे निळवंडे हे स्वप्न होते आज त्याची पूर्तता झाली आहे ते जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष असतांना जिरायत भागांमध्ये पाझर तलावाची निर्मिती त्यांनी केली आज ते पाझर
तलाव उन्हाळ्यामध्ये भरले हा आनंद आपल्यासाठी मोठा आहे.
जनतेच्या हितासाठी वाईटपणा घ्यावा लागला तरी तो वाईटपणा घेण्यासाठी आपण सज्ज आहोत आणि मतदार संघ हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आपण होऊ देणार नाही. या मतदारसंघा मध्ये अनेकांनी विष कालवण्याचे काम केलं परंतु त्यांना जनतेने धडा शिकवला आहे काम करणाऱ्याच्या मागे जनता ही कायम असते हेच शिर्डी मतदार संघामध्ये जनतेने दाखवून दिले आहे. गोरगरीब जनतेसाठी सदैव कार्यरत राहून जनतेसाठी आपल्यापुढे पैशाचे मोल काहीच नाही आज जिरायत भागाची ओळख बागायत भाग म्हणून होत आहे. आता प्रत्येकाला पाणी मिळणार आहे उपलब्ध पाण्यावरती ऊस लागवड करून ऊस उपलब्ध करा विखे पाटील कारखान्याची गाळप क्षमताही वाढवली आहे. आपण ऊस बेणे देऊ तुम्ही फक्त ऊस लागवड करा त्याची जोपासना आणि
ऊस तोडून नेण्याची जबाबदारी आपली राहील. संकटामध्ये तुम्ही उभे राहिलात मी तुमच्या पाठीशी कायम उभा राहील असेही डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.

प्रत्येक आवर्तनातून आपण पाणी देण्यासाठी अभ्यास करत आहोत प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी देणे ही आपली जबाबदारी आहे या पुढील काळात पाणी द्या असे अर्ज तुम्ही करण्याऐवजी पाणी बंद करा असे अर्ज आपल्याकडून येतील असे सांगतानाच ज्यांनी पाणी दिले त्यांनाच ऊस द्या असे आवाहन डॉ. विखे यांनी केले
शुक्रवार, १६ मे, २०२५
मंत्री अतुल सावे यांनी घेतले साईबाबा चे दर्शन
उष्णतेच्या तीव्रतेमुळे साई भक्तांना उष्णते पासून होणारे त्रास कमी करावा निलेश शिंदे पाटील
श्री साई चरणी चांदीचा हार अर्पण
Featured post
आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील
आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील दाढ बुद्रुक आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...
-
राहाता तालुक्यातील एकरुखे येथील ॲड ऋषिकेश किसन आभाळे यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ( JMFC) पदी नियुक्ती राहाता तालु...
-
साई महिमा ट्रस्ट व गोपुरम टीव्ही भक्ती महिमा यांच्या वतीने गणेशनगर विद्यालयामध्ये अन्नदान व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप रयत श...
-
राहता अहिल्यानगर ते शिर्डी रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी कॉंक्रीटीकरण होवुन राहाता शिर्डी शहरातुन जाणा-या रस्त्यावर उड्डाणप...
