गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

साई मंदिरात हार फुले वरील प्रतिबंध उच्च न्यायालयाने हटविला ▪ डॉक्टर पिपाडा यांच्या अर्जामुळे मिळाले यश

 ▪ साई मंदिरात हार फुले वरील प्रतिबंध उच्च न्यायालयाने हटविला

 


शिर्डी (प्रतिनिधी) : 

    श्री साईबाबा मंदिरात हार फुले अर्पण करण्यावर असलेले प्रतिबंध हटवावे, यासाठी मी दाखल केलेल्या याचिकेवर (सिव्हिल अर्ज क्रं.५८४६) आज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाल देऊन ही बंदी उठविली आहे. त्यामुळे शिर्डी येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या चरणावर हार फुले अर्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालामुळे "सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही" यावर माझा दृढ विश्वास बसलेला आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील याचिकाकर्ता तसेच या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेले डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केली आहे.
        याबाबत सविस्तर माहिती देताना डॉक्टर पिपाडा म्हणाले की, कोरोना नंतर देशातील सर्व मंदिरांमध्ये प्रवेश आणि हार फुले प्रसाद अर्पण करण्यावर असलेले प्रतिबंध हटविण्यात आले होते. मात्र पवित्र शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात हार फुले प्रसाद अर्पण करण्यावर प्रतिबंध ठेवण्यात आले होते. या संदर्भात डॉक्टर पिपाडा वगळता अन्य कोणत्याही राजकीय नेत्याला उत्पादक शेतकरी आणि विक्रेते यांचे दुःख दिसले नव्हते. एकमेव डॉक्टर पिपाडा यांनी माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेत अर्ज करून (सिव्हिल अर्ज क्रं.५८४६) या विषयाचे गांभीर्य उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. फुल शेती आणि हार, फुल, बुके विकून उपजीविका करणाऱ्या शेकडो छोट्या-मोठ्या फुल व्यवसायिकांचे तसेच फूल उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान पिपाडा यांनी मा.उच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिले होते. त्यांच्या या प्रशासकीय तसेच न्यायालयीन दीर्घ लढ्याला आज अखेरीस यश येऊन मा.उच्च न्यायालयाने फुल-हार अर्पण करण्यावरील बंदी उठविली आहे. कोर्टाच्या आजच्या आदेशामुळे शिर्डी परिसरातील फुल उत्पादक आणि किरकोळ हार-फुल विक्रेते यांच्यामध्ये आनंदाची लहर निर्माण झाली असून अनेकांनी फोन करून डॉक्टर पिपाडा यांना धन्यवाद दिले आहेत. तसेच या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसताना उच्च न्यायालयाचा निकाल येताच विखे पाटील व त्यांचे समर्थक श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावलेले पाहून, निदान श्रद्धेय साईबाबांच्या भीतीपोटी तरी  खोटे बोलणार नाहीत, असे मला वाटले होते, अशी कोपरखळी डॉक्टर पिपाडा यांनी मारली.
विखे समर्थकांनी साईबाबांच्या मंदिरात फूल विक्रेत्यांकडून  भक्तांची लूट होते अशी तक्रार अर्ज करून फुल वाहण्याला बंदी करायला भाग पाडले होते. मात्र डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला व उच्च न्यायालयात अर्ज केला. दोन वर्षांच्या लढाईनंतर आज त्यांच्या संघर्षाला यश आले आणि उच्च न्यायालयाने घातलेले प्रतिबंध हटविले त्यामुळे फुल विक्रेत्यांमध्ये एकच जल्लोष करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. संजय दिघे यांनी पशु वैद्यकीय सेवेत मुक्या प्राण्यांवर माया बरोबरच माणसं जोडली-डॉ.दशरथ दिघे

पानेगांव   राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय सेवेत ३३ वर्ष अविरत सेवेत मुक्या प्राण्यांवर माया त्याच बरोबर गोड मितभाषी स्वभावतुन माणसं...